शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

आयसीयूचे बांधकाम संथगतीने

By admin | Updated: November 2, 2016 02:30 IST

मेडिकलमध्ये २०११ मध्ये तीन कोटी रुपये खर्चून तीन विविध विभागाचे प्रत्येकी एक अतिदक्षता विभाग (आयसीयू) होणार होते.

मेडिकल : २५०८ चौरस मीटर जागेवर होत आहे बांधकामनागपूर : मेडिकलमध्ये २०११ मध्ये तीन कोटी रुपये खर्चून तीन विविध विभागाचे प्रत्येकी एक अतिदक्षता विभाग (आयसीयू) होणार होते. परंतु बांधकामाच्या जागेला घेऊन तत्काळ निर्णय होऊ न शकल्याने तब्बल तीन वर्षे बांधकाम रखडले. डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे अधिष्ठातापदाची सूत्रे येताच त्यांनी या विभागाचे बांधकाम हाती घेतले. जागेचे क्षेत्रफळ वाढवून सुधारित १२ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली. २८ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधकामाचे भूमिपूजनही झाले. परंतु पाच महिन्याचा कालावधी होत असताना बांधकामाला अद्यापही वेग आला नाही. मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) केवळ औषध वैद्यकशास्त्र विभागाचे आयसीयू आहे. मात्र, इतर विभागातील गंभीर रुग्णही येथेच ठेवले जात असल्याने हा विभाग नेहमीच फुल्ल असतो. अनेक वेळा बाहेरून येणाऱ्या गंभीर रुग्णांना खाटा नसल्याचे कारण सांगून खासगी रुग्णालयात पाठविण्याचे प्रकारही झाले. याची दखल घेत मेडिकल प्रशासनाने २०११ मध्ये पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत १५० कोटींच्या योजनेत ‘सर्जिकल इन्टेन्सिव्ह केअर युनिट’, ‘मेडिसीन इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ आणि ‘नवजात शिशू इन्टेन्सिव्ह केअर युनिट’साठी ‘आयसीयू’च्या बांधकामाचा प्रस्ताव तयार केला. त्यावेळी हा प्रस्ताव १६९० चौरस मीटर जागेवर होणार होता. अपेक्षित खर्च ३ कोटी ४२ लाख २१ हजार रुपयांचा होता. विशेष म्हणजे, याला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. परंतु मेडिकलच्या २०० एकरच्या परिसरात या बांधकामासाठी जागा पाहायला तब्बल तीन वर्षे गेली. अखेर वॉर्ड क्र. ५ च्या मागील परिसरातील मोकळ्या जागेला बांधकाम विभागाने मंजुरी दिली. दरम्यान, डॉ. निसवाडे यांच्याकडे अधिष्ठातापदाची जबाबदारी येताच त्यांनी २५०८ चौरस मीटरपर्यंत बांधकामाचे क्षेत्र वाढविले. १२ कोटी ६ लाख ४३ हजार रुपयांचा हा सुधारित प्रस्ताव डीएमईआरकडे पाठविला. हिवाळी अधिवेशनातही या प्रस्तावावर चर्चा झाली. अखेर याला मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मे महिन्यात भूमिपूजन झाले. बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध असताना बांधकामाला अद्यापही गती आली नाही. यामुळे मुदतीत हे काम पूर्ण न होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास गंभीर रुग्णांना आणखी काही काळ अद्ययावत उपचारापासून वंचित राहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)