शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

‘सावरकर श्रेष्ठ नसतील तर कोणीच श्रेष्ठ नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2023 22:51 IST

Nagpur News एकसंध राष्ट्र हा विचार मांडणारे सावरकर श्रेष्ठ नसतील तर कुणीच श्रेष्ठ नाही, अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.

 

नागपूर : स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, स्वावलंबन या आधारावर देशाच्या भविष्याचा विचार करणारे हिंदुत्व हे सर्वसमावेशक असून जातीवाद, सांप्रदायिकता, अस्पृश्यतेपासून मुक्त आहे, असा पुरोगामी विचार मांडणारा साहित्यिक, कवी, आद्यक्रांतिकारक आणि देशभक्त म्हणून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकर हे या देशासाठी आदर्श आहेत. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात स्वत:ला झोकून देऊन, ज्या व्यक्तीने देशासाठी सर्वस्व अर्पण केले. त्या सावरकरांना, त्यांच्या परिवाराला स्वातंत्र्यानंतरही उपहास व अपमान सहन करावा लागतोय, हे दुर्दैव आहे. एकसंध राष्ट्र हा विचार मांडणारे सावरकर श्रेष्ठ नसतील तर कुणीच श्रेष्ठ नाही, अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.

अखिल भारतीय साहित्य परिषद व राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने उदय माहूरकर व चिरायू पंडित यांनी इंग्रजीत लिहिलेल्या ‘वीर सावरकर’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. हा प्रकाशन सोहळा शनिवारी सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अ. भा. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री श्रीधरजी पराडकर उपस्थित होते. याप्रसंगी पुस्तकाचे मराठी अनुवादक ज्येष्ठ पत्रकार व अभ्यासक डॉ. उदय निरगुडकर, अविनाश पाठक, ॲड. लखनसिंग कटरे, नितीन केळकर आदी उपस्थित होते. ‘वीर सावरकर - फाळणी रोखण्याची क्षमता असणारा माणूस’ या पुस्तकावर बोलताना डॉ. निरगुडकर म्हणाले की, सावरकरांवर झालेला खोटानाटा प्रचार भारताच्या इतिहासात कुणावर झाला नाही. स्वातंत्र्यानंतरही त्यांच्यावरील शालेय पुस्तकातील धडे गाळले गेले. अजूनही त्यांना वैरभावना ठेवून वागविले जात आहे. त्यांनी देशाची एकता, अखंडतेसाठी केलेल्या कार्याचे हे पुस्तक शब्दपुजन आहे. अध्यक्षीय मत व्यक्त करताना श्रीधरजी पराडकर म्हणाले की, अहिंसेच्या अतिरेकामुळे या देशातील साहित्यात इतिहास, हिंदू धर्म, शौर्य या विषयाला हाताळले जात नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश पाठक व सूत्रसंचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.

- डिजिटल माध्यम स्वीकारा

सावरकरांवरील हे पुस्तक साधे नाही. याला सैद्धान्तिक आधार आहे. यामध्ये अभ्यास करून मांडलेले इतिहासातील दाखले आहेत. पण, नव्या पिढीपर्यंत हे पोहोचवायचे असेल तर आता डिजिटल माध्यम स्वीकारण्याची गरज आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या नावाने ॲप तयार करून त्यावरून या पुस्तकातील छोटे छोटे प्रसंग तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा विचार करावा, असे आवाहन गडकरी यांनी लेखकांना व प्रकाशकांना केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी