शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

उपराजधानीतील विद्यार्थ्यांचा प्रवास कसा होईल सुरक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 10:51 IST

उपराजधानीतील शालेय विद्यार्थ्यांचा सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न जिकरीचा झाला आहे.

ठळक मुद्देसमिती कागदावरचपालकांनी कुणाच्या विश्वासावर मुले सोपवायची?

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी आठवर्षीय चिमुकल्याच्या स्कूलबस अपघाताने पालक मन सुन्न झाले आहे. या वर्षातील स्कूलबस अपघाताची ही दुसरी घटना आहे. गेल्या वर्षी स्कूलबस अपघाताने दोघांचा जीव गेला आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी कठोर स्कूल बस नियमावली तयार करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा या उद्देशातून सर्वच शाळांमध्ये शालेय परिवहन समित्या स्थापन करण्याचे शासनाचा आदेश आहेत. मात्र, जिल्ह्यातील ४०६० शाळांमधून ३८५५वर शाळांमध्ये ही समिती स्थापन झाली. समिती कागदापुरतीच मर्यादित आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी आपली नाहीच, असे गृहित धरत आजही अनेक शाळा दुर्लक्ष करीत आहे तर ‘आरटीओ’ही याला गंभीरतेने घेत नसल्याने अपघाताचे सत्र सुरूच आहे.शालेय विद्यार्थ्यांचा सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न जिकरीचा झाला आहे. यावर उपाय म्हणून २०११ मध्ये राज्य सरकारच्या परिवहन विभागाने प्रत्येक शाळा किंवा महाविद्यालयांत शालेय परिवहन समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. परंतु याकडे लक्षच दिले जात नाही. हिवाळी अधिवेशनात या वृत्ताला घेऊन तारांकित प्रश्न उपस्थित झाला. त्यवेळी तात्पुरते शालेय शिक्षण व क्रीडा विभाग खडबडून जागा झाला होता. प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही (आरटीओ) समिती स्थापन न करणाऱ्या शाळांच्या स्कूलबसच्या परवाना शुल्कात सवलत रद्द करण्यात येईल, असे आदेश काढले. यामुळे ३८५५ शाळांमध्ये समित्या स्थापन झाल्या. सध्या २०५ शाळा अद्यापही समित्यापासून दूर आहेत. यात खासगी अनुदानित, विना अनुदानित व इतर शाळांची संख्या मोठी आहे. या शाळांवर कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, ज्या शाळांमध्ये या समिती स्थापन करण्यात आल्या आहेत, त्या खरच काम करीत आहे की, नाही याकडे कुणाचेच लक्ष नाही. समितीच्या बैठकीचे ‘मिनिट्स’ आरटीओकडे पाठविणे अनिवार्य असताना बहुसंख्य शाळांनी हे मिनिट्सच पाठविले नाही. यावरून समिती आपल्या जबाबदाऱ्यांपासून उदासीन असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा