शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीज असती तर पऱ्हे सुकले नसते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:08 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने राेवणीला आलेले सुकले आणि शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा पऱ्हे टाकावे ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने राेवणीला आलेले सुकले आणि शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा पऱ्हे टाकावे लागले. शेतातील विहिरीला पाणी आहे. पण, डिमांड नाेट भरूनही वर्षभरापासून महावितरण कंपनीने वीज जाेडणी दिली नाही. वीज मिळाली असती तर पाण्याअभावी पऱ्हे सुकले नसते, अशी प्रतिक्रिया साेनेघाट (ता. रामटेक) येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

रमेश रहाटे, बंडू रहाटे व रामदास रहाटे तिघेही रा. साेनेघाट हे धान उत्पादक असून, त्यांची साेनेघाट शिवारात शेती आहे. शेतमालाचे उत्पादन व पर्यायाने उत्पन्न वाढावे म्हणून या तिन्ही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात विहिरी खाेदल्या. विहिरींना मुबलक पाणी लागल्याने त्यांनी महावितरण कंपनीकडे वर्षभरापूर्वी अर्ज करून कृषिपंपाचे वीज कनेक्शन मागितले. कंपनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार डिमांड नाेट व विजेच्या खांबाची रक्कमही भरली. परंतु, त्यांना अद्यापही वीज कनेक्शन देण्यात आले नाही.

चालू खरीप हंगामात मृग नक्षत्रात पाऊस काेसळताच या शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हे टाकले. मध्येच पावसाने दडी मारल्याने तसेच त्याला पाणी देणे शक्य न झाल्याने पऱ्हे सुकले. मात्र, हिंमत न हारता या तिन्ही शेतकऱ्यांनी पुन्हा पऱ्हे टाकले. ते पऱ्हे राेवणीयाेग्य झाले असून, पाऊस येत नसल्याने सुकण्याच्या मार्गावर आहे. वीज नसल्याने विहिरीतील पाणी बादलीने काढून पऱ्हे जगवणे सुरू आहे, अशी माहिती रामदास रहाटे यांनी दिली. महावितरण कंपनीच्या या प्रकारामुळे व लाेकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

...

डिमांड नाेट व खांबाची रक्कम भरली

कृषिपंपाचे वीज कनेक्शन मिळावे म्हणून आपण जून २०२० मध्ये नियमानुसार डिमांड नाेटच्या रकमेचा महावितरण कंपनीकडे भरणा केला. ट्रान्सफार्मरपासून शेतापर्यंत वीज घेण्यास तीन खांबांची आवश्यकता असल्याने, त्यासाठी प्रत्येकी अतिरिक्त १० हजार रुपये भरले. त्यानंतर निधी उपलब्ध नसल्याचे महावितरणच्या उपअभियंत्याने सांगितल्याने, पुन्हा प्रत्येकी १२ हजार रुपयांचा भरणा केला, अशी माहिती रमेश रहाटे, बंडू रहाटे व रामदास रहाटे यांनी दिली.

...

रबी पीक घेणे अशक्य

ओलिताची काेणतीही साेय नसल्याने साेनेघाट व सालेमेटा या भागातील शेतकऱ्यांना केवळ खरीप पिके घ्यावी लागतात. काहींनी ओलितासाठी शेतात विहिरी खाेदल्या. मात्र, महावितरण कंपनी त्यांना वीज कनेक्शन द्यायला दीर्घ दिरंगाई करीत आहेत. काही शेतकऱ्यांकडे कृषिपंपाचे वीज कनेक्शन आहे. मात्र, थ्री फेज वीजपुरवठा व्यवस्थित केला जात नसल्याने इच्छा व कष्ट करण्याची तयारी असूनही रबीची पिके घेता येत नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.