शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कटुता संपली नाही तर पुढील पिढ्यांचे नुकसान !

By admin | Updated: June 4, 2016 02:38 IST

काश्मीर मुद्दा हा भारत-पाकिस्तान मधील समस्येचे मूळ आहे. या मुद्यावर दोन्ही देशांनी शांतपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.

अब्दुल बासित : दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानची कडक भूमिकानागपूर : काश्मीर मुद्दा हा भारत-पाकिस्तान मधील समस्येचे मूळ आहे. या मुद्यावर दोन्ही देशांनी शांतपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे, अशी भूमिका पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी यावेळी मांडली. भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान शांती प्रस्थापित व्हावी हेच उद्दिष्ट असले पाहिजे. यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. जर दोन्ही देशांमधील कटुता संपली नाही तर पुढील पिढ्यांचे नुकसान होईल. भारत-पाक संबंध तुटता तुटत नाहीत आणि दोन्ही देश सोबतही राहत नाहीत. दोन्ही देशांमधील दळणवळण सुविधा सुधारणे, पाकिस्तानचे चित्रपट तेथील मालिका भारतामध्ये दाखविल्या जाणे तसेच दोन्ही देशांमध्ये ‘व्हिसा’ची संख्या वाढविणे यासारख्या लहान लहान पुढाकारातून सकारात्मक वातावरण निर्मिती होऊ शकते, असा विश्वास अब्दुल बासित यांनी व्यक्त केला. ‘इंडिया अ‍ॅन्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’चे आयोजन’दहशतवाद पाकिस्तानच्या प्रगतीतील अडथळाभारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर काही वर्षांतच हे देश एकत्र येतील असे अनेकांना वाटायचे. सुरुवातीच्या वर्षांमध्ये पाकिस्तानने फार वेगाने प्रगती केली. १९७० च्या दशकात तर पाकिस्तानचा विकास दर भारत आणि चीनपेक्षा जास्त होता. परंतु दहशतवादामुळे आमचे फार नुकसान झाले, असे अब्दुल बासित म्हणाले. पाकिस्तानमध्ये सोने, गॅस, दूध व इतर नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु जोपर्यंत देशात शांती प्रस्थापित होत नाही तोपर्यंत हवी तशी प्रगती करता येणे शक्य नाही, असे ते म्हणाले. प्रत्येक वेळी भारतात कुठला हल्ला झाला की पाकिस्तानकडे बोट दाखविण्यात येते. परंतु आम्हीदेखील दहशतावादाच्या विरोधातच लढतो आहोत, हे लक्षात घ्यायला हवे, असे बासित यांनी प्रतिपादन केले.अफगाणिस्तान चिंतेचा विषय१९७९ मध्ये सोव्हियत युनियनने अफगाणिस्तानवर हल्ला केला व त्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतवाद वाढीस लागला. अमेरिकेतील ९/११ नंतर तर स्थिती आणखी खराब झाली. अफगाणिस्तानातील दहशतवादाचा सर्वात जास्त आम्हाला फटका बसला. सुमारे ३० लाख अफगाण शरणार्थी पाकिस्तानातील शरणार्थी शिबिरांमध्ये राहत आहेत. दहशतवादामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरदेखील परिणाम झाला. पाकिस्तान भारतासोबत संबंध सुधारावे यासाठी एकवेळ प्रतीक्षा करु शकतो परंतु अफगाणिस्तानमुळे निर्माण झालेली समस्या दूर करणे ही आमची प्राथमिकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.संबंध सुधारतीलदोन्ही देशांमध्ये अविश्वासाचे वातावरण आहे. हा अविश्वास आजच्या परिस्थितीमुळे आहे की १९४७, १९६५ व १९७१ च्या युद्धांमुळे आहे याचा विचार करण्याची गरज आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीनंतर संबंध सुधारण्याची आशा निर्माण झाली होती. परंतु पठाणकोट हल्ल्यामुळे त्यात अडथळे आले. २६/११ प्रमाणे पठाणकोट हल्ल्यावरची प्रतिक्रिया तीव्र नव्हती असे म्हणताना हे संबंध परत सुधारतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.