शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

जर पक्षाने सांगितले तर घरीदेखील बसायची तयारी आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2022 20:54 IST

Nagpur News माझ्यासाठी पक्षाचा आदेशच महत्त्वाचा आहे. जर पक्षाने सांगितले तर माझी घरीदेखील बसायची तयारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देगनिमी काव्याने व निधड्या छातीने सरकार पाडले

नागपूर : राज्यात नवीन सरकार स्थापन होत असताना मी त्यात सहभागी होणार नाही, असे ठरविले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सांगितल्यानंतर मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. हेच नेते व पक्षामुळे मी राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकलो होतो. माझ्यासाठी पक्षाचा आदेशच महत्त्वाचा आहे. जर पक्षाने सांगितले तर माझी घरीदेखील बसायची तयारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या नागपुरात आगमनाप्रसंगी काढण्यात आलेल्या विजय रॅलीदरम्यान लक्ष्मीभुवन चौकातील छोटेखानी सभेदरम्यान ते बोलत होते.

फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद दिल्याने त्यांचे समर्थक नाराज होते. आपल्या सभेदरम्यान फडणवीस यांनी या सर्व कार्यकर्त्यांना परत जोमाने कामाला लागण्याचे संकेतच दिले. २०१९ साली शिवसेनेसोबत बहुमत आणले होते. मात्र, त्यांनी आमच्याशी बेईमानी केली व पाठीत खंजीर खुपसला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने व निधड्या छातीने आम्ही नवीन सरकार आणले. हे सरकार सहा महिने चालेल, असे भाकीत काही लोक वर्तवत आहेत. २०१४ मध्येदेखील याच लोकांनी एक वर्षदेखील सरकार चालणार नाही, असा दावा केला होता. मात्र, आम्ही पाच वर्षे पूर्ण केली होती. पुढील निवडणुकीत आम्ही बहुमताचे सरकार आणू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

रोज संताप यायचा, वाईट वाटायचे

मागील अडीच वर्षांत राज्यात सगळीकडे दुराचार व अत्याचार वाढला होता. कुठेही प्रशासन दिसून येत नव्हते व सरकारी यंत्रणेत समन्वय नव्हता. राज्य कोण चालवत आहे हेच कळत नव्हते व महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसली होती. विदर्भ-मराठवाड्याला सावत्र वागणूक दिली जात होती. विदर्भ विकास मंडळ बंद केले तर विजेची सबसिडी बंद केली. विकासकामांचा निधी दुसरीकडे पळविला होता. या प्रकारामुळे रोज संताप यायचा व वाईटदेखील वाटायचे, असे फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस