शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पतीला स्वत:च्या क्रूरतेसाठी घटस्फोट मिळू शकत नाही

By admin | Updated: August 1, 2015 03:57 IST

‘उलटा चोर कोतवाल को दाटे’ अशी एक म्हण आहे. नागपूर येथील एका पतीने अशाचप्रकारे वागून कौटुंबिक न्यायालयामध्ये पत्नीविरुद्ध खोटे आरोप सिद्ध केले होते.

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा : पत्नीवर केले होते खोटे आरोपराकेश घानोडे नागपूर ‘उलटा चोर कोतवाल को दाटे’ अशी एक म्हण आहे. नागपूर येथील एका पतीने अशाचप्रकारे वागून कौटुंबिक न्यायालयामध्ये पत्नीविरुद्ध खोटे आरोप सिद्ध केले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीस दिलासा देऊन पतीला स्वत:च्याच क्रूरतेसाठी घटस्फोट मंजूर केला जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे.पतीने पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी नागपूर कौटुंबिक न्यायालयात हिंदू विवाह याचिका दाखल केली होती. त्याने लेखी बयानामध्ये पत्नीवर विविध खोटे आरोप केले होते. २१ नोव्हेंबर २०१४ रोजी कौटुंबिक न्यायालयाने पतीच्या बाजूने निर्णय देऊन क्रूरतेच्या आधारावर घटस्फ ोट मंजूर केला होता. याविरुद्ध पत्नीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व प्रसन्न वराळे यांनी पत्नीचे अपील मंजूर करून कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द केला. कौटुंबिक न्यायालयाने पत्नीचे पुरावे विचारात घेताना चूक केली आहे. पत्नीला लेखी बयानामध्ये स्वत:ची बाजू योग्य पद्धतीने मांडता आली नाही म्हणून पतीचा दावा सिद्ध होत नाही. आपसात तडजोड करताना पत्नीकडून तिच्या वागणुकीसंदर्भात चिठ्ठी लिहून घेण्यात आली होती. दबावाशिवाय कोणतीही पत्नी अशाप्रकारची चिठ्ठी लिहून देऊ शकत नाही. पतीचे वडील पोलीस निरीक्षक असल्यामुळे स्वत:वरील अत्याचाराची पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे धाडस तिच्यामध्ये नव्हते. पतीला पत्नीची क्रूरता सिद्ध करण्यात अपयश आले असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदविले आहे.असे आहे प्रकरणस्कविता व कालिदास (काल्पनिक नावे) यांचे ७ डिसेंबर २००८ रोजी लग्न झाले. यानंतर कविता काही दिवसांतच वाईट वागायला लागली. मुलगी १० महिने व दीड वर्षांची असताना कविता कोणालाही न सांगता माहेरी निघून गेली. कविताला घटस्फोट हवा असल्याचे तिच्या आईने कळविले होते. कविताला मानसिक आजार आहे असे कालिदासचे म्हणणे होते. कविताने हे सर्व आरोप फेटाळले. लग्नानंतर घरची सर्व कामे करीत होती. कालिदासने मारहाण करून दोनदा माहेरी सोडले. माहेरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे कालिदास व त्याचे आई-वडिला नेहमीच टोमणे मारत होते. क्रूरतेने वागत होते. मुलीशी भेटू देत नव्हते. कालिदासने कधीही जुळवून घेण्याचा प्रयत्न केला नाही अशी बाजू कविताने मांडली होती.