शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

कटुता संपली नाही तर पुढील पिढ्यांचे नुकसान !

By admin | Updated: June 4, 2016 02:38 IST

काश्मीर मुद्दा हा भारत-पाकिस्तान मधील समस्येचे मूळ आहे. या मुद्यावर दोन्ही देशांनी शांतपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.

अब्दुल बासित : दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानची कडक भूमिकानागपूर : काश्मीर मुद्दा हा भारत-पाकिस्तान मधील समस्येचे मूळ आहे. या मुद्यावर दोन्ही देशांनी शांतपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे, अशी भूमिका पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी यावेळी मांडली. भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान शांती प्रस्थापित व्हावी हेच उद्दिष्ट असले पाहिजे. यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. जर दोन्ही देशांमधील कटुता संपली नाही तर पुढील पिढ्यांचे नुकसान होईल. भारत-पाक संबंध तुटता तुटत नाहीत आणि दोन्ही देश सोबतही राहत नाहीत. दोन्ही देशांमधील दळणवळण सुविधा सुधारणे, पाकिस्तानचे चित्रपट तेथील मालिका भारतामध्ये दाखविल्या जाणे तसेच दोन्ही देशांमध्ये ‘व्हिसा’ची संख्या वाढविणे यासारख्या लहान लहान पुढाकारातून सकारात्मक वातावरण निर्मिती होऊ शकते, असा विश्वास अब्दुल बासित यांनी व्यक्त केला. ‘इंडिया अ‍ॅन्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’चे आयोजन’दहशतवाद पाकिस्तानच्या प्रगतीतील अडथळाभारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर काही वर्षांतच हे देश एकत्र येतील असे अनेकांना वाटायचे. सुरुवातीच्या वर्षांमध्ये पाकिस्तानने फार वेगाने प्रगती केली. १९७० च्या दशकात तर पाकिस्तानचा विकास दर भारत आणि चीनपेक्षा जास्त होता. परंतु दहशतवादामुळे आमचे फार नुकसान झाले, असे अब्दुल बासित म्हणाले. पाकिस्तानमध्ये सोने, गॅस, दूध व इतर नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु जोपर्यंत देशात शांती प्रस्थापित होत नाही तोपर्यंत हवी तशी प्रगती करता येणे शक्य नाही, असे ते म्हणाले. प्रत्येक वेळी भारतात कुठला हल्ला झाला की पाकिस्तानकडे बोट दाखविण्यात येते. परंतु आम्हीदेखील दहशतावादाच्या विरोधातच लढतो आहोत, हे लक्षात घ्यायला हवे, असे बासित यांनी प्रतिपादन केले.अफगाणिस्तान चिंतेचा विषय१९७९ मध्ये सोव्हियत युनियनने अफगाणिस्तानवर हल्ला केला व त्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतवाद वाढीस लागला. अमेरिकेतील ९/११ नंतर तर स्थिती आणखी खराब झाली. अफगाणिस्तानातील दहशतवादाचा सर्वात जास्त आम्हाला फटका बसला. सुमारे ३० लाख अफगाण शरणार्थी पाकिस्तानातील शरणार्थी शिबिरांमध्ये राहत आहेत. दहशतवादामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरदेखील परिणाम झाला. पाकिस्तान भारतासोबत संबंध सुधारावे यासाठी एकवेळ प्रतीक्षा करु शकतो परंतु अफगाणिस्तानमुळे निर्माण झालेली समस्या दूर करणे ही आमची प्राथमिकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.संबंध सुधारतीलदोन्ही देशांमध्ये अविश्वासाचे वातावरण आहे. हा अविश्वास आजच्या परिस्थितीमुळे आहे की १९४७, १९६५ व १९७१ च्या युद्धांमुळे आहे याचा विचार करण्याची गरज आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीनंतर संबंध सुधारण्याची आशा निर्माण झाली होती. परंतु पठाणकोट हल्ल्यामुळे त्यात अडथळे आले. २६/११ प्रमाणे पठाणकोट हल्ल्यावरची प्रतिक्रिया तीव्र नव्हती असे म्हणताना हे संबंध परत सुधारतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.