शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

विचारवंतांची हत्या ही वैचारिक कट्टरताच

By admin | Updated: September 21, 2015 03:16 IST

दाभोलकर, पानसरे आणि त्यानंतर कलबुर्गी या पुरोगामी विचारांच्या लोकांची हत्या करण्यात आल्याने समाजमन ढवळून निघाले आहे.

हत्येचे राजकारण - राजकारणाची हत्या विषयावर परिसंवाद : मान्यवरांचे मतनागपूर : दाभोलकर, पानसरे आणि त्यानंतर कलबुर्गी या पुरोगामी विचारांच्या लोकांची हत्या करण्यात आल्याने समाजमन ढवळून निघाले आहे. विचारांचा विरोध हा तात्त्विक मुद्यांवर आणि वैचारिक पातळीवरच व्हायला हवा. पण वैचारिक विरोध करण्याऐवजी विचारवंत, लेखकांची हत्या करणे हा कट्टरतावादच आहे. धार्मिक श्रद्धांचे अवडंबर सध्या माजले आहे आणि धर्मांमध्ये अहमहमिका निर्माण झाल्याने आपले तेच चांगले हे सांगण्याचा अट्टाहास वाढतो आहे. या हत्यांच्या मागे हेच राजकारण असून ही बाब सर्वच धर्मांना आणि समाजाला मारक आहे. इतरांच्या विचारांचा आदर करून आपले म्हणणे समजून सांगणारा विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ निकोप समाज निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत, यासंदर्भात चर्चासत्रात साधकबाधक चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने ‘हत्येचे राजकारण राजकारणाची हत्या’ विषयावर चर्चेचे आयोजन शंकरनगर येथील राष्ट्रभाषा भवनाच्या चिंतनकक्षात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या माजी तत्त्वज्ञान विभागप्रमुख सुनीती देव तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रमोद मुनघाटे, रमेश बोरकुटे उपस्थित होते. याप्रसंगी रमेश विचारे, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. भूषण रामटेके, अजय शाहू, अशोक नाफडे, जयंत कुळकर्णी, मोकाशी, धनंजय मांडवकर आदींनी प्रमुख अतिथींसह विचार व्यक्त केले. कट्टरतावादामागे धर्म आणि धार्मिक श्रद्धांचाच मोठा भाग असल्याचा विचार यावेळी प्रामुख्याने समोर आला. देव म्हणाल्या, धर्म आणि देव मानवनिर्मित आहे. धर्माचा संबंध श्रद्धेशी येतो आणि श्रद्धा अंधच असते. त्यामुळे घोळ होतो. यासाठीच धर्मचिकित्सा विवेकवादी, विज्ञाननिष्ठ समाजाची गरज आहे. हिंसा हे कुठल्याच प्रश्नाचे उत्तर होऊ शकत नाही. बोरुकुटे म्हणाले, धर्माची दहशत ग्रामीण समाजात आहे, यातूनच एकारलेपणा वाढतो आहे. डॉ. मुनघाटे म्हणाले, सामाजिक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून अभ्यासक्रमातून प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. त्याशिवाय विज्ञाननिष्ठ समाजनिर्मिती होणार नाही. नितनवरे म्हणाले, आपापल्या वैचारिक छावण्या बाजूला ठेवून या प्रश्नाचे उत्तर सर्वांनीच शोधावे कारण या हत्या सर्वच धर्मांना मारक आहेत. रामटेके यांनी कृती कार्यक्रम राबविण्यावर भर दिला. याप्रसंगी सर्वच वक्त्यांनी अतिशय महत्त्वाची मते व्यक्त करून या चर्चेला वेगवेगळे आयाम दिले. प्रास्ताविक रमेश बोरकुटे तर आभार डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी मानले.