शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

हेल्मेट नसल्यास ५०० रुपयांचा दंड

By admin | Updated: August 15, 2016 01:40 IST

स्वातंत्र्य दिनानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहे.

वाहतूक पोलीस विभागाने कसली कंबर : फॅन्सी प्लेटला १००० तर विमा नसल्यास २००० रुपये दंड नागपूर : स्वातंत्र्य दिनानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहे. कारण, तडजोड शुल्काची (दंड) रक्कम दुप्पट नव्हे तर २० पट वाढविण्यात आली आहे. उपराजधानीत १६ आॅगस्टपासून विना हेल्मेट दुचाकी चालविल्यास ५०० रुपये, फॅन्सी नंबर प्लेटचा वापर केल्यास १००० रुपये तर वाहनांची शर्यत लावल्यास २००० रुपये दंड आकारला जाणार आहे. परिवहन मंत्र्यांनी नुकतीच हेल्मेटशिवाय पेट्रोल देणाऱ्या पंपचालकांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. याच्याविरोधात पंपचालकांनी दंड थोपटल्याने या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागास दिले. यामुळे हा निर्णय ५ आॅगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला. परंतु याची मुदत संपत नाही तोच परिवहन विभागाने, वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीस गुन्ह्याची कमी दंडाची तरतूद असल्याचे कारण पुढे करीत तडजोड शुल्कात मोठ्याप्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला, तशी सभागृहातही घोषणा करण्यात आली. त्यानुसार मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम २०० मधील तरतुदीनुसार दंडाची रक्कम वाढविण्याबाबतची अधिसूचना ४ आॅगस्ट रोजी निघाली. मात्र नागपुरात ती लागू करण्यास उशीर होत होता. अखेर पोलीस आयुक्तांनी या संदर्भात नुकतेच निर्देश दिले. त्यानुसार स्वातंत्र्य दिनानंतर ते लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे १६ आॅगस्टपासून वाहन चालविण्याच्या बेशिस्तीला लगाम लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी) यांना असणार ५०० रुपये दंड आता दुचाकी चालकाने व मागे बसणाऱ्याने हेल्मेट न घालणे, विना वाहन परवाना (लायसन्स) वाहन चालविणे, शारीरिक वा मानसिकदृष्ट्या अपात्र असताना वाहन चालविणे, अधिकाऱ्यांच्या सूचनांचे उल्लघंन करणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर एक हजार रुपये दंड अतिवेगाने वाहन चालविणे, वाहनावर ‘फॅन्सी’ नंबर प्लेट बसविणे, दादा, मामा, भाई, बाबा अशा अक्षरांमध्ये नंबर प्लेट रंगविणे, वाहनांवर ‘रिफ्लेक्टर्स’ किंवा ‘टेल लाईट नसणे’, वाहनात अवैध बदल करणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यांना बसणार दोन हजार रुपये भुर्दंड वाहनांची शर्यत लावणे, विना नोंदणी चारचाकी वाहन चालविणे व विमा (इन्शुरन्स) नसताना वाहन चालविणाऱ्यास दोन हजार रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. स्वातंत्र्यदिनानंतर नव्या दंडाची रक्कम वसूल करणार पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार स्वातंत्र्यदिनानंतर जो वाहतूक नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्याकडून नव्या तडजोड शुल्काची (दंड) रक्कम वसूल केली जाणार आहे. या संदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन आहे. - स्नार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक शहर