शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

मुलगा नालायक असेल तर, एफआयआर दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST

नागपूर : ७० वर्षांच्या वडिलांना मुलगा आणि सुनेने फ्लॅटमधून धक्के मारून घालवले, प्लाॅटची किंमत देऊनही बिल्डर रजिस्ट्री करून देत ...

नागपूर : ७० वर्षांच्या वडिलांना मुलगा आणि सुनेने फ्लॅटमधून धक्के मारून घालवले, प्लाॅटची किंमत देऊनही बिल्डर रजिस्ट्री करून देत नाही, भाडेकरू घर रिकामे करीत नाही, सायबर गुन्हेगारांनी रक्कम काढून घेतली, तक्रार करूनही पोलीस कारवाईसाठी टाळाटाळ करतात, यासारख्या अनेक तक्रारी घेऊन नागरिकांनी गुरुवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना व्यथा ऐकविल्या. गंभीर प्रकरणांमध्ये त्यांनी तातडीने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले, तर तांत्रिक पेच असणाऱ्या प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा किंवा न्यायालयाकडे दाद मागण्याचा सल्ला दिला. नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला होता. जमिनीच्या वादाशी संबंधित अधिक तक्रारी होत्या. बजाज नगर येथील ७० वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने फ्लॅट खरेदी केला होता. पाच वर्षापूर्वी पत्नीचा आजारपणामुळे मृत्यू झालेला. कुटुंबात मुलगा आणि सून आहेत. मात्र या दोघांनीही पित्याला घराबाहेर काढले. बजाज नगर पोलीस ठाण्यात तक्रार करूनही कारवाई झाली नाही. आपबिती सांगून वडिलाने फ्लॅटमध्ये राहण्याची इच्छा पोलीस आयुक्तांपुढे व्यक्त केली. यावर आयुक्त म्हणाले, मुलगा नालायक असेल तर त्याच्याविरूद्ध एफआयआर दाखल करा. मेंटेनन्स अँड वेलफेयर ऑफ पॅरेन्टस्‌ अँड सिनियर सिटीजन ॲक्ट अंतर्गत पालकांची देखभाल करण्याची जबाबदारी मुलांची आहे. आपल्या घरात राहण्याचा अधिकार वृद्ध पित्याला आहे.

रंजन पाठक म्हणाल्या, ऑनलाईन जेवण मागण्याच्या नादात खात्यातून १५ हजार रुपये उडविले. १५ मिनिटात कोतवाली पोलिसात पोहचून तक्रार दिली, सायबर सेललाही कळविले, पण कारवाई झाली नाही. पोलिसांनी गुन्हाही दाखल करून घेतला नाही. यावर कोतवालीचे पीआय मुकुंद ठाकरे तसेच सायबर सेलचे अशोक बागुल यांच्याकडे आयुक्तांनी विचारणा केली. त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. यावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त करून तातडीने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. पूर्ण रक्कम देऊनही ले-आऊटधारक प्लाॅटची रजिस्ट्री करण्याचे टाळत असल्याची खान यांची तक्रार होती. घराची विक्री करूनही बिल्डर ९८ लाख रुपये देण्यास टाळटाळ करीत असल्याची

मनीष पिल्ले यांची तक्रार होती. यासह अनेक तक्रारी तर पोलिसांच्या विरोधातही होत्या. या सर्वांची दखल अमितेशकुमार यांनी घेतली.

...

दीड महिन्यात ३,१०० तक्रारींचा निपटारा

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, जनतेच्या माध्यमातून तक्रारी तातडीने निकाली काढणे हा उद्देश आहे. दीड वर्षापूर्वी शहरातील ठाण्यांमध्ये ४,८०० तक्रारी होत्या. विशेष मोहीम चालवून ३,१०० तक्रारी निकाली काढल्या. प्रत्येक प्रकरणात ९० दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. तपासकार्यातील सुधारणेसाठी पीएसआय किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपास सोपविण्याची पद्धत अवलंबिली. तक्रार निवारण दिवसात १५८ तक्रारी आल्या. ११५ लोकांनी व्यक्तीश: उपस्थित राहून तक्रार नोंदविली. अनेक तक्रारी कितीतरी वर्षांपासून प्रलंबित होत्या. यावेळी शहर पोलीस विभागातील सर्व अपर आयुक्त, उपायुक्त, एसीपी, ठाणेदार उपस्थित होते.