शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

‘नीट’ रद्द झाल्यास डोनेशनराज सुरू होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे कारण समोर करीत तमिळनाडूमध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे कारण समोर करीत तमिळनाडूमध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक संमत झाले. या निर्णयामुळे देशभरातील विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इतर राज्यांतदेखील असेच झाले तर गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढतील व परत डोनेशनराज सुरू होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश व्हावेत यासाठी ‘नीट’ परीक्षा कायम ठेवावी, असाच सूर विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांकडून येत आहे.

काय आहे तमिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?

नीट परीक्षेच्या १९ तास आधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद संपूर्ण तमिळनाडूमध्ये उमटले. केंद्राची नीट परीक्षा नकोच अशीच मागणी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी केली. त्याचाच परिणाम म्हणून सोमवारी नीट परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तमिळनाडू विधानसभेत संमत झाले. त्या राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाठी केंद्रीय नीटची गरज नाही, असाच या कायद्याचा अर्थ आहे. या विधेयकाद्वारे सरकारी व खासगी संस्थांमध्ये वैद्यकीय पदवीच्या जागांसाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. तसेच सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ७.५ टक्के प्राधान्य असेल.

प्रतिभावंतांवर अन्याय होईल

नीट रद्द करणे म्हणजे प्रतिभावंतांवर अन्याय व आदर्श विद्यार्थ्यांची प्रतिमा नष्ट करण्याचा प्रकार आहे. खासगी महाविद्यालयांची डोनेशनची पद्धती नीटमुळे नियंत्रणात आली होती, ती फोफावण्याचा धोका आहे. तमिळनाडूत सर्वच पक्षांतील बऱ्याच राजकीय नेत्यांची वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

- जगदीश अग्रवाल, नीट मार्गदर्शक

धक्कादायक निर्णय

नीट न देता वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश देण्याचा प्रकार परत जुन्या काळात घेऊन जाणारा ठरेल. मुळात प्रवेशासाठी गुणवत्ता महत्त्वाची ठरते व ती ‘नीट’मधून पारखता येते. प्रवेशपरीक्षा न देता तर अगदी काठावर पास होणारेदेखील डोनेशन देऊन प्रवेश घेऊ शकतील.

- विवेक पांडे, विद्यार्थी

महाराष्ट्राने अनुकरण करायला नको

नीटमुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे समान पद्धतीने मूल्यमापन होत होते. जर नीटऐवजी राज्यपातळीवर दुसरी प्रवेश परीक्षा सुरू केली तर त्याचा फटका विद्यार्थ्यांनाच बसेल. तमिळनाडू सरकारने अतिशय चुकीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राने याचे अनुकरण करायला नको.

- निर्मयी पाटील, विद्यार्थिनी