शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

वीज असती तर पऱ्हे सुकले नसते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:08 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने राेवणीला आलेले सुकले आणि शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा पऱ्हे टाकावे ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने राेवणीला आलेले सुकले आणि शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा पऱ्हे टाकावे लागले. शेतातील विहिरीला पाणी आहे. पण, डिमांड नाेट भरूनही वर्षभरापासून महावितरण कंपनीने वीज जाेडणी दिली नाही. वीज मिळाली असती तर पाण्याअभावी पऱ्हे सुकले नसते, अशी प्रतिक्रिया साेनेघाट (ता. रामटेक) येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

रमेश रहाटे, बंडू रहाटे व रामदास रहाटे तिघेही रा. साेनेघाट हे धान उत्पादक असून, त्यांची साेनेघाट शिवारात शेती आहे. शेतमालाचे उत्पादन व पर्यायाने उत्पन्न वाढावे म्हणून या तिन्ही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात विहिरी खाेदल्या. विहिरींना मुबलक पाणी लागल्याने त्यांनी महावितरण कंपनीकडे वर्षभरापूर्वी अर्ज करून कृषिपंपाचे वीज कनेक्शन मागितले. कंपनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार डिमांड नाेट व विजेच्या खांबाची रक्कमही भरली. परंतु, त्यांना अद्यापही वीज कनेक्शन देण्यात आले नाही.

चालू खरीप हंगामात मृग नक्षत्रात पाऊस काेसळताच या शेतकऱ्यांनी शेतात पऱ्हे टाकले. मध्येच पावसाने दडी मारल्याने तसेच त्याला पाणी देणे शक्य न झाल्याने पऱ्हे सुकले. मात्र, हिंमत न हारता या तिन्ही शेतकऱ्यांनी पुन्हा पऱ्हे टाकले. ते पऱ्हे राेवणीयाेग्य झाले असून, पाऊस येत नसल्याने सुकण्याच्या मार्गावर आहे. वीज नसल्याने विहिरीतील पाणी बादलीने काढून पऱ्हे जगवणे सुरू आहे, अशी माहिती रामदास रहाटे यांनी दिली. महावितरण कंपनीच्या या प्रकारामुळे व लाेकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

...

डिमांड नाेट व खांबाची रक्कम भरली

कृषिपंपाचे वीज कनेक्शन मिळावे म्हणून आपण जून २०२० मध्ये नियमानुसार डिमांड नाेटच्या रकमेचा महावितरण कंपनीकडे भरणा केला. ट्रान्सफार्मरपासून शेतापर्यंत वीज घेण्यास तीन खांबांची आवश्यकता असल्याने, त्यासाठी प्रत्येकी अतिरिक्त १० हजार रुपये भरले. त्यानंतर निधी उपलब्ध नसल्याचे महावितरणच्या उपअभियंत्याने सांगितल्याने, पुन्हा प्रत्येकी १२ हजार रुपयांचा भरणा केला, अशी माहिती रमेश रहाटे, बंडू रहाटे व रामदास रहाटे यांनी दिली.

...

रबी पीक घेणे अशक्य

ओलिताची काेणतीही साेय नसल्याने साेनेघाट व सालेमेटा या भागातील शेतकऱ्यांना केवळ खरीप पिके घ्यावी लागतात. काहींनी ओलितासाठी शेतात विहिरी खाेदल्या. मात्र, महावितरण कंपनी त्यांना वीज कनेक्शन द्यायला दीर्घ दिरंगाई करीत आहेत. काही शेतकऱ्यांकडे कृषिपंपाचे वीज कनेक्शन आहे. मात्र, थ्री फेज वीजपुरवठा व्यवस्थित केला जात नसल्याने इच्छा व कष्ट करण्याची तयारी असूनही रबीची पिके घेता येत नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.