शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

पतीला स्वत:च्या क्रूरतेसाठी घटस्फोट मिळू शकत नाही

By admin | Updated: August 1, 2015 03:57 IST

‘उलटा चोर कोतवाल को दाटे’ अशी एक म्हण आहे. नागपूर येथील एका पतीने अशाचप्रकारे वागून कौटुंबिक न्यायालयामध्ये पत्नीविरुद्ध खोटे आरोप सिद्ध केले होते.

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा : पत्नीवर केले होते खोटे आरोपराकेश घानोडे नागपूर ‘उलटा चोर कोतवाल को दाटे’ अशी एक म्हण आहे. नागपूर येथील एका पतीने अशाचप्रकारे वागून कौटुंबिक न्यायालयामध्ये पत्नीविरुद्ध खोटे आरोप सिद्ध केले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीस दिलासा देऊन पतीला स्वत:च्याच क्रूरतेसाठी घटस्फोट मंजूर केला जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे.पतीने पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी नागपूर कौटुंबिक न्यायालयात हिंदू विवाह याचिका दाखल केली होती. त्याने लेखी बयानामध्ये पत्नीवर विविध खोटे आरोप केले होते. २१ नोव्हेंबर २०१४ रोजी कौटुंबिक न्यायालयाने पतीच्या बाजूने निर्णय देऊन क्रूरतेच्या आधारावर घटस्फ ोट मंजूर केला होता. याविरुद्ध पत्नीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व प्रसन्न वराळे यांनी पत्नीचे अपील मंजूर करून कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द केला. कौटुंबिक न्यायालयाने पत्नीचे पुरावे विचारात घेताना चूक केली आहे. पत्नीला लेखी बयानामध्ये स्वत:ची बाजू योग्य पद्धतीने मांडता आली नाही म्हणून पतीचा दावा सिद्ध होत नाही. आपसात तडजोड करताना पत्नीकडून तिच्या वागणुकीसंदर्भात चिठ्ठी लिहून घेण्यात आली होती. दबावाशिवाय कोणतीही पत्नी अशाप्रकारची चिठ्ठी लिहून देऊ शकत नाही. पतीचे वडील पोलीस निरीक्षक असल्यामुळे स्वत:वरील अत्याचाराची पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे धाडस तिच्यामध्ये नव्हते. पतीला पत्नीची क्रूरता सिद्ध करण्यात अपयश आले असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदविले आहे.असे आहे प्रकरणस्कविता व कालिदास (काल्पनिक नावे) यांचे ७ डिसेंबर २००८ रोजी लग्न झाले. यानंतर कविता काही दिवसांतच वाईट वागायला लागली. मुलगी १० महिने व दीड वर्षांची असताना कविता कोणालाही न सांगता माहेरी निघून गेली. कविताला घटस्फोट हवा असल्याचे तिच्या आईने कळविले होते. कविताला मानसिक आजार आहे असे कालिदासचे म्हणणे होते. कविताने हे सर्व आरोप फेटाळले. लग्नानंतर घरची सर्व कामे करीत होती. कालिदासने मारहाण करून दोनदा माहेरी सोडले. माहेरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे कालिदास व त्याचे आई-वडिला नेहमीच टोमणे मारत होते. क्रूरतेने वागत होते. मुलीशी भेटू देत नव्हते. कालिदासने कधीही जुळवून घेण्याचा प्रयत्न केला नाही अशी बाजू कविताने मांडली होती.