शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

तर भूसंपादन प्रक्रिया रद्द

By admin | Updated: January 3, 2015 02:25 IST

अवॉर्ड जारी झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत जमीन मालकाला मोबदला न दिल्यास भूसंपादनाची प्रक्रिया आपोआप रद्द होते असा महत्त्वपूर्ण खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला आहे.

राकेश घानोडे नागपूरअवॉर्ड जारी झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत जमीन मालकाला मोबदला न दिल्यास भूसंपादनाची प्रक्रिया आपोआप रद्द होते असा महत्त्वपूर्ण खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला आहे. या निर्णयामुळे भूसंपादन झाल्यानंतर मोबदल्याची प्रतीक्षा करीत असलेल्या असंख्य जमीन मालकांच्या मनातील प्रश्नांना उत्तर मिळाले आहे.वर्धा येथील एका प्रकरणात शासनाने अवॉर्ड जारी झाल्यानंतर पाच वर्षांत जमीन मालकांना मोबदला दिला नव्हता. यामुळे तीन जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व चंद्रकांत भडंग यांनी याचप्रकरणावर निर्णय देताना वरीलप्रमाणे खुलासा केला. राज्यात १ जानेवारी २०१४ पासून ‘रास्त मोबदला व भूसंपादनात पारदर्शकता, पुनर्वसन व पुन:स्थापना अधिकार कायदा-२०१३’ लागू झाला आहे. कायद्यातील कलम २४ (२) अनुसार भूसंपादनाचा अवॉर्ड जारी झाल्यानंतर जमीन मालकाला पाच वर्षात मोबदला देणे आवश्यक आहे. अन्यथा भूसंपादन प्रक्रिया रद्द होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘श्री बालाजीनगर रहिवासी संघटना वि. तामिळनाडू शासन व इतर’ आणि ‘राम किशन व इतर वि. हरयाणा शासन व इतर’ प्रकरणात ही बाब स्पष्ट केली असल्याचेही उच्च न्यायालयाने निर्णयात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)याचिकाकर्त्यांचे प्रकरणविशेष भूसंपादन अधिकाऱ्याने १५ जानेवारी २००२ रोजी कायद्याच्या कलम ११ अंतर्गत याचिकाकर्त्यांना अवॉर्ड जारी केला होता. यानंतर याचिकाकर्त्यांना अनेक प्रयत्न करूनही मोबदला मिळाला नाही. यामुळे त्यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. भूसंपादनाला १२ वर्षे लोटूनही ते मोबदल्यापासून वंचित होते. भूसंपादनाची गरज संपल्यामुळे शासनानेदेखील त्यांची जमीन ताब्यात घेतली नव्हती. जमिनीवर याचिकाकर्त्यांचाच ताबा होता. न्यायालयाने कायद्यातील तरतूद व याचिकेतील तथ्ये पाहता याचिका खारीज केली.