शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

पतीला स्वत:च्या क्रूरतेसाठी घटस्फोट मिळू शकत नाही

By admin | Updated: August 1, 2015 03:57 IST

‘उलटा चोर कोतवाल को दाटे’ अशी एक म्हण आहे. नागपूर येथील एका पतीने अशाचप्रकारे वागून कौटुंबिक न्यायालयामध्ये पत्नीविरुद्ध खोटे आरोप सिद्ध केले होते.

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा : पत्नीवर केले होते खोटे आरोपराकेश घानोडे नागपूर ‘उलटा चोर कोतवाल को दाटे’ अशी एक म्हण आहे. नागपूर येथील एका पतीने अशाचप्रकारे वागून कौटुंबिक न्यायालयामध्ये पत्नीविरुद्ध खोटे आरोप सिद्ध केले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीस दिलासा देऊन पतीला स्वत:च्याच क्रूरतेसाठी घटस्फोट मंजूर केला जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे.पतीने पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी नागपूर कौटुंबिक न्यायालयात हिंदू विवाह याचिका दाखल केली होती. त्याने लेखी बयानामध्ये पत्नीवर विविध खोटे आरोप केले होते. २१ नोव्हेंबर २०१४ रोजी कौटुंबिक न्यायालयाने पतीच्या बाजूने निर्णय देऊन क्रूरतेच्या आधारावर घटस्फ ोट मंजूर केला होता. याविरुद्ध पत्नीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व प्रसन्न वराळे यांनी पत्नीचे अपील मंजूर करून कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द केला. कौटुंबिक न्यायालयाने पत्नीचे पुरावे विचारात घेताना चूक केली आहे. पत्नीला लेखी बयानामध्ये स्वत:ची बाजू योग्य पद्धतीने मांडता आली नाही म्हणून पतीचा दावा सिद्ध होत नाही. आपसात तडजोड करताना पत्नीकडून तिच्या वागणुकीसंदर्भात चिठ्ठी लिहून घेण्यात आली होती. दबावाशिवाय कोणतीही पत्नी अशाप्रकारची चिठ्ठी लिहून देऊ शकत नाही. पतीचे वडील पोलीस निरीक्षक असल्यामुळे स्वत:वरील अत्याचाराची पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे धाडस तिच्यामध्ये नव्हते. पतीला पत्नीची क्रूरता सिद्ध करण्यात अपयश आले असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदविले आहे.असे आहे प्रकरणस्कविता व कालिदास (काल्पनिक नावे) यांचे ७ डिसेंबर २००८ रोजी लग्न झाले. यानंतर कविता काही दिवसांतच वाईट वागायला लागली. मुलगी १० महिने व दीड वर्षांची असताना कविता कोणालाही न सांगता माहेरी निघून गेली. कविताला घटस्फोट हवा असल्याचे तिच्या आईने कळविले होते. कविताला मानसिक आजार आहे असे कालिदासचे म्हणणे होते. कविताने हे सर्व आरोप फेटाळले. लग्नानंतर घरची सर्व कामे करीत होती. कालिदासने मारहाण करून दोनदा माहेरी सोडले. माहेरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे कालिदास व त्याचे आई-वडिला नेहमीच टोमणे मारत होते. क्रूरतेने वागत होते. मुलीशी भेटू देत नव्हते. कालिदासने कधीही जुळवून घेण्याचा प्रयत्न केला नाही अशी बाजू कविताने मांडली होती.