शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘सावरकर श्रेष्ठ नसतील तर कोणीच श्रेष्ठ नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2023 22:51 IST

Nagpur News एकसंध राष्ट्र हा विचार मांडणारे सावरकर श्रेष्ठ नसतील तर कुणीच श्रेष्ठ नाही, अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.

 

नागपूर : स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, स्वावलंबन या आधारावर देशाच्या भविष्याचा विचार करणारे हिंदुत्व हे सर्वसमावेशक असून जातीवाद, सांप्रदायिकता, अस्पृश्यतेपासून मुक्त आहे, असा पुरोगामी विचार मांडणारा साहित्यिक, कवी, आद्यक्रांतिकारक आणि देशभक्त म्हणून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकर हे या देशासाठी आदर्श आहेत. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात स्वत:ला झोकून देऊन, ज्या व्यक्तीने देशासाठी सर्वस्व अर्पण केले. त्या सावरकरांना, त्यांच्या परिवाराला स्वातंत्र्यानंतरही उपहास व अपमान सहन करावा लागतोय, हे दुर्दैव आहे. एकसंध राष्ट्र हा विचार मांडणारे सावरकर श्रेष्ठ नसतील तर कुणीच श्रेष्ठ नाही, अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.

अखिल भारतीय साहित्य परिषद व राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने उदय माहूरकर व चिरायू पंडित यांनी इंग्रजीत लिहिलेल्या ‘वीर सावरकर’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. हा प्रकाशन सोहळा शनिवारी सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अ. भा. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री श्रीधरजी पराडकर उपस्थित होते. याप्रसंगी पुस्तकाचे मराठी अनुवादक ज्येष्ठ पत्रकार व अभ्यासक डॉ. उदय निरगुडकर, अविनाश पाठक, ॲड. लखनसिंग कटरे, नितीन केळकर आदी उपस्थित होते. ‘वीर सावरकर - फाळणी रोखण्याची क्षमता असणारा माणूस’ या पुस्तकावर बोलताना डॉ. निरगुडकर म्हणाले की, सावरकरांवर झालेला खोटानाटा प्रचार भारताच्या इतिहासात कुणावर झाला नाही. स्वातंत्र्यानंतरही त्यांच्यावरील शालेय पुस्तकातील धडे गाळले गेले. अजूनही त्यांना वैरभावना ठेवून वागविले जात आहे. त्यांनी देशाची एकता, अखंडतेसाठी केलेल्या कार्याचे हे पुस्तक शब्दपुजन आहे. अध्यक्षीय मत व्यक्त करताना श्रीधरजी पराडकर म्हणाले की, अहिंसेच्या अतिरेकामुळे या देशातील साहित्यात इतिहास, हिंदू धर्म, शौर्य या विषयाला हाताळले जात नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश पाठक व सूत्रसंचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.

- डिजिटल माध्यम स्वीकारा

सावरकरांवरील हे पुस्तक साधे नाही. याला सैद्धान्तिक आधार आहे. यामध्ये अभ्यास करून मांडलेले इतिहासातील दाखले आहेत. पण, नव्या पिढीपर्यंत हे पोहोचवायचे असेल तर आता डिजिटल माध्यम स्वीकारण्याची गरज आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या नावाने ॲप तयार करून त्यावरून या पुस्तकातील छोटे छोटे प्रसंग तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा विचार करावा, असे आवाहन गडकरी यांनी लेखकांना व प्रकाशकांना केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी