शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

विचारवंतांची हत्या ही वैचारिक कट्टरताच

By admin | Updated: September 21, 2015 03:16 IST

दाभोलकर, पानसरे आणि त्यानंतर कलबुर्गी या पुरोगामी विचारांच्या लोकांची हत्या करण्यात आल्याने समाजमन ढवळून निघाले आहे.

हत्येचे राजकारण - राजकारणाची हत्या विषयावर परिसंवाद : मान्यवरांचे मतनागपूर : दाभोलकर, पानसरे आणि त्यानंतर कलबुर्गी या पुरोगामी विचारांच्या लोकांची हत्या करण्यात आल्याने समाजमन ढवळून निघाले आहे. विचारांचा विरोध हा तात्त्विक मुद्यांवर आणि वैचारिक पातळीवरच व्हायला हवा. पण वैचारिक विरोध करण्याऐवजी विचारवंत, लेखकांची हत्या करणे हा कट्टरतावादच आहे. धार्मिक श्रद्धांचे अवडंबर सध्या माजले आहे आणि धर्मांमध्ये अहमहमिका निर्माण झाल्याने आपले तेच चांगले हे सांगण्याचा अट्टाहास वाढतो आहे. या हत्यांच्या मागे हेच राजकारण असून ही बाब सर्वच धर्मांना आणि समाजाला मारक आहे. इतरांच्या विचारांचा आदर करून आपले म्हणणे समजून सांगणारा विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ निकोप समाज निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत, यासंदर्भात चर्चासत्रात साधकबाधक चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने ‘हत्येचे राजकारण राजकारणाची हत्या’ विषयावर चर्चेचे आयोजन शंकरनगर येथील राष्ट्रभाषा भवनाच्या चिंतनकक्षात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या माजी तत्त्वज्ञान विभागप्रमुख सुनीती देव तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रमोद मुनघाटे, रमेश बोरकुटे उपस्थित होते. याप्रसंगी रमेश विचारे, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. भूषण रामटेके, अजय शाहू, अशोक नाफडे, जयंत कुळकर्णी, मोकाशी, धनंजय मांडवकर आदींनी प्रमुख अतिथींसह विचार व्यक्त केले. कट्टरतावादामागे धर्म आणि धार्मिक श्रद्धांचाच मोठा भाग असल्याचा विचार यावेळी प्रामुख्याने समोर आला. देव म्हणाल्या, धर्म आणि देव मानवनिर्मित आहे. धर्माचा संबंध श्रद्धेशी येतो आणि श्रद्धा अंधच असते. त्यामुळे घोळ होतो. यासाठीच धर्मचिकित्सा विवेकवादी, विज्ञाननिष्ठ समाजाची गरज आहे. हिंसा हे कुठल्याच प्रश्नाचे उत्तर होऊ शकत नाही. बोरुकुटे म्हणाले, धर्माची दहशत ग्रामीण समाजात आहे, यातूनच एकारलेपणा वाढतो आहे. डॉ. मुनघाटे म्हणाले, सामाजिक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून अभ्यासक्रमातून प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. त्याशिवाय विज्ञाननिष्ठ समाजनिर्मिती होणार नाही. नितनवरे म्हणाले, आपापल्या वैचारिक छावण्या बाजूला ठेवून या प्रश्नाचे उत्तर सर्वांनीच शोधावे कारण या हत्या सर्वच धर्मांना मारक आहेत. रामटेके यांनी कृती कार्यक्रम राबविण्यावर भर दिला. याप्रसंगी सर्वच वक्त्यांनी अतिशय महत्त्वाची मते व्यक्त करून या चर्चेला वेगवेगळे आयाम दिले. प्रास्ताविक रमेश बोरकुटे तर आभार डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी मानले.