शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

वीज असती तर पऱ्हे सुकले नसते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:08 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने राेवणीला आलेले सुकले आणि शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा पऱ्हे टाकावे ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने राेवणीला आलेले सुकले आणि शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा पऱ्हे टाकावे लागले. शेतातील विहिरीला पाणी आहे. पण, डिमांड नाेट भरूनही वर्षभरापासून महावितरण कंपनीने वीज जाेडणी दिली नाही. वीज मिळाली असती तर पाण्याअभावी पऱ्हे सुकले नसते, अशी प्रतिक्रिया साेनेघाट (ता. रामटेक) येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

रमेश रहाटे, बंडू रहाटे व रामदास रहाटे तिघेही रा. साेनेघाट हे धान उत्पादक असून, त्यांची साेनेघाट शिवारात शेती आहे. शेतमालाचे उत्पादन व पर्यायाने उत्पन्न वाढावे म्हणून या तिन्ही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात विहिरी खाेदल्या. विहिरींना मुबलक पाणी लागल्याने त्यांनी महावितरण कंपनीकडे वर्षभरापूर्वी अर्ज करून कृषिपंपाचे वीज कनेक्शन मागितले. कंपनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार डिमांड नाेट व विजेच्या खांबाची रक्कमही भरली. परंतु, त्यांना अद्यापही वीज कनेक्शन देण्यात आले नाही.

चालू खरीप हंगामात मृग नक्षत्रात पाऊस काेसळताच या शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हे टाकले. मध्येच पावसाने दडी मारल्याने तसेच त्याला पाणी देणे शक्य न झाल्याने पऱ्हे सुकले. मात्र, हिंमत न हारता या तिन्ही शेतकऱ्यांनी पुन्हा पऱ्हे टाकले. ते पऱ्हे राेवणीयाेग्य झाले असून, पाऊस येत नसल्याने सुकण्याच्या मार्गावर आहे. वीज नसल्याने विहिरीतील पाणी बादलीने काढून पऱ्हे जगवणे सुरू आहे, अशी माहिती रामदास रहाटे यांनी दिली. महावितरण कंपनीच्या या प्रकारामुळे व लाेकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

...

डिमांड नाेट व खांबाची रक्कम भरली

कृषिपंपाचे वीज कनेक्शन मिळावे म्हणून आपण जून २०२० मध्ये नियमानुसार डिमांड नाेटच्या रकमेचा महावितरण कंपनीकडे भरणा केला. ट्रान्सफार्मरपासून शेतापर्यंत वीज घेण्यास तीन खांबांची आवश्यकता असल्याने, त्यासाठी प्रत्येकी अतिरिक्त १० हजार रुपये भरले. त्यानंतर निधी उपलब्ध नसल्याचे महावितरणच्या उपअभियंत्याने सांगितल्याने, पुन्हा प्रत्येकी १२ हजार रुपयांचा भरणा केला, अशी माहिती रमेश रहाटे, बंडू रहाटे व रामदास रहाटे यांनी दिली.

...

रबी पीक घेणे अशक्य

ओलिताची काेणतीही साेय नसल्याने साेनेघाट व सालेमेटा या भागातील शेतकऱ्यांना केवळ खरीप पिके घ्यावी लागतात. काहींनी ओलितासाठी शेतात विहिरी खाेदल्या. मात्र, महावितरण कंपनी त्यांना वीज कनेक्शन द्यायला दीर्घ दिरंगाई करीत आहेत. काही शेतकऱ्यांकडे कृषिपंपाचे वीज कनेक्शन आहे. मात्र, थ्री फेज वीजपुरवठा व्यवस्थित केला जात नसल्याने इच्छा व कष्ट करण्याची तयारी असूनही रबीची पिके घेता येत नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.