शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बोगस बियाणे, खतांवर कसा बसणार आळा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:01 IST

खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे, खतांची विक्री करण्यात येते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. प्रत्येक तालुक्यात एक व जिल्हास्तरावर एक असे १४ भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. मात्र भरारी पथकाजवळ वाहनच नसल्याने बोगसगिरीवर कसा आळा बसणार असा सवाल निर्माण होत आहे.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय भरारी पथक वाहनाविना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे, खतांची विक्री करण्यात येते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. प्रत्येक तालुक्यात एक व जिल्हास्तरावर एक असे १४ भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. मात्र भरारी पथकाजवळ वाहनच नसल्याने बोगसगिरीवर कसा आळा बसणार असा सवाल निर्माण होत आहे.खरीप हंगामासाठी जिल्ह्याचा कृषी विभाग सज्ज झाला आहे. खरीपासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने यंदा ५ लाख ६ हजार ७०० हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. याशिवाय बियाणे व खतांचेही नियोजन विभागाकडून करण्यात आले आहे. आवश्यक बियाणे आणि खतांची उपलब्धता झाली असून, कृषी सेवा केंद्रातून या वस्तूंचे वितरण होताना गैरप्रकार होऊ नयेत यासाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. जिल्हा स्तरावरावरील भरारी पथकात जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख हे भरारी पथकाचे अधिकारी आहे. तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी या पथकांचे प्रमुख आहेत. खतांचे पारदर्शकपणे वितरण करणे, शासकीय किमतीत खताची विक्री होते की नाही, अवैध साठा हुडकून काढणे, तक्रारींचे निवारण करणे आदी कर्तव्य या पथकाला पार पाडावी लागणार आहेत. मात्र, जिल्हास्तरीय भरारी पथकाला शासनाकडून वाहनच उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. राज्य शासनाचा कृषी विभाग, ग्राम विकास विभागही या जिल्हास्तरीय पथकाला वाहन उपलब्ध करून देण्यातही अपयशी ठरल आहे. असे असतानाही आजवर या जिल्हास्तरीय पथकाने बोगस बियाणांची साठवणूक करणाऱ्या चार प्रकरणाचा पदार्फाश केला आहे. यात एकूण २१ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पथकाला यश आले आहे. मात्र त्यांच्या या कामाची शासनस्तरावरून दखल घेतली जात नसल्याचे दिसते आहे.

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर