शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

प्रवृत्त करीत नाही तो विचारच कसला

By admin | Updated: October 19, 2015 02:59 IST

वैचारिक लिखाण हे जोखमीचे काम आहे. यात संबंधित लेखकास त्या विषयाचे आणि त्या विषयाशी संबंधीत सर्व क्षेत्राचे ज्ञान असावयास हवे.

गंगाधर पानतावणे : अशोक गोडघाटे यांच्या चार ग्रंथांचे प्रकाशननागपूर : वैचारिक लिखाण हे जोखमीचे काम आहे. यात संबंधित लेखकास त्या विषयाचे आणि त्या विषयाशी संबंधीत सर्व क्षेत्राचे ज्ञान असावयास हवे. परंतु जो विचार नवे काहीच देत नाही, वाचकाला प्रवृत्तही करीत नाही, असा विचार विचारच नसतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक तथा ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केले.विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात प्रा. अशोक गोडघाटे यांच्या ‘मानव मुक्तीचा मार्गदाता भगवान बुद्ध’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक आव्हान’, ‘सामाजिक सांस्कृतिक जाणिवा’ आणि ‘दलितांचा विचार संघर्ष या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बुद्ध-आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे भाष्यकार भंते विमलकित्ती गुणसिरी होते. व्यासपीठावर प्रा. रत्नाकर मेश्राम यांची उपस्थिती होती. गंगाधर पानतावणे म्हणाले, काही लेखक मूळ विषयाबाबत विचार व्यक्त न करता त्या विषयाच्या काठावरचे विचार मांडतात. त्यांचे विचार भविष्यात असत्य ठरतात. परंतु अशोक गोडघाटेंच्या ग्रंथात विचारवैभव आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनात जसजसे वाचन करतो तसे नवनवे प्रतीत होते. ते संदर्भाशिवाय कधीच बोलले नाही, हे तरुण लेखकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. आत्मगौरव करणाऱ्या लेखनाने प्रतिमा निर्मिती होत नाही. त्यामुळे क्षणापुरता आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. भंते विमलकित्ती गुणसिरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समता, न्यायाचा विचार गोडघाटेंच्या पुस्तकातून मांडण्यात आल्याचे सांगितले. अशोक गोडघाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ओझरत्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न या ग्रंथातून केल्याचे सांगितले. कार्यक्रमात पं. प्रभाकर धाकडे आणि त्यांच्या संचाने स्वागतगीत आणि भीमगीत सादर केले. प्रमोद रामटेके, पं. प्रभाकर धाकडे, रवींद्र कडवे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन अशोक जांभुळकर यांनी केले. आभार रत्नाकर मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)