शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो अभियंते पदोन्नतीपासून वंचित

By admin | Updated: March 14, 2016 03:10 IST

सार्वजनिक बांधकाम विभागासह जलसंपदा विभागात शेकडो अभियंत्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग : राजपत्रित अभियांत्रिकी संघटनेचा आरोपनागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागासह जलसंपदा विभागात शेकडो अभियंत्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. १९८२ च्या सेवाज्येष्ठता नियमांना डावलून कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून शेकडो अभियंत्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राजपत्रित अभियांत्रिकी संघटनेचे सल्लागार सुभाष चांदसुरे व नागपूरचे सचिव अविनाश गुल्हाने यांनी पत्रकार परिषदेत केली.अविनाश गुल्हाने यांनी सांगितले, सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा (पाटबंधारे) विभागात १६ एप्रिल १९८४ रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवागट ‘ब’ मधील सहायक अभियंता (स्थापत्य) श्रेणी-२ असे पद निर्माण केल्या गेले. हे पद राजपत्रित असल्यामुळे यावरील नियुक्त्या या लोकसेवा आयोगामार्फत सेवाप्रवेश तयार करून होणे क्रमप्राप्त होते. परंतु या नियुक्ती झाल्याच्या तब्बल १३ वर्षांनी हे नियम तयार झाले. तसेच हे नियम १ एप्रिल १९८१ पासून पूर्वलक्षी प्रभावाने अमलात आणल्या गेले. नियम तयार होण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागात सन १९८१ ते १९९६ पर्यंत विविध निर्णयांतर्गत सहायक अभियंता (कनिष्ठस्तर) या पदावर पदवीधर अभियंत्यांची पदभरती करण्यात आली होती. १६ जून १९९७ च्या सेवाप्रवेश नियमांतर्गत बऱ्याच तांत्रिक अडचणी उद्भवल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार ८ जुलै २००९ अन्वये सुधारित सेवा प्रवेश नियम तयार करण्यात आला. नियमानुसार १९८१ ते १६ जून १९९७ पर्यंत लागलेल्या पदवीधारक अभियंत्यांना आयोगाचा २००९-१० या वर्षामध्ये घेण्यात आलेली तोंडी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. त्यानुसार उत्तीर्ण झालेल्या १९९४ ते १९९८ दरम्यान लागलेल्या अभियंत्यांच्या सेवा या सेवाज्येष्ठतानुसार (मूळ नियुक्तीच्या दिनांकापासून) नियमित करण्यात आल्या. सेवाज्येष्ठतेचे लाभ हे २००१ मध्ये सरळसेवा भरती नियुक्त झालेल्या तुकडीच्या शेवटी निश्चित करण्यात आली. राज्यातील सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवाज्येष्ठतेचे नियम १९८२ लागू आहे. परंतु १९९४ ते १९९६ वर्षामध्ये रुजू झालेल्या अभियंत्यांना नुकत्याच झालेल्या पदोन्नतीच्या वेळी डावलण्यात आले. त्यामुळे शासनाची सलग १९ ते २० वर्षे सेवा करून, आयोगाची अर्हता परीक्षा उत्तीर्ण करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागात शेकडो अभियंत्यांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून सेवाज्येष्ठता दिल्या गेली नाही. हा कायद्याचा भंग आहे. शासनाने तातडीने या अभियंत्यांना सेवाज्येष्ठतेच्या कायद्यानुसार पदोन्नती द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)