शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शासनाचा ऑनलाईन प्रश्नसंच ग्रामीण भागात किती उपयोगी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:07 IST

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता ...

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता प्रश्नसंच ऑनलाईन तयार करण्यात आला आहे. हा प्रश्न संच ग्रामीण भागात उपयोगी ठरेल का? असा सवाल शिक्षकांचा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तरी छापील संच देण्यात यावा, अशी शिक्षकांची मागणी आहे.

शासनाने ऑनलाईन शिक्षणावर भर देताना मागास जिल्ह्यांचा विचार केला नसल्याचे वेळेवेळी दिसून आले. ऑनलाईनची सुविधा आणि साहित्यही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. आता शासनाने विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन प्रश्नसंच उपलब्ध करून दिला आहे. ऑनलाईन प्रश्न संचातही काही त्रुटी आहेत, इयत्ता दहावीच्या प्रश्नसंचात काहीच विषयाचे पेपर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत. विद्यार्थी जेव्हा ही लिंक उघडतो तेव्हा ‘आपला ठाकरे’ असा ब्लॉग ओपन होतो, इथे विद्यार्थ्यांचा राजकारणाशी काय संबंध अशी चर्चा शिक्षण वर्तुळात रंगत आहे. वेगवेगळ्या ऑनलाईन शिकवणी वर्गाच्या अप्लिकेशन पुढे येतात. तसेच लिंक ओपन व्हायला बराच वेळ लागतो, मोठ्या प्रमाणात डाटा खर्च होतो, त्यासाठी इंटरनेट व अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईलची गरज आहे.

- शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रश्न पेढ्यातयार केल्यात पण ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल, इंटरनेट व प्रिंटर नाहीत त्यांना काय उपयोग? ऑनलाईनऐवजी छापील प्रश्नसंच ग्रामीण, दुर्गम, डोंगराळ व आदिवासींच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक होते.

अनिल शिवणकर, संयोजक, भाजप शिक्षक आघाडी