शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

आरक्षण नाकारल्यास सत्तेतून खाली खेचू

By admin | Updated: December 9, 2015 03:32 IST

भारतीय राज्य घटनेत धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित केले.

धनगर समाज संघर्ष समितीचा इशारा : येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोषनागपूर : भारतीय राज्य घटनेत धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित केले. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मागील ६५ वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा समाविष्ट केला. धनगर समाजाने भाजपाला भरघोस मतदान करून सत्तेत बसविले. परंतु वर्ष होऊनही भाजप सरकार आरक्षण देण्यास तयार नाही. त्यामुळे सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत असेल तर सरकारला सत्तेतून खाली खेचू, असा इशारा धनगर समाज संघर्ष समितीत सहभागी नेत्यांनी दिला. धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने हजारो धनगर समाजबांधवांचा मोर्चा विधानभवनावर काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केले. हा मोर्चा टेकडी रोड मार्गावर पोलिसांनी अडवून धरला. त्यानंतर मोर्चात सहभागी मान्यवरांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना डॉ. विकास महात्मे यांनी भाजप सरकारने लेखी दिलेले आश्वासन पाळले नसल्याचे सांगून आरक्षण नसल्यामुळे मागील ६० वर्षात धनगर समाजाची पिछेहाट झाली. समाजातील तरुण उच्चपदस्थ नोकऱ्यांवर जाऊ शकले नसल्याची खंत व्यक्त केली. सत्तेत बसलेल्या भाजप सरकारने धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी आमदार प्रकाश शेंडगे, मंगेश गुलवाडे, शशिकांत तरंगे, प्रा. विजय सोनजे, रामेश्वर पाटील आदी मान्यवरांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सायंकाळी उशिरापर्यंत एकाही मंत्र्याने मोर्चाला भेट दिली नाही. मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी सामोरे जाण्याचा आग्रह मोर्चात सहभागी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला. मोर्चातील पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ कॅबिनेट मंत्र्यांच्या भेटीला गेले. त्यानंतर मंत्री महोदय मोर्चास्थळी भेट देणार असल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आल्यामुळे रात्री उशिरापर्यंत धनगर समाजबांधव आंदोलन करीत होते. मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन दरम्यान, रात्री उशिरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांनी धनगर समाज बांधवांच्या मोर्चाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोबाईलवरून मोर्चेकऱ्यांशी संवाद साधून दिला. मुख्यमंत्र्यांनी आगामी एक वर्षाच्या कालावधीत धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन दिले.