शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

कशी नशिबाने थट्टा आज मांडली ? डॉक्टरला बनविले कोतवाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:25 IST

ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा फटका अनेक उच्चशिक्षितांना बसतो आहे. जळगाव जिल्ह्यातील दिलीप साळवे हे व्हेटर्नरी डॉक्टर आहेत. सरकारी नोकरीसाठी जंगजंग पछाडले, पण नशिबाला कोतवाली भेटली.

ठळक मुद्देना पदोन्नती, ना वेतनवाढ : १० रुपये मिळतो चप्पल भत्ता

आॅनलाईन लोकमतनागपूर : ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा फटका अनेक उच्चशिक्षितांना बसतो आहे. जळगाव जिल्ह्यातील दिलीप साळवे हे व्हेटर्नरी डॉक्टर आहेत. सरकारी नोकरीसाठी जंगजंग पछाडले, पण नशिबाला कोतवाली भेटली. आज ते कोतवालांना चतुर्थ श्रेणी द्यावी यासाठी सरकार दरबारी संघर्ष करीत आहे. रोजगाराच्या बाबतीत ग्रामीण भागात असलेली उदासिनता आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोतवाल झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे उपाध्यक्ष असलेल्या दिलीप साळवे यांनी मोर्चाच्या स्थळी कोतवालांची दुरवस्थाच मांडली. वकील आणि कित्येक उच्चशिक्षित आज चौथी पास पात्रता असलेल्या कोतवालाची नोकरी करीत आहे. तलाठ्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कोतवालाला मानधन अत्यल्प असले तरी, त्याच्या कामाचा अवाका व्यापक आहे. पाच गावाची जबाबदारी असलेल्या कोतवालाला कायदा व सुव्यवस्थेबरोबरच आकस्मिक घटना, सरकारी योजनेची माहिती गावोगावी पुरविणे, तहसीलदार सांगेल ते काम करणे, कधी अधिकाऱ्याच्या बंगल्यावर तर कधी तहसील कार्यालयाच्या मुताऱ्याही साफ कराव्या लागतात. त्याबदल्यात मिळतात ५००० रुपये मानधन आणि १० रुपये चप्पल भत्ता. ६८ वर्षांपासून कोतवालांचा संघर्ष सुरू आहे. विशेष म्हणजे कोतवालाला ना पदोन्नती आहे, ना वेतनवाढ. ६८ वर्षात कोतवालाचे मानधन ५००० झाले. २ रुपयाचा चप्पलभत्ता १० रुपये झाला. कित्येक सरकार आले आणि गेले, विरोधात असताना नेत्यांनी कोतवालांच्या प्रश्नावर सभागृह बंद पाडले. हेच विरोधक सत्तेत आले, तेव्हा कोतवालांचे प्रश्न त्यांच्या विस्मृतीस गेले. आजही हे उच्चशिक्षित कोतवाल चतुर्थश्रेणीसाठी मोर्चे, धरणे, आंदोलन करून सरकारदरबारी संघर्ष करीत आहे.

टॅग्स :Nagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनdoctorडॉक्टर