शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पोटात असताे भूकेचा गोळा, लवकरच संपतात थाळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:07 IST

() प्रत्येक केंद्रावर १० ते १५ जण राहतात उपाशी : थाळींची संख्या वाढवण्याची मागणी नागपूर : कुणीही उपाशी राहू ...

()

प्रत्येक केंद्रावर १० ते १५ जण राहतात उपाशी : थाळींची संख्या वाढवण्याची मागणी

नागपूर : कुणीही उपाशी राहू नये म्हणून राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ५१ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रसंचालकांना शासनाकडून प्रत्येक थाळीला अनुदान व थाळीचे टार्गेट ठरवून देण्यात आले आहे. विशिष्ट वेळेपर्यंतच हे केंद्र सुरू राहत असल्याने प्रत्येक केंद्रावरून दररोज किमान १५ ते २० जणांना उपाशीपोटी परत जावे लागत असल्याचे वास्तव आहे.

कोरोनाकाळात कुणीही उपाशी राहू नये, यासाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली. त्यानंतर ५ रुपयात शिवभोजन देण्यात येत होते. आता शिवभोजन निशुल्क दिले जात आहे. या योजनेचा जिल्ह्यातील कामगार, मजूर, निराधार आणि रस्त्यावर भटकत असणाऱ्यांना फायदा होत आहे. जिल्ह्यात ५१ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांना ८५०० लोकांना जेवण देण्याचे टार्गेट दिले आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी हे केंद्र आहेत. शासकीय रुग्णालयांच्या समोर, बसस्थानकांजवळील केंद्रावर शिवभोजनासाठी चांगलीच गर्दी असते. गोरगरीब आणि रस्त्यावर भटकणाऱ्यांचा एकावेळेचा प्रश्न शिवभोजन था‌ळीमुळे सुटला आहे; परंतु केंद्राची वेळ दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत असते. प्रत्येक केंद्राची थाळींची संख्या निश्चित केली आहे. त्यामुळे अनेकांना परत जावे लागते.

- तुकडोजी चौक

तुकडोजी चौकाजवळ सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर असलेल्या मंथन महिला बचत गटाच्या शिवभोजन केंद्रावर दररोज ४०० ते ५०० लोक येतात. परंतु केंद्राला २२५ थाळींचे टार्गेट दिले आहे. २५ ते ३० थाळ्या ते आपल्याकडून देतात. पण सर्वांनाच ते देऊ शकत नाही. त्यामुळे परत पाठवावे लागते. आमच्या केंद्रावर येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता किमान टार्गेट वाढवून देण्याची गरज संचालिका वर्षा गुजर यांनी व्यक्त केली.

- गणेशपेठ बसस्टॅण्ड

गणेशपेठ बसस्टॅण्ड समोर श्री गणेश भोजनालय यांच्याकडे शिवभोजन थाळी मिळते. बाहेरगावाहून येणारे अनेकजण याचा लाभ घेतात. २ वाजेपर्यंत त्यांच्याकडे शिवभोजन मिळते. २२५ थाळींचे त्यांना टार्गेट आहे. टार्गेटच्यावर भोजन दिल्यास त्यांना अनुदान मिळत नाही. थाळीचे टार्गेट संपले की ते भोजन केंद्र बंद करतात.

- दररोज जिल्ह्यात ८५०० जणांचे पोट भरते, बाकीच्यांचे काय?

जिल्ह्यात ५१ शिवभोजन केंद्रे आहेत. त्या केंद्राचा लाभ साधारणत: ८५०० लोक घेत असतात. काही केंद्रावर दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त लोक येतात. टार्गेट संपल्यानंतर केंद्र बंद करावे लागते. काही केंद्रावरून शंभराहून अधिक लोक परत जातात. तर काही केंद्रावर टार्गेट एवढेही लोक येत नाहीत. शासनातर्फे शहरात पुन्हा केंद्र वाढविण्यात येणार आहे. पण केंद्र चालकांचे म्हणणे आहे की केंद्र वाढविण्यापेक्षा टार्गेट वाढवून द्यावे.

-दृष्टिक्षेपात

जिल्ह्यात एकण शिवभोजन केंद्र - २७

रोजच्या थाळीची संख्या - ३५००

शहरात एकूण शिवभोजन केंद्र - २४

रोजच्या थाळीची संख्या - ५०००