शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

‘...तर आरोपीला पूर्ण निर्दोष सोडायला हवे’

By admin | Updated: April 10, 2017 03:39 IST

सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरला असेल तर, आरोपीला पूर्णपणे निर्दोष सोडत असल्याचा निर्णय

नागपूर : सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरला असेल तर, आरोपीला पूर्णपणे निर्दोष सोडत असल्याचा निर्णय द्यायला हवा. अशा प्रकरणात आरोपीला संशयाचा लाभ देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.आरोपीला पूर्ण निर्दोष ठरविणे व संशयाचा लाभ देऊन निर्दोष सोडणे यात फरक आहे. सरकारी पक्षाने गुन्हा सिद्ध केला असेल आणि त्या प्रकरणात गंभीर त्रुटी आढळल्या असेल तर, अशा वेळी आरोपीला संशयाचा लाभ देऊन निर्दोष सोडण्याचा निर्णय दिला जाऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती इंदिरा जैन यांनी अत्याचार प्रकरणात बडतर्फ झालेले सुरक्षा अधिकारी भूपेश मेश्राम यांच्या खटल्यात हा निर्वाळा दिला. ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात सहायक कमांडंट होते. एका प्रकरणात गुन्हा सिद्ध करणारा ठोस पुरावा नसताना १९ डिसेंबर २०१५ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने मेश्राम यांना संशयाचा लाभ देऊन निर्दोष सोडत असल्याचा निर्णय दिला होता. परिणामी संशयाच्या आधारावर निर्दोष सुटल्याचे कारण सांगून, त्यांना नोकरीवर घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे मेश्राम यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, वरीलप्रमाणे निर्वाळा देऊन मेश्राम यांना संशयाच्या आधारावर निर्दोष सोडण्याचे सत्र न्यायालयाचे निरीक्षण रद्द केले.असे आहे प्रकरणसरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, मेश्राम २००२मध्ये ‘एमपीएससी’चे शिकवणी वर्ग घेत होते. पीडित मुलीने जानेवारी-२००७मध्ये शिकवणी वर्गात प्रवेश घेतला होता. यादरम्यान मेश्राम यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. मुलगी खासगी नोकरी करीत होती. मेश्राम यांनी तिला नोकरी सोडायला लावली. भाड्याच्या खोलीत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. २००८मध्ये मुलीची पोलीस विभागात निवड झाली. त्यानंतरही मेश्राम यांनी तिच्यावर अत्याचार केला. परिणामी मुलगी गर्भवती राहिली. मेश्राम यांनी तिचा गर्भपात केला.शेवटी मुलीने २८ जानेवारी २०११ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मेश्राम यांच्याविरुद्ध तक्रार दिली. मुलीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या प्रमुखांकडेही तक्रार दिली होती. त्यावरून मेश्राम यांना गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच बडतर्फ करण्यात आले.