शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा थांबवायचा असेल तर पालकांनी 'गोंडस लेकी' नव्हे, 'सक्षम मुली' घडवाव्यात!

By राजेश शेगोकार | Updated: June 2, 2025 14:55 IST

Nagpur : बाप फक्त देतो, मागत नाही आणि जेव्हा देणं त्याच्या ताकदीपलीकडचं असतं, तेव्हा तो स्वतःला मोडून टाकतो. आता वेळ आली आहे बापाने न मोडता खंबीर होण्याची अन् मुलींनीही हतबल न होता कणखर होत सामना करण्याची, जीव देणे हा मार्गही नाही अन् उपायही. मुलींनो, हा 'धडा' गिरवा अन् 'धडा' शिकवा !

राजेश शेगोकारनागपूर : लय अवघड हाय गड्या उमगाया बाप ...' हे गाणे ऐकताना डोळे पाणावतात, कारण बाप एक साधा शब्द असला तरी त्यामागे कष्टांची, त्यागाची आणि वेदनेची कहाणी दडलेली असते. हाच बाप एखाद्या उपवर मुलीचा असतो तेव्हा या वेदनेला प्रसंगी असहायतेची किनारही असते. सध्या अनेक घरांमध्ये लगीनघाई सुरू आहे अन् अशातच पुण्यातील वैशाली हगवणे या २३ वर्षांच्या तरुणीचा हुंड्यापायी गेलेला बळी चर्चेत आहे. मोठ्या घरची लेक अन् थोरा घरची सून असलेल्या वैशालीला लग्नात ५० तोळे सोने आणि फॉरच्यूनर गाडी दिली असताना तिने दोन कोटी रुपये आणावेत यासाठी तिचा छळ करण्यात आला. त्यातच तिचा बळी गेला.

हीच कहाणी कमी-अधिक प्रमाणात तुमच्या आजूबाजूलाही असेलच. हुंड्याची रक्कम कमी-जास्त असते मात्र मानसिकता सारखीच. बापाने लग्नात आयुष्यभराची लावलेली कमाई, माहेरची स्थिती अन् मुळात समाज काय म्हणेल या भीतीने अनेक मुली सगळा छळ सहन करतात अन् सहनशीलता संपली की गळफास जवळ करतात. पण जीव देण्याने प्रश्न संपत नाहीत. हे चित्र थांबले पाहिजे. हुंड्याचं दुष्टचक्र तोडायचं असेल, तर मुलींनीही आपली भूमिका ठामपणे मांडायला हवी. शिक्षण, आत्मनिर्भरता आणि स्पष्ट विचार हीच हुंड्याविरोधातली खरी ढाल आहे. माझं लग्न मला विकायचं नाही, असा आवाज जर प्रत्येक मुलीने उंचावला, तर समाज बदलायला वेळ लागणार नाही, फक्त तो आवाज करण्याचे स्वातंत्र्य पालक व समाजाने दिले पाहिजे.

मुळात कायद्याने हुंडा मागणे गुन्हा आहे, पण आजही अनेक ठिकाणी तो 'परंपरा' म्हणून जिवंत आहे. मुलीच्या वडिलांकडून रोख रक्कम, दागिने, वाहने इत्यादी थेट किंवा अप्रत्यक्षपणे मागितले जाते. अनेक वडील हुंडा न देण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत, कारण समाज, नातेवाईक आणि स्वतःची असहायता या तिन्ही गोष्टी त्यांना गप्प बसायला भाग पाडतात, 'स्थळ चांगले आहे; थोडंफार द्यावं लागतं' अशा वाक्यांनी हुंड्याला सामाजिक मान्यता दिली जाते आणि बाप गप्प बसतो. लेकीसाठी 'काहीही' करायला तयार होतो. लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं बंधन, दोन जीवांचा सुखी संसार पण दुर्दैवाने आजही आपल्या समाजात लग्न म्हणजे आर्थिक देवाणघेवाणीचा, सामाजिक प्रतिष्ठेचा व्यवहार असा चुकीचा अर्थ लावला जातो. तो संपावा त्यासाठी बापानेही मुलींना शिकवावे, सर्वार्थाने सक्षम करावे. माझ्या लेकीच्या शिक्षण, संस्कार आणि स्वाभिमानापेक्षा मोठं काही नाही. हुंडा देणं शक्य नाही व गरजही नाही हा विश्वास जिथे असेल, तिथे लग्नाचा अर्थच बदलेल अन् एका बापाची कहाणी 'दमलेल्या 'पासून 'धीर देणाऱ्या 'पर्यंत पोहोचेल. अशा बदलासाठी गरज आहे, सुरुवात करण्याची आणि समाजानेही या विचारांचे स्वागत करण्याची. 

नोंद न झालेल्या तक्रारींचे काय?राष्ट्रीय महिला आयोगाच्या २०२४ च्या अहवालानुसार, देशभरात २५,७४३ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी १७ % ४,३८३) तक्रारी हुंडा छळाशी संबंधित होत्या. महाराष्ट्रातून १,३१७ तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यात हुंडा छळाच्या तक्रारींचा मोठा वाटा होता. पोलिसांमधील तक्रारी पहिल्या तर अवघ्या ५ महिन्यात ४ हजार ७३६ आकडेवारी गुन्ह्याची नोंद आहे शिवाय प्रत्यक्षात नोंद न झालेल्या तक्रारी कितीतरी असतील. हे चित्र भयानक आहे...

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेdowryहुंडाdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदाnagpurनागपूरVidarbhaविदर्भ