शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

स्वप्नांच्या उंच भरारीला दीड लाखांची बाधा!

By admin | Updated: September 19, 2016 02:39 IST

अनुष्का, अपूर्वा व कोमल या गरीब वस्तीत राहणाऱ्या १२ ते १६ वयोगटातील तीन मुली. एकीचे वडील हातठेल्यावर भाजी विकतात,

कराटेपटू मुलींचा संघर्ष : स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेचे निमंत्रण, पण पैसा ठरतेय अडचणनागपूर : अनुष्का, अपूर्वा व कोमल या गरीब वस्तीत राहणाऱ्या १२ ते १६ वयोगटातील तीन मुली. एकीचे वडील हातठेल्यावर भाजी विकतात, दुसरीचे वडील इमारतीच्या बांधकामाला जातात तर तिसऱ्या मुलीचे वडील एका कंपनीत राबून दोन वेळच्या अन्नाची जुळवाजुळव करतात. भाकरीची ही लढाई रोज लढल्यामुळे असेल कदाचित या तिन्ही मुलींना लळा लागला तोही कराटेसारख्या धाडसी खेळाचा. या तिघींच्या याच धाडसाची दखल घेऊन दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांंना निमंत्रण पाठवले आहे. १४ ते १६ आॅक्टोबरदरम्यान ही स्पर्धा तेथे होणार आहे. मनगटाच्या बळावर पदक आणूच, हा त्यांच्या विश्वासही दांडगा आहे. पण, स्वप्नांच्या या भरारीला केवळ दीड लाख रुपयांनी बाधा पोहोचवली आहे. हे दीड लाख जुळविण्यासाठी या मुलींच्या पालकांचा संघर्ष सुरू आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना आॅडी, बीएमडब्लू कार मिळत असताना इकडे नागपुरातील गरीब वस्तीत राहणाऱ्या या तीन मुलींची स्वप्ने अशी अधांतरी लटकली आहेत. यातील अपूर्वा माकडे ही केवळ १२ वर्षांची आहे. विशेष म्हणजे, अपूर्वा ४० टक्के अंध आहे. पण, तिचा खेळ कमालीचा आहे. तिचे वडील त्र्यंबक माकडे हे हातठेल्यावर भाजी विकतात. अपूर्वाची कराटेतील आवड लक्षात घेऊन त्यांनी तिला खेळात पुढे जाण्यासाठी अनेकदा पदरमोड केली. पण, आताचे आव्हान मोठे आहे. त्यांनी हिंमत सोडलेली नाही. तरी अपूर्वाने ही संधी गमावली तर...ही भीती त्यांना अस्वस्थ करीत आहे. अशीच स्थिती चंदननगरात राहणाऱ्या १३ वर्षीय अनुष्का भुंबरचीही आहे. तिचे वडील प्रदीप भुंबर एका कंपनीत काम करतात. अनुष्काने या खेळात आपले नाव मोठे करावे, यासाठी ते सध्या रजा घेऊन नातेवाईक, मित्र-मंडळींकडून पैशांची व्यवस्था करीत आहेत. (प्रतिनिधी)कोमलला प्रायोजकांचा शोधकोमल कठाणे या १६ वर्षीय कराटेपटूचा संघर्ष तर आणखी बिकट आहे. दिघोरीत तिचे छोटेसे घर आहे. तिचे वडील सुरेश कठाणे इमारत बांधकामावर जातात. त्यांना यातले फारसे कळत नाही. त्यामुळे या लढ्याचे नेतृत्व स्वत: कोमलच करीत आहे. कुठल्याही परिस्थितीत ही स्पर्धा गमवायची नाही, या निर्धाराने ती सध्या आपल्या विदेश दौऱ्यासाठी प्रायोजक शोधत आहे. नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनतर्फे या तिन्ही मुलींना प्रवास खर्चात सूट मिळवून देण्यात आली आहे. पण, या गरीब मुलींसाठी अजूनही दीड लाखांचा टप्पा गाठणे म्हणजे मोठेच आव्हान आहे. या तिन्ही मुलींनी याआधी अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण, रजत पदके प्राप्त केली आहेत. आताही त्यांना स्वत:च्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. या विश्वासाला समाजाच्या उदार मनाची जोड मिळाली तर दक्षिण आफ्रिकेत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकताना दिसेल अन् तो फडकवणाऱ्या गुणवंत मुली आपल्या नागपूरच्या असतील.