शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पोटात असताे भूकेचा गोळा, लवकरच संपतात थाळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:07 IST

() प्रत्येक केंद्रावर १० ते १५ जण राहतात उपाशी : थाळींची संख्या वाढवण्याची मागणी नागपूर : कुणीही उपाशी राहू ...

()

प्रत्येक केंद्रावर १० ते १५ जण राहतात उपाशी : थाळींची संख्या वाढवण्याची मागणी

नागपूर : कुणीही उपाशी राहू नये म्हणून राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ५१ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रसंचालकांना शासनाकडून प्रत्येक थाळीला अनुदान व थाळीचे टार्गेट ठरवून देण्यात आले आहे. विशिष्ट वेळेपर्यंतच हे केंद्र सुरू राहत असल्याने प्रत्येक केंद्रावरून दररोज किमान १५ ते २० जणांना उपाशीपोटी परत जावे लागत असल्याचे वास्तव आहे.

कोरोनाकाळात कुणीही उपाशी राहू नये, यासाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली. त्यानंतर ५ रुपयात शिवभोजन देण्यात येत होते. आता शिवभोजन निशुल्क दिले जात आहे. या योजनेचा जिल्ह्यातील कामगार, मजूर, निराधार आणि रस्त्यावर भटकत असणाऱ्यांना फायदा होत आहे. जिल्ह्यात ५१ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांना ८५०० लोकांना जेवण देण्याचे टार्गेट दिले आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी हे केंद्र आहेत. शासकीय रुग्णालयांच्या समोर, बसस्थानकांजवळील केंद्रावर शिवभोजनासाठी चांगलीच गर्दी असते. गोरगरीब आणि रस्त्यावर भटकणाऱ्यांचा एकावेळेचा प्रश्न शिवभोजन था‌ळीमुळे सुटला आहे; परंतु केंद्राची वेळ दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत असते. प्रत्येक केंद्राची थाळींची संख्या निश्चित केली आहे. त्यामुळे अनेकांना परत जावे लागते.

- तुकडोजी चौक

तुकडोजी चौकाजवळ सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर असलेल्या मंथन महिला बचत गटाच्या शिवभोजन केंद्रावर दररोज ४०० ते ५०० लोक येतात. परंतु केंद्राला २२५ थाळींचे टार्गेट दिले आहे. २५ ते ३० थाळ्या ते आपल्याकडून देतात. पण सर्वांनाच ते देऊ शकत नाही. त्यामुळे परत पाठवावे लागते. आमच्या केंद्रावर येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता किमान टार्गेट वाढवून देण्याची गरज संचालिका वर्षा गुजर यांनी व्यक्त केली.

- गणेशपेठ बसस्टॅण्ड

गणेशपेठ बसस्टॅण्ड समोर श्री गणेश भोजनालय यांच्याकडे शिवभोजन थाळी मिळते. बाहेरगावाहून येणारे अनेकजण याचा लाभ घेतात. २ वाजेपर्यंत त्यांच्याकडे शिवभोजन मिळते. २२५ थाळींचे त्यांना टार्गेट आहे. टार्गेटच्यावर भोजन दिल्यास त्यांना अनुदान मिळत नाही. थाळीचे टार्गेट संपले की ते भोजन केंद्र बंद करतात.

- दररोज जिल्ह्यात ८५०० जणांचे पोट भरते, बाकीच्यांचे काय?

जिल्ह्यात ५१ शिवभोजन केंद्रे आहेत. त्या केंद्राचा लाभ साधारणत: ८५०० लोक घेत असतात. काही केंद्रावर दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त लोक येतात. टार्गेट संपल्यानंतर केंद्र बंद करावे लागते. काही केंद्रावरून शंभराहून अधिक लोक परत जातात. तर काही केंद्रावर टार्गेट एवढेही लोक येत नाहीत. शासनातर्फे शहरात पुन्हा केंद्र वाढविण्यात येणार आहे. पण केंद्र चालकांचे म्हणणे आहे की केंद्र वाढविण्यापेक्षा टार्गेट वाढवून द्यावे.

-दृष्टिक्षेपात

जिल्ह्यात एकण शिवभोजन केंद्र - २७

रोजच्या थाळीची संख्या - ३५००

शहरात एकूण शिवभोजन केंद्र - २४

रोजच्या थाळीची संख्या - ५०००