शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

बोगस बियाणे, खतांवर कसा बसणार आळा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:01 IST

खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे, खतांची विक्री करण्यात येते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. प्रत्येक तालुक्यात एक व जिल्हास्तरावर एक असे १४ भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. मात्र भरारी पथकाजवळ वाहनच नसल्याने बोगसगिरीवर कसा आळा बसणार असा सवाल निर्माण होत आहे.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय भरारी पथक वाहनाविना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे, खतांची विक्री करण्यात येते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. प्रत्येक तालुक्यात एक व जिल्हास्तरावर एक असे १४ भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. मात्र भरारी पथकाजवळ वाहनच नसल्याने बोगसगिरीवर कसा आळा बसणार असा सवाल निर्माण होत आहे.खरीप हंगामासाठी जिल्ह्याचा कृषी विभाग सज्ज झाला आहे. खरीपासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने यंदा ५ लाख ६ हजार ७०० हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. याशिवाय बियाणे व खतांचेही नियोजन विभागाकडून करण्यात आले आहे. आवश्यक बियाणे आणि खतांची उपलब्धता झाली असून, कृषी सेवा केंद्रातून या वस्तूंचे वितरण होताना गैरप्रकार होऊ नयेत यासाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. जिल्हा स्तरावरावरील भरारी पथकात जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख हे भरारी पथकाचे अधिकारी आहे. तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी या पथकांचे प्रमुख आहेत. खतांचे पारदर्शकपणे वितरण करणे, शासकीय किमतीत खताची विक्री होते की नाही, अवैध साठा हुडकून काढणे, तक्रारींचे निवारण करणे आदी कर्तव्य या पथकाला पार पाडावी लागणार आहेत. मात्र, जिल्हास्तरीय भरारी पथकाला शासनाकडून वाहनच उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. राज्य शासनाचा कृषी विभाग, ग्राम विकास विभागही या जिल्हास्तरीय पथकाला वाहन उपलब्ध करून देण्यातही अपयशी ठरल आहे. असे असतानाही आजवर या जिल्हास्तरीय पथकाने बोगस बियाणांची साठवणूक करणाऱ्या चार प्रकरणाचा पदार्फाश केला आहे. यात एकूण २१ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पथकाला यश आले आहे. मात्र त्यांच्या या कामाची शासनस्तरावरून दखल घेतली जात नसल्याचे दिसते आहे.

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर