शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

थंड डोक्याने कट रचला होता

By admin | Updated: May 6, 2016 02:55 IST

घटनाक्रम लक्षात घेता आरोपींनी युगचे अपहरण व हत्येचा अत्यंत थंड डोक्याने कट रचला होता हे सिद्ध होते,

कट रचूनच युगची हत्यानागपूर : घटनाक्रम लक्षात घेता आरोपींनी युगचे अपहरण व हत्येचा अत्यंत थंड डोक्याने कट रचला होता हे सिद्ध होते, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला आहे. शासनातर्फे उच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील भारती डांगरे व जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. ज्योती वजानी, युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्यातर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा तर, आरोपींतर्फे अ‍ॅड. मिर नगमान अली व अ‍ॅड. चेतन ठाकूर यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)काय म्हणाले हायकोर्टहायकोर्टाने आरोपींना फाशीची शिक्षा देताना अत्यंत मार्मिक शब्दांत भावना व्यक्त केल्या. हायकोर्ट म्हणाले, एका निरागस मुलाचे जीवन उमलण्यापूर्वीच हिरावून घेणाऱ्या आरोपींबाबत दया दाखविण्याची अपेक्षा समाज आमच्याकडून करेल अशी ही घटना आहे काय? रात्रभरात श्रीमंत होण्याच्या हव्यासाने एका अल्पवयीन मुलाचा व त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा छळ करणाऱ्या आरोपींना केवळ साधी जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी अपेक्षा समाज आमच्याकडून करेल काय? ही घटना घडल्यानंतर संपूर्ण प्रदेशातील समाजमनाला जोरदार धक्का बसला हे सर्वांनाच माहीत आहे. या घटनेमुळे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आई मुलांना शाळेत पाठविण्यास घाबरत होत्या. मुलाला शाळेत पाठविल्यानंतर तो घरी परत येईल की नाही अशी भीती त्यांना वाटत होती. या घटनेनंतर संपूर्ण समाजाने आंदोलने केली होती. कॅन्डल मार्च काढले होते. काय समाजाचा अंतरात्मा न्यायालयाने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करावे, अशी अपेक्षा करेल? आम्हाला असे वाटते की, अशा निर्घृण घटनेतील आरोपींना समाज कधीच क्षमा करणार नाही आणि त्यांना कठोरतेने हाताळले जावे अशीच एकूण समाजाची अपेक्षा आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे समजून आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी हीच याप्रकरणात समाजाची मागणी असल्याचे गृहित धरण्यात आम्हाला काहीच संकोच वाटत नाही.