शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हेल्मेट नसल्यास ५०० रुपयांचा दंड

By admin | Updated: August 15, 2016 01:40 IST

स्वातंत्र्य दिनानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहे.

वाहतूक पोलीस विभागाने कसली कंबर : फॅन्सी प्लेटला १००० तर विमा नसल्यास २००० रुपये दंड नागपूर : स्वातंत्र्य दिनानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहे. कारण, तडजोड शुल्काची (दंड) रक्कम दुप्पट नव्हे तर २० पट वाढविण्यात आली आहे. उपराजधानीत १६ आॅगस्टपासून विना हेल्मेट दुचाकी चालविल्यास ५०० रुपये, फॅन्सी नंबर प्लेटचा वापर केल्यास १००० रुपये तर वाहनांची शर्यत लावल्यास २००० रुपये दंड आकारला जाणार आहे. परिवहन मंत्र्यांनी नुकतीच हेल्मेटशिवाय पेट्रोल देणाऱ्या पंपचालकांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. याच्याविरोधात पंपचालकांनी दंड थोपटल्याने या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागास दिले. यामुळे हा निर्णय ५ आॅगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला. परंतु याची मुदत संपत नाही तोच परिवहन विभागाने, वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीस गुन्ह्याची कमी दंडाची तरतूद असल्याचे कारण पुढे करीत तडजोड शुल्कात मोठ्याप्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला, तशी सभागृहातही घोषणा करण्यात आली. त्यानुसार मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम २०० मधील तरतुदीनुसार दंडाची रक्कम वाढविण्याबाबतची अधिसूचना ४ आॅगस्ट रोजी निघाली. मात्र नागपुरात ती लागू करण्यास उशीर होत होता. अखेर पोलीस आयुक्तांनी या संदर्भात नुकतेच निर्देश दिले. त्यानुसार स्वातंत्र्य दिनानंतर ते लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे १६ आॅगस्टपासून वाहन चालविण्याच्या बेशिस्तीला लगाम लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी) यांना असणार ५०० रुपये दंड आता दुचाकी चालकाने व मागे बसणाऱ्याने हेल्मेट न घालणे, विना वाहन परवाना (लायसन्स) वाहन चालविणे, शारीरिक वा मानसिकदृष्ट्या अपात्र असताना वाहन चालविणे, अधिकाऱ्यांच्या सूचनांचे उल्लघंन करणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर एक हजार रुपये दंड अतिवेगाने वाहन चालविणे, वाहनावर ‘फॅन्सी’ नंबर प्लेट बसविणे, दादा, मामा, भाई, बाबा अशा अक्षरांमध्ये नंबर प्लेट रंगविणे, वाहनांवर ‘रिफ्लेक्टर्स’ किंवा ‘टेल लाईट नसणे’, वाहनात अवैध बदल करणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यांना बसणार दोन हजार रुपये भुर्दंड वाहनांची शर्यत लावणे, विना नोंदणी चारचाकी वाहन चालविणे व विमा (इन्शुरन्स) नसताना वाहन चालविणाऱ्यास दोन हजार रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. स्वातंत्र्यदिनानंतर नव्या दंडाची रक्कम वसूल करणार पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार स्वातंत्र्यदिनानंतर जो वाहतूक नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्याकडून नव्या तडजोड शुल्काची (दंड) रक्कम वसूल केली जाणार आहे. या संदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन आहे. - स्नार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शहर