शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जर पक्षाने सांगितले तर घरीदेखील बसायची तयारी आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2022 20:54 IST

Nagpur News माझ्यासाठी पक्षाचा आदेशच महत्त्वाचा आहे. जर पक्षाने सांगितले तर माझी घरीदेखील बसायची तयारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देगनिमी काव्याने व निधड्या छातीने सरकार पाडले

नागपूर : राज्यात नवीन सरकार स्थापन होत असताना मी त्यात सहभागी होणार नाही, असे ठरविले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सांगितल्यानंतर मी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. हेच नेते व पक्षामुळे मी राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकलो होतो. माझ्यासाठी पक्षाचा आदेशच महत्त्वाचा आहे. जर पक्षाने सांगितले तर माझी घरीदेखील बसायची तयारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या नागपुरात आगमनाप्रसंगी काढण्यात आलेल्या विजय रॅलीदरम्यान लक्ष्मीभुवन चौकातील छोटेखानी सभेदरम्यान ते बोलत होते.

फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद दिल्याने त्यांचे समर्थक नाराज होते. आपल्या सभेदरम्यान फडणवीस यांनी या सर्व कार्यकर्त्यांना परत जोमाने कामाला लागण्याचे संकेतच दिले. २०१९ साली शिवसेनेसोबत बहुमत आणले होते. मात्र, त्यांनी आमच्याशी बेईमानी केली व पाठीत खंजीर खुपसला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने व निधड्या छातीने आम्ही नवीन सरकार आणले. हे सरकार सहा महिने चालेल, असे भाकीत काही लोक वर्तवत आहेत. २०१४ मध्येदेखील याच लोकांनी एक वर्षदेखील सरकार चालणार नाही, असा दावा केला होता. मात्र, आम्ही पाच वर्षे पूर्ण केली होती. पुढील निवडणुकीत आम्ही बहुमताचे सरकार आणू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

रोज संताप यायचा, वाईट वाटायचे

मागील अडीच वर्षांत राज्यात सगळीकडे दुराचार व अत्याचार वाढला होता. कुठेही प्रशासन दिसून येत नव्हते व सरकारी यंत्रणेत समन्वय नव्हता. राज्य कोण चालवत आहे हेच कळत नव्हते व महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसली होती. विदर्भ-मराठवाड्याला सावत्र वागणूक दिली जात होती. विदर्भ विकास मंडळ बंद केले तर विजेची सबसिडी बंद केली. विकासकामांचा निधी दुसरीकडे पळविला होता. या प्रकारामुळे रोज संताप यायचा व वाईटदेखील वाटायचे, असे फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस