शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

युती न झाल्यास विधानसभेच्या १५ जागा लढवणार; बच्चू कडू यांचा भाजप-शिंदे गटाला अप्रत्यक्ष इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2023 21:01 IST

Nagpur News भाजप - शिंदे गटासोबत युती झाली तर योग्यच, अन्यथा आपण विधानसभेच्या १५ जागा लढवणार, असा अप्रत्यक्ष इशारा आ. बच्चू कडू यांनी गुरुवारी नागपुरात दिला.

कमलेश वानखेडे

नागपूर : आ. बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने आतापासूनच विधान निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप - शिंदे गटासोबत युती झाली तर योग्यच, अन्यथा आपण विधानसभेच्या १५ जागा लढवणार, असा अप्रत्यक्ष इशारा आ. बच्चू कडू यांनी गुरुवारी नागपुरात दिला.आ. कडू म्हणाले, मंत्री मंडळ विस्ताराचा विषय गंमतीचा झाला आहे. २० मंत्री करायचे आहेत, ५० लोक रांगेत आहेत. आता विस्तार आहे म्हणून अर्धे लोक मुंबईतंच असतात. विस्तार केल्यावर भुकंप होईल अशी स्थिती नाही. विस्तार झाल्यावर कुणी बाहेर जाणार नाही, उलट

इकडेच येतील. आपल्याला मंत्रीपदाची चिंता नाही. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार दिव्यांग मंत्रालयाच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

बंडखोरांनाच मोठी पदे मिळतात

- राजकारणात आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना मोठी पदे मिळालेली आहेत. २०१९ मध्ये बंडखोरी करणारे अजित पवार नंतर उपमुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांनी मतदारांच्या विरोधात बंडखोरी केली आणि महाविकास आघाडीत ते मुख्यमंत्री झाले. पटोले भाजप सोडून गेले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. तेसुद्धा मुख्यमंत्री झाले. येथेही जे निष्ठावान होते, ते मागे राहिले. बंडखोरांनाच मोठी पदे मिळाल्याचा इतिहास आहे, असे सांगत आ. बच्चू कडू यांनी त्यांच्या मनातील सल व्यक्त केला.

हे शरद पवारांना माहित नसेल का ?

- शरद पवार हे मजबूत नेते आहेत. मग त्यांच्याच परिवारातील व्यक्ती पहाटे शपथ घ्यायला जातो, हे त्यांना माहित नसेल का? असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला. कदाचित शरद पवार यांची हिरवी झेंडी असेल म्हणून अजीत पवार शपथ घ्यायला गेले असतील. जर शरद पवार यांना माहिती नसेल तर मग बंड करुनंही अजीत पवार यांना उपमुख्यमंत्रीपद का दिलं, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू