शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

दूरदृष्टी असेल तर देश बदलेल

By admin | Updated: October 12, 2014 01:17 IST

केंद्रात आघाडी सरकार असताना महागाईने कळस गाठला होता. आघाडी सरकारने केवळ ‘गरिबी हटाओ’चे नारे दिले. पण मोदींच्या नेतृत्वातील सरकार येताच अवघ्या १०० दिवसात महागाई कमी करण्याचे

नितीन गडकरी : हिंगण्यात जाहीर सभानागपूर : केंद्रात आघाडी सरकार असताना महागाईने कळस गाठला होता. आघाडी सरकारने केवळ ‘गरिबी हटाओ’चे नारे दिले. पण मोदींच्या नेतृत्वातील सरकार येताच अवघ्या १०० दिवसात महागाई कमी करण्याचे प्रयत्न यशस्वीरीत्या सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात भाजपप्रणित सरकार असताना लोडशेडिंग नव्हते. आता पुन्हा एकदा राज्याची सत्ता द्या, संपूर्ण महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त करून दाखवतो. देशातील सर्व महामार्ग सिमेंटचे बनविण्याचा आराखडा आज तयार आहे. नागपूर देशातील ‘स्मार्ट सिटी’ व्हावी, यासाठी पहिल्या १०० दिवसात विकासासाठी ४ हजार कोटी रु पयांची कामे मंजूर करून घेतली आहेत. यासाठी के वळ दूरदृष्टी असणे गरजेचे आहे. भाजपाकडे विकासाची दूरदृष्टी असल्याने तुमची वस्ती, शहर, राज्य आणि देशही बदलेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंगण्यातील जाहीर सभेत केले. समीर मेघे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सभामंचावर मध्य प्रदेशचे खासदार जनार्दन मिश्रा, माजी खा. दत्ता मेघे, माजी आ. विजय घोडमारे, सौंसरचे आ. नानाभाऊ मोहोड, माजी खा. रामखिलम पटेल, बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. विकास महात्मे, डॉ. राजीव पोतदार, सतीश जिंदल, प्रेम झाडे, पुरुषोत्तम रागीट, सुरत नितनवरे, राम यादव, आनंद कदम, कैलास मंथापूरकर, देवेंद्र बोरेकर, अशोक गोतमारे, विजय मेंढे, वैशाली मेंढे, सरिता यादव, संजय कफनीचोर आदी उपस्थित होते. या विकासकामांसाठी सर्वांनी भाजपाच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. भाजपला जातीयवादी संबोधून आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीने दलित, बहुजन समाजाची दिशाभूलच केली आहे. भाजप हाच धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे सुलेखा कुंभारे म्हणाल्या. दत्ता मेघे म्हणाले की गडकरी हे विकासाची दृष्टी असणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वातच विदर्भाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. वेगळ्या विदर्भाची आमची मागणी आजही कायम आहे. छोट्या राज्यांच्या निर्मितीसाठी भाजपाची भूमिका अनुकूल असल्यामुळे आपण आशावादी आहोत. (प्रतिनिधी)