शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गॅस अनुदान बंद करून अच्छे दिन कसे येणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:58 IST

अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. मात्र, सरकारचे लोकहितविरोधी निर्णय घेणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत घरगुती गॅस सिंलेडवर मिळणारे अनुदान ....

ठळक मुद्देअनिल देशमुख यांचा सवाल : मोठे आंदोलन उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. मात्र, सरकारचे लोकहितविरोधी निर्णय घेणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत घरगुती गॅस सिंलेडवर मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच घरगुती सिलेंडरचे भाव ७ रुपयांनी वाढविले आहे. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल करीत अनुदान बंद केले व दरवाढ रद्द केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.देशमुख म्हणाले, सद्यस्थितीत एका घरगुती सिंलेडरमागे १५० रुपये अनुदान देण्यात येते. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सरकार असताना मी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा मंत्री असताना घरगुती गॅस सिलेंडवर मिळणारे अनुदान थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करणारी योजना सुरु केली होती. परंतु आता भाजपा सरकार सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणीत टाकण्याचे काम करीत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आुदान सोडण्याचे आवाहन केले. गरीब कुटुंबांना उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठी त्यांनी हे आवाहन केले होते. परंतु याही योजनेच्या माध्यमातून गरीब जनतेला फसविण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. जोपर्यंत कनेक्शनचे १६०० रुपये पूर्ण जमा होणार नाही तोपर्यंत सिलेंडरची सबसिडी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गॅस सिलेंडरसारखीच केरोसीनची सुध्दा सबसिडी बंद करण्याचे सरकारचे धोरण आहे. २०१६ पासून दर १५ दिवसाला २५ पैसे भाववाढ करण्यात येत आहे. शिवाय देशातील अनेक भाग केरोसीनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशातील कोट्यवधी गरीब कुटुंबास याचा फटका बसणार आहे. एकीकडे मोठमोठ्या उद्योगपतींचे हजारो करोड रुपयाचे कर्ज माफ करायचे आणि दुसरीकडे गरीब जनतेला देण्यात येणारे अनुदान बंद करायचे हे कसले धोरण आहे. भाजपाने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.