शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कशी होणार ‘व्हीआयपी’नेत्यांची सुरक्षा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:08 IST

जगदीश जोशी नागपूर : स्पेशल प्रोटेक्शन युनिट (एसपीयू) मधील हवालदार प्रमोद मेरगुरवार याने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या केल्यामुळे व्हीआयपी ...

जगदीश जोशी

नागपूर : स्पेशल प्रोटेक्शन युनिट (एसपीयू) मधील हवालदार प्रमोद मेरगुरवार याने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या केल्यामुळे व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. व्हाईट फंगसमुळे डोळा गमावलेल्या प्रमोदला सहजरीत्या एसपीयू अधिकाऱ्यांनी नोकरीवर रुजू करून सर्व्हिस रिव्हॉल्व्हर दिली, त्यामुळे व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेला काही महत्त्व दिले जात नसल्याचे उघड झाले असून सत्यस्थिती पुढे आल्यानंतर एसपीयू आपला बचाव करण्यात गुंतले आहे.

मुख्यमंत्री, राज्यपाल, कॅबिनेट मंत्र्यांसह दहशतवाद्यांपासून धोका असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीयूकडे आहे. मागील काही वर्षांपासून नागपुरात व्हीआयपी व्यक्तींची संख्या वाढल्यामुळे एसपीयू युनिटचे महत्त्व खूप वाढले आहे. ज्यांची शरीरयष्टी, मानसिक स्थिती चांगली आहे अशाच अधिकारी, कर्मचाऱ्यांना एसपीयूत सामील करून घेतले जाते. याच कारणामुळे एसपीयूच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुण्याच्या महाराष्ट्र इंटेलिजन्स अ‍ॅकेडमी (एमआयए) मध्ये एका महिन्याचे कठीण प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात शरीर मजबूत ठेवणे तसेच कठीण परिस्थितीत मानसिक संतुलन योग्य ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. याशिवाय डोळ्यावर पट्टी बांधून पापणी बंद होताच गोळी झाडून हल्लेखोराला मारण्याचे किंवा व्हीआयपी नेत्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याची रंगीत तालीमही करवून घेण्यात येते. एसपीयू अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्तर तपासण्यासाठी सहा-सहा महिन्यांच्या अंतराने रिफ्रेशमेंट कोर्सचेही आयोजन करण्यात येते. एवढे सगळे होऊनही घडलेले ताजे प्रकरण एसपीयूची सद्यस्थिती कळण्यासाठी पुरेसे आहे. सूत्रांनुसार, एमआयएच्या प्रशिक्षणात निष्काळजीपणा बाळगण्यात येतो. तैनात झाल्यानंतर खूप दिवसांनी प्रशिक्षण मिळत नाही. तसेच प्रशिक्षणात अनुत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा प्रशिक्षण देण्यासाठी विलंब लावण्यात येतो. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवडीतही गुणवत्तेकडे लक्ष देण्यात येत नाही. येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी संख्या शहर किंवा ग्रामीण पोलिसातून येते. पोलीस ठाण्यात कामाचा खूप ताण असतो. या ताणापासून सुटका करून घेण्यासाठी अनेकजण एसपीयू किंवा बीडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक पथक) मध्ये ड्युटी लावून घेतात. तैनात झाल्यानंतर ते अधिकाऱ्यांना खूश करतात. यामुळे योग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना एसपीयूत स्थान मिळत नाही. एसपीयूचे नागपूर युनिट रस्ते अपघातांमुळेही चर्चेत राहिले आहे. त्यात अनेक कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यानंतरही एसपीयूला आधुनिक वाहन मिळत नाहीत. व्हीआयपी नेत्यांची वाहने १०० पेक्षा अधिक वेगाने धावतात. परंतु एसपीयूची वाहने ७० ते ८० किलोमीटरच्या वेगापेक्षा अधिक धावू शकत नाहीत. त्यामुळे व्हीआयपींच्या दौऱ्यात एसपीयू टीम अनेकदा अपघातग्रस्त झाल्या आहेत.

.........

दिल्लीतही टीम तैनात

राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यावर जातात. त्यामुळे एसपीयूची एक टीम दिल्लीत तैनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कधीतरी दिल्लीला जातात. प्रोटोकॉलनुसार त्यांना दिल्ली पोलिसांची सुरक्षा मिळते. परंतु एसपीयूची टीम नावापुरती काम करते. अनेक वर्षांपासून ही टीम दिल्लीत आहे.

............