शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हम सब 'खालिस'ही है, अलगसे खलिस्तान की जरूरत नहीं; अमृतपाल प्रकरणाचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2023 20:28 IST

Nagpur News ‘हम सब 'खालिस' (पवित्र)ही है. इसलिए अलग से खलिस्तान की जरूरत नहीं’, अशी भावना शीख समुदायातील मान्यवर मंडळींची आहे.

नरेश डोंगरेनागपूर : ‘हम सब 'खालिस' (पवित्र)ही है. इसलिए अलग से खलिस्तान की जरूरत नहीं’, अशी भावना शीख समुदायातील मान्यवर मंडळींची आहे. पंजाबमधील अमृतपाल प्रकरणाने एकीकडे पोलिस, तसेच तपास यंत्रणांची धावपळ वाढविली आहे. दुसरीकडे देशभरातील शीख समुदायातही अस्वस्थता निर्माण केली आहे. अशीच अवस्था नागपुरातील शीख बांधवांची आहे. ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले जात आहे आणि वावड्या उठवल्या जात आहे, त्या चुकीच्या असल्याचे मत शीख समुदायातील जुने जाणते, मान्यवर व्यक्त करीत आहेत.

गेल्या चार दिवसांपासून पंजाबमधील कट्टर खलिस्तानवादी अमृतपाल प्रकरणात वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. कधी त्याला अटक केली, तर कधी तो फरार आहे. तो विदेशात पळाला, पंजाब, हरयाणामध्येच दडून आहे, तर तो नागपूरमार्गे नांदेडमध्ये आला, मध्य भारतात त्याला शरणागती मिळाल्याच्याही उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे नागपूर, छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील शीख बांधव कमालीचे अस्वस्थ आहेत. बाबा बुढ्ढाजीनगरातील गुरुद्वारा कमिटीचे माजी प्रधान आणि धर्म प्रचार समितीचे अध्यक्ष मलकितसिंग बल (वय ६५) यांच्याशी या संबंधाने चर्चा केली असता ते म्हणाले, केवळ एका व्यक्तीमुळे अवघ्या शीख समुदायाला बदनाम करणे योग्य नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून शीख समुदायाचा त्याग, शाैर्य आणि बलिदान सर्वांना माहिती आहे. ते वेगळे सांगण्याची गरज नाही. कुण्या एका व्यक्तीने देशविरोधी भूमिका घेत काही मत मांडले म्हणजे, ते सगळ्या समुदायाचे मत नसते, असे स्पष्ट करतानाच मलकितसिंग म्हणाले, सध्या काय सुरू आहे, तेच कळत नाही. एक व्यक्ती अनेक वर्षे देशाबाहेर राहते. नंतर देशात परतते. नशा सोडविण्याचे काम हाती घेतल्यामुळे तिच्याशी अनेक जण जुळतात अन् नंतर तो थेट खलिस्तानची मागणी करतो. त्याची ही भूमिका जशी संशयास्पद आहे, तसाच प्रकार तपास यंत्रणांच्या बाबतीतही आहे. त्यांनी अमृतपालची माहिती आधीच का काढून ठेवली नाही, त्याच्यावर आधीच का कारवाई केली नाही, असा प्रश्नही बल यांनी उपस्थित केला.

बाबा दीपसिंगनगर गुरुद्वारा समितीचे माजी अध्यक्ष गुरुविंदर सिंग ऊर्फ गुल्लू सरपंच यांनीदेखील या संबंधाने तीव्र भावना व्यक्त केल्या. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनापर्यंत ठीक आहे. राजकारण करणे योग्य नाही. ड्रग्जमाफियांनी (नशेचे साैदागर) पंजाबला उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करून युवा पिढीचा बचाव करण्याची गरज आहे. वेगळ्या खलिस्तानची गरजच नाही, असे गुल्लू सरपंच म्हणाले. या एकूणच प्रकाराबाबत शीख समुदायाची होत असलेली बदनामी क्लेशदायक असल्याचेही ते म्हणाले. 

ही नवीन दुकानदारीजगजित सिंग नामक व्यक्ती ५० वर्षांपूर्वी अमेरिकेत राहून खलिस्तानची मागणी करायचा. खलिस्तानचा अध्यक्ष म्हणूनही त्याने स्वत:ला घोषित केले होते. त्याने खूप नाैटंकी केली. अखेर तो काही वर्षांपूर्वी उडमत टांगा (पठाणकोट)ला स्वगृही परतला आणि नंतर त्याचे निधन झाले. आता परत ही नवीन दुकानदारी सुरू झाल्याचे मलकितसिंग प्रधान यांनी म्हटले आहे. शीख समुदायाचे मूळ शाैर्य, त्याग, बलिदान आणि सेवेत आहे. त्यामुळे वेळोवेळी सुरू होणाऱ्या अशा नवनव्या दुकानदारीला स्थान नसल्याचेही बल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Punjabपंजाब