शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

गॅस अनुदान बंद करून अच्छे दिन कसे येणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:58 IST

अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. मात्र, सरकारचे लोकहितविरोधी निर्णय घेणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत घरगुती गॅस सिंलेडवर मिळणारे अनुदान ....

ठळक मुद्देअनिल देशमुख यांचा सवाल : मोठे आंदोलन उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. मात्र, सरकारचे लोकहितविरोधी निर्णय घेणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत घरगुती गॅस सिंलेडवर मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच घरगुती सिलेंडरचे भाव ७ रुपयांनी वाढविले आहे. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल करीत अनुदान बंद केले व दरवाढ रद्द केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.देशमुख म्हणाले, सद्यस्थितीत एका घरगुती सिंलेडरमागे १५० रुपये अनुदान देण्यात येते. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सरकार असताना मी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा मंत्री असताना घरगुती गॅस सिलेंडवर मिळणारे अनुदान थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करणारी योजना सुरु केली होती. परंतु आता भाजपा सरकार सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणीत टाकण्याचे काम करीत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आुदान सोडण्याचे आवाहन केले. गरीब कुटुंबांना उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठी त्यांनी हे आवाहन केले होते. परंतु याही योजनेच्या माध्यमातून गरीब जनतेला फसविण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. जोपर्यंत कनेक्शनचे १६०० रुपये पूर्ण जमा होणार नाही तोपर्यंत सिलेंडरची सबसिडी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गॅस सिलेंडरसारखीच केरोसीनची सुध्दा सबसिडी बंद करण्याचे सरकारचे धोरण आहे. २०१६ पासून दर १५ दिवसाला २५ पैसे भाववाढ करण्यात येत आहे. शिवाय देशातील अनेक भाग केरोसीनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशातील कोट्यवधी गरीब कुटुंबास याचा फटका बसणार आहे. एकीकडे मोठमोठ्या उद्योगपतींचे हजारो करोड रुपयाचे कर्ज माफ करायचे आणि दुसरीकडे गरीब जनतेला देण्यात येणारे अनुदान बंद करायचे हे कसले धोरण आहे. भाजपाने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.