शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
2
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
3
श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
4
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
5
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
6
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
7
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
8
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
9
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
10
प्रेमात धोका! संतापलेली गर्लफ्रेंड थेट बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का
11
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
12
"दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श मला सहन झाला नसता...", राजेश खन्नांसोबतच्या अफेअरबद्दल पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री
13
Kashi Vishwanath Temple Owl: काशी विश्वनाथ मंदिरावर दिसले पांढरे घुबड; हे भारतासाठी नक्की कसले संकेत?
14
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
15
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
16
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
17
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
18
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
19
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
20
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी

प्रवृत्त करीत नाही तो विचारच कसला

By admin | Updated: October 19, 2015 02:59 IST

वैचारिक लिखाण हे जोखमीचे काम आहे. यात संबंधित लेखकास त्या विषयाचे आणि त्या विषयाशी संबंधीत सर्व क्षेत्राचे ज्ञान असावयास हवे.

गंगाधर पानतावणे : अशोक गोडघाटे यांच्या चार ग्रंथांचे प्रकाशननागपूर : वैचारिक लिखाण हे जोखमीचे काम आहे. यात संबंधित लेखकास त्या विषयाचे आणि त्या विषयाशी संबंधीत सर्व क्षेत्राचे ज्ञान असावयास हवे. परंतु जो विचार नवे काहीच देत नाही, वाचकाला प्रवृत्तही करीत नाही, असा विचार विचारच नसतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक तथा ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केले.विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात प्रा. अशोक गोडघाटे यांच्या ‘मानव मुक्तीचा मार्गदाता भगवान बुद्ध’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक आव्हान’, ‘सामाजिक सांस्कृतिक जाणिवा’ आणि ‘दलितांचा विचार संघर्ष या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बुद्ध-आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे भाष्यकार भंते विमलकित्ती गुणसिरी होते. व्यासपीठावर प्रा. रत्नाकर मेश्राम यांची उपस्थिती होती. गंगाधर पानतावणे म्हणाले, काही लेखक मूळ विषयाबाबत विचार व्यक्त न करता त्या विषयाच्या काठावरचे विचार मांडतात. त्यांचे विचार भविष्यात असत्य ठरतात. परंतु अशोक गोडघाटेंच्या ग्रंथात विचारवैभव आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनात जसजसे वाचन करतो तसे नवनवे प्रतीत होते. ते संदर्भाशिवाय कधीच बोलले नाही, हे तरुण लेखकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. आत्मगौरव करणाऱ्या लेखनाने प्रतिमा निर्मिती होत नाही. त्यामुळे क्षणापुरता आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. भंते विमलकित्ती गुणसिरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समता, न्यायाचा विचार गोडघाटेंच्या पुस्तकातून मांडण्यात आल्याचे सांगितले. अशोक गोडघाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ओझरत्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न या ग्रंथातून केल्याचे सांगितले. कार्यक्रमात पं. प्रभाकर धाकडे आणि त्यांच्या संचाने स्वागतगीत आणि भीमगीत सादर केले. प्रमोद रामटेके, पं. प्रभाकर धाकडे, रवींद्र कडवे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन अशोक जांभुळकर यांनी केले. आभार रत्नाकर मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)