शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बंटी-बबलीचा शेकडो बेरोजगारांना गंडा

By admin | Updated: November 29, 2014 02:53 IST

नोकरीचे आमिष दाखवून रुचिका आणि आदित्य नामक एका जोडीने शेकडो बेरोजगारांना लाखोंचा गंडा घातला.

नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून रुचिका आणि आदित्य नामक एका जोडीने शेकडो बेरोजगारांना लाखोंचा गंडा घातला. नोकरीच्या आशेपोटी या बंटी-बबलीच्या जोडीकडे रक्कम देणाऱ्यात नागपूरच नव्हे तर विदर्भातील अनेक जिल्ह्यातील बेरोजगारांचा समावेश आहे.रुचिका आणि आदित्य नेमके कुठे राहतात, त्याची पोलिसांकडे माहिती नाही. ते परप्रांतातील रहिवासी आहे, एवढेच फसगत झालेले सांगतात. महागडे कपडे आणि मोबाईल घेऊन रुबाबात आलिशान कारमधून फिरायचे. एखाद्या बेरोजगाराला प्रारंभी जाळ्यात ओढायचे. त्याला नोकरीचे आमिष दाखवायचे. त्याच्या माध्यमातून त्याच्या मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क करायचा आणि नंतर त्यांनाही नोकरीचे आमिष दाखवायचे, अशी या जोडीची पध्दत आहे. त्यांनी नागपूर विदर्भातील शेकडो बेरोजगारांना अशा प्रकारे आपल्या जाळ्यात ओढले आहे. वर्धा येथील स्वागत कॉलनीत (कारला रोड) राहणारा पराग क्रिष्णराव मिसाळ तसेच अन्य १३ जणांना अभियंता म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष रुचिका आणि आदित्यने दाखविले. त्यांच्याकडून सप्टेंबर २०१४ मध्ये प्रत्येकी १० हजार रुपये घेतले. एमआयडीसीतील राजीवनगरात (जाधव कॉम्प्लेक्स) हा व्यवहार झाल्यानंतर हे दोघे पसार झाले. प्रारंभी फोनवरून ते पीडित तरुणांना नियुक्तीची तारीख सांगत होते. आता त्यांनी आपले फोनच बंद करून ठेवले आहेत. त्यांनी फसगत केल्याचे लक्षात आल्यामुळे पीडित १४ तरुण गुरुवारी एमआयडीसी ठाण्यात पोहचले. त्यांच्यापैकी पराग मिसाळच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुचिका आणि आदित्य सिंगविरुद्ध फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले. त्यांचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)