शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

पंचनामेच उशिरा तर कशी मिळणार शेतकऱ्यांना मदत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:09 IST

सौरभ ढोरे काटोल : गतवर्षी अतिवृष्टीमुळे काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यात खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्ती अनुदानासाठी ...

सौरभ ढोरे

काटोल : गतवर्षी अतिवृष्टीमुळे काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यात खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्ती अनुदानासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात अर्ज केले. मात्र, यातील बहुतांशी जागी उशिरा पंचनामे करण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यास विलंब झाल्याची माहिती आहे.

शासन परिपत्रक २० जुलै २०१५ नुसार नुकसान झाल्याच्या १५ दिवसांच्या आत पंचनामे करून संबंधित प्रशासनाकडे अहवाल पाठविणे आवश्यक असते. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे आता तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून मुकण्याची शक्यता आहे.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या व बुजल्या. काहींचे मोटारपंपसुद्धा पाण्यात बुडाले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अशाप्रकारे कुठे हानी झाल्यास त्या भागातील तलाठी, कृषी सहायक व तांत्रिक अधिकारी यांच्याकडून संयुक्तपणे पाहणी करून घेण्याची जबाबदारी तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात आली आहे. तहसील कार्यालयाने तसे पत्रसुद्धा संबंधितांना दिले. शासन निर्णयानुसार अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात १५ दिवसांच्या आत पाठविणे गरजेचे होते. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत दुरुस्ती निधी उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र, यातील मुख्य दुवा असलेल्या लघुसिंचन विभागाने कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे पत्र तहसील कार्यालयाला देत हात वर केले. त्यामुळे पंचनाम्याचे काम लांबणीवर गेले. याचा १५० शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.

सिंचन विभाग दोषी नाही का?

सिंचन विभागाने कर्मचारी नसल्याने पंचनामे करण्यास असमर्थता दर्शविली आहे. मात्र, हे कारण त्यांनी वेळेत सांगणे गरजेचे होते. त्यांच्या या दिरंगाईचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. तालुक्यातील बंधारे दुरुस्तीच्या कामातही सिंचन विभागाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तक्रारी दाखल झाल्या होत्या.

-

२०१८- २०१९ मध्ये सुद्धा प्रशासकीय दिरंगाईचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला होता. काटोल तालुक्यातून १०० च्या वर प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आली होती; परंतु एकही प्रकरण मंजूर झाले नव्हते.

--

नुकसानभरपाईसंदर्भात शेतकऱ्यांचे आलेले अर्ज संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले. त्याची पूर्तता करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

अजय चरडे, तहसीलदार, काटोल

-

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या. मात्र, खचलेल्या विहिरीचे पंचनामे करण्यात विलंब करण्यात आला. शासनाचे सर्व नियम शेतकऱ्यांनाच लागू पडतात. यात अधिकाऱ्यांना सवलत देण्यात आली आहे का, नसेल तर याप्रकरणी संबंधितांना सरकार जाब विचारणार आहे का?

- संदीप सरोदे, जिल्हाध्यक्ष, किसान विकास आघाडी, भाजप.