शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

आरक्षण नाकारल्यास सत्तेतून खाली खेचू

By admin | Updated: December 9, 2015 03:32 IST

भारतीय राज्य घटनेत धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित केले.

धनगर समाज संघर्ष समितीचा इशारा : येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोषनागपूर : भारतीय राज्य घटनेत धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित केले. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मागील ६५ वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा समाविष्ट केला. धनगर समाजाने भाजपाला भरघोस मतदान करून सत्तेत बसविले. परंतु वर्ष होऊनही भाजप सरकार आरक्षण देण्यास तयार नाही. त्यामुळे सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत असेल तर सरकारला सत्तेतून खाली खेचू, असा इशारा धनगर समाज संघर्ष समितीत सहभागी नेत्यांनी दिला. धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने हजारो धनगर समाजबांधवांचा मोर्चा विधानभवनावर काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केले. हा मोर्चा टेकडी रोड मार्गावर पोलिसांनी अडवून धरला. त्यानंतर मोर्चात सहभागी मान्यवरांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना डॉ. विकास महात्मे यांनी भाजप सरकारने लेखी दिलेले आश्वासन पाळले नसल्याचे सांगून आरक्षण नसल्यामुळे मागील ६० वर्षात धनगर समाजाची पिछेहाट झाली. समाजातील तरुण उच्चपदस्थ नोकऱ्यांवर जाऊ शकले नसल्याची खंत व्यक्त केली. सत्तेत बसलेल्या भाजप सरकारने धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी आमदार प्रकाश शेंडगे, मंगेश गुलवाडे, शशिकांत तरंगे, प्रा. विजय सोनजे, रामेश्वर पाटील आदी मान्यवरांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सायंकाळी उशिरापर्यंत एकाही मंत्र्याने मोर्चाला भेट दिली नाही. मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी सामोरे जाण्याचा आग्रह मोर्चात सहभागी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला. मोर्चातील पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ कॅबिनेट मंत्र्यांच्या भेटीला गेले. त्यानंतर मंत्री महोदय मोर्चास्थळी भेट देणार असल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आल्यामुळे रात्री उशिरापर्यंत धनगर समाजबांधव आंदोलन करीत होते. मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन दरम्यान, रात्री उशिरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांनी धनगर समाज बांधवांच्या मोर्चाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोबाईलवरून मोर्चेकऱ्यांशी संवाद साधून दिला. मुख्यमंत्र्यांनी आगामी एक वर्षाच्या कालावधीत धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन दिले.