शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

थंड डोक्याने कट रचला होता

By admin | Updated: May 6, 2016 02:55 IST

घटनाक्रम लक्षात घेता आरोपींनी युगचे अपहरण व हत्येचा अत्यंत थंड डोक्याने कट रचला होता हे सिद्ध होते,

कट रचूनच युगची हत्यानागपूर : घटनाक्रम लक्षात घेता आरोपींनी युगचे अपहरण व हत्येचा अत्यंत थंड डोक्याने कट रचला होता हे सिद्ध होते, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला आहे. शासनातर्फे उच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील भारती डांगरे व जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. ज्योती वजानी, युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्यातर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा तर, आरोपींतर्फे अ‍ॅड. मिर नगमान अली व अ‍ॅड. चेतन ठाकूर यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)काय म्हणाले हायकोर्टहायकोर्टाने आरोपींना फाशीची शिक्षा देताना अत्यंत मार्मिक शब्दांत भावना व्यक्त केल्या. हायकोर्ट म्हणाले, एका निरागस मुलाचे जीवन उमलण्यापूर्वीच हिरावून घेणाऱ्या आरोपींबाबत दया दाखविण्याची अपेक्षा समाज आमच्याकडून करेल अशी ही घटना आहे काय? रात्रभरात श्रीमंत होण्याच्या हव्यासाने एका अल्पवयीन मुलाचा व त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा छळ करणाऱ्या आरोपींना केवळ साधी जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी अपेक्षा समाज आमच्याकडून करेल काय? ही घटना घडल्यानंतर संपूर्ण प्रदेशातील समाजमनाला जोरदार धक्का बसला हे सर्वांनाच माहीत आहे. या घटनेमुळे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आई मुलांना शाळेत पाठविण्यास घाबरत होत्या. मुलाला शाळेत पाठविल्यानंतर तो घरी परत येईल की नाही अशी भीती त्यांना वाटत होती. या घटनेनंतर संपूर्ण समाजाने आंदोलने केली होती. कॅन्डल मार्च काढले होते. काय समाजाचा अंतरात्मा न्यायालयाने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करावे, अशी अपेक्षा करेल? आम्हाला असे वाटते की, अशा निर्घृण घटनेतील आरोपींना समाज कधीच क्षमा करणार नाही आणि त्यांना कठोरतेने हाताळले जावे अशीच एकूण समाजाची अपेक्षा आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे समजून आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी हीच याप्रकरणात समाजाची मागणी असल्याचे गृहित धरण्यात आम्हाला काहीच संकोच वाटत नाही.