शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी झोडपतो अवकाळी, शासन धोरणात बदल मात्र नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘पोळा, अन्‌ पाऊस झाला भोळा’ असा विदर्भात समज आहे. यापूर्वीची स्थिती लक्षात घेतली तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘पोळा, अन्‌ पाऊस झाला भोळा’ असा विदर्भात समज आहे. यापूर्वीची स्थिती लक्षात घेतली तर तो काही खोटा नाही. पोळ्यानंतर पाऊस कमी होत जातो, नंतर मृग नक्षत्रापासून पुन्हा मान्सून बरसतो. मात्र अलीकडे विदर्भातील शेतकऱ्यांना दरवर्षी वेगळाच अनुभव येत आहे. डिसेंबरपासून पाऊस पुन्हा येतो. एप्रिल-मे महिन्यातही चिंब भिजवृून जातो. सरासरीपेक्षा हा पाऊस अधिक पडत असला आणि बरेच नुकसान करणारा असला तरी शासन धोरणात मात्र या बदलाची अद्याप दखल घेतलेली दिसत नाही.

विदर्भात मागील सहा-सात वर्षांपासून सातत्याने अवकाळी पाऊस येत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून त्याचे आगमन होते. तो पुढे मार्च-एप्रिलपर्यंत अधूनमधून येत राहतो. मागील काही वर्षांपासून ऋतुमान बदलले, त्यामुळे पावसाचे वेळापत्रकही बदलले. जूनमध्ये हमखास येणारा मृगाचा पाऊस जुलैपर्यंत लांबला. त्यामुळे सरासरी पर्जन्यमानात बदल झाला आहे.

दुष्काळ, पैसेवारी, टंचाई, आपात्कालीन पीक परिस्थिती ठरविण्यासाठी या सरासरी पर्जन्यमानाचा वापर केला जातो. मागील सहा-सात वर्षात डिसेंबर ते एप्रिल-मे या काळात सरासरी पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस पडत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान होत आहे. सोयाबीन, गहू, फळ उत्पादक तसेच भाजीपाला उत्पादकांना याचा फटका दरवर्षीच बसत आहे. मात्र अवकाळी पावसाच्या नावाखाली शेतकऱ्यांना कसलीही मदत दिली जात नाही. प्रत्यक्षात सरासरी पर्जन्यमानाचा विचार करून महसूल आणि कृषी विभागाने यासाठी संयुक्त धोरण आखण्याची गरज आहे. मात्र याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांचा आवाजही शासनापर्यंत कुणीच पोहचवीत नसल्याने त्यांना दरवर्षी अश्रू पिऊन परिस्थितीला सामोरे जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे.

...

शासनाचा शब्दांचा खेळ!

पावसाळा संपल्यावर चक्क दिवाळीनंतरही विदर्भात पाऊस येत असतो. मात्र त्याला अवकाळी न म्हणता परतीचा पाऊस म्हणा, असा शब्दांचा खेळ प्रशासन करत असते. पश्चिम महाराष्ट्रातील भौगोलिक वातावरणानुसार तिकडे तशी परिस्थिती आहे. मात्र ही सरसकट मोजपट्टी मागील अनेक वर्षांपासून विदर्भातही लावली जात आहे. शासनाच्या रेकॉर्डवरही याची नोंद परतीचा पाऊस अशीच होत असल्याने, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीमध्ये सोईस्करपणे तांत्रिक अडथळे घालणे सोपे झाले आहे.

...

कोट

साधारणत: जानेवारीनंतर येणारा पाऊस अवकाळी असतो. त्याचा अंदाज तीन-चार दिवसापूर्वी येत असल्याने, सरासरी पर्जन्यमानामध्ये कायमस्वरूपी बदल करणे शक्य नसते. मात्र कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सावधगिरीचा आम्ही इशारा देत असतो. यंदाही पावसाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले आहे.

- मिलिंद शेंडे, जिल्हा कृषी अधीक्षक

...

नागपूर जिल्ह्यात ७ वर्षातील अवकाळी पाऊस

महिना - जानेवारी - फेब्रुवारी -मार्च - एप्रिल - मे

सरासरी - १२.७ - १२.१ - १४.५ - ७.२ - ११.५

वर्ष

२०१४ - ... - ५३.१ - ... - ... - ...

२०१५ - ७.२ - ११.१ - ७५.५ - ३५.७ - २३.८

२०१६ - ... - ४.६ - १८.४ - १२.४ - ५.९

२०१७ - २.० - ... -... - ... - ७.६

२०१८ - ... - १७.२ - ०.७ - १०.८ - ७.६

२०१९ - ... - ... - ... - ... - ...

२०२० - ४३.७ - १५.३ - २०.६ - ६.४ - १२.१

...