शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

ज्ञानगंगेच्या प्रसारातील विघ्न अखेर दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 23:22 IST

विदर्भातील सर्व जिल्ह्यांत ज्ञानगंगेचा प्रसार करणाऱ्या ‘इग्नू’च्या (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) विभागीय केंद्राला अखेर या वर्षात हक्काची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने उपराजधानीत चार वर्षांअगोदर मंजूर केलेल्या जागेसंदर्भातील आर्थिक विघ्नदेखील दूर झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानंतर ही जमीन ‘इग्नू’ला बाजारमूल्याहून कमी दरात देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘लोकमत’ने सातत्याने हा विषय लावून धरला होता.

ठळक मुद्दे‘इग्नू’ला कमी दरात जमीन : शासनाने दिली दरात सवलत, आता प्रतीक्षा मुख्यालयातील निधीची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील सर्व जिल्ह्यांत ज्ञानगंगेचा प्रसार करणाऱ्या ‘इग्नू’च्या (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) विभागीय केंद्राला अखेर या वर्षात हक्काची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने उपराजधानीत चार वर्षांअगोदर मंजूर केलेल्या जागेसंदर्भातील आर्थिक विघ्नदेखील दूर झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानंतर ही जमीन ‘इग्नू’ला बाजारमूल्याहून कमी दरात देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘लोकमत’ने सातत्याने हा विषय लावून धरला होता.२००९ साली ‘इग्नू’च्या विभागीय केंद्राची सुरुवात झाली. दरवर्षी येथे नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अमरावती मार्गावरील एका भाड्याच्या इमारतीमधून या केंद्राचा कारभार सुरू आहे. अत्यंत लहान जागेत केंद्राचा कारभार सुरू असून यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.राज्य शासनाने विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन शहरातच कमी दरात जागा उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाला सादर करण्यात आला होता. त्यानुसार मानेवाडा येथील ओंकारनगर येथील जागा शासनाने ‘इग्नू’च्या विभागीय केंद्राला देण्याचा निर्णय २०१४ साली घेण्यात आला. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने ८ कोटी ८ लाख ८९ हजार ३८० रुपये या बाजारभावानुसार जागा देण्यात येईल, असे पत्रच ‘इग्नू’च्या विभागीय संचालकांना पाठविले होते. इतकी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याने शिक्षणसंस्था या नात्याने कमी किमतीत जमीन देण्यात यावी, अशी विनंती विभागीय केंद्राचे संचालक डॉ.पी.शिवस्वरूप यांनी केली होती.त्यानंतर सरकारदरबारी ही फाईल धूळखात पडली होती. अखेर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने कमी दरात ही जमीन ‘इग्नू’ला देण्याचा मागील महिन्यात निर्णय घेतला. आता या जमिनीसाठी २ कोटी २३ लाख रुपये ‘इग्नू’ला भरावे लागणार आहेत. याबाबत मुख्यालयात आम्ही कळविले असून तेथून लवकरच निधी येईल व त्यानंतर जमीन खरेदीची प्रक्रिया करण्यात येईल, असे डॉ.शिवस्वरूप यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातूनच हे शक्य झाल्याचेदेखील ते म्हणाले.तोकड्या जागेत हजारो विद्यार्थ्यांचा कारभार‘इग्नू’च्या विभागीय केंद्राच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा, कार्यशाळा, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग इत्यादी उपक्रमांचे नियमित आयोजन करावे लागते. परंतु यासाठी पर्याप्त जागा नाही. अतिशय लहानशा सभागृहात बैठकी घ्याव्या लागतात. तेथे बसण्यासाठीदेखील अडचण होते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना एखाद्या मान्यवराचे मार्गदर्शन उभे राहूनदेखील ऐकावे लागते. कर्मचाºयांनादेखील बसण्यासाठी जागा नसल्याचे दिसून येते. अगदी पुस्तके ठेवण्यासाठीदेखील कार्यालयात जागा नाही. त्यामुळे अनेकदा ‘रिसेप्शन’वरच पुस्तकांचा ढीग लावून ठेवावा लागतो.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीuniversityविद्यापीठ