शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ओबीसींनी प्रस्थापितांच्या गुलामगिरीत कितीदा अस्तित्व खड्ड्यात घालायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:07 IST

नागपूर : ओबीसीची एखादी व्यक्ती सत्तेत असते, पण तीसुद्धा प्रस्थापित तंत्राचा गुलाम दिसते. आमच्या चळवळीही प्रस्थापित देतात, त्यावर समाधानी ...

नागपूर : ओबीसीची एखादी व्यक्ती सत्तेत असते, पण तीसुद्धा प्रस्थापित तंत्राचा गुलाम दिसते. आमच्या चळवळीही प्रस्थापित देतात, त्यावर समाधानी दिसतात. त्याचा परिणाम अख्ख्या समाजाला भोगत राहावा लागतो. ओबीसींनी प्रस्थापितांच्या गुलामगिरीकरिता कितीदा आपले अस्तित्व खड्ड्यात घालायचे. त्यामुळे ओबीसीला समाधानी की स्वाभिमानी यातून एक पर्याय निवडावा लागणार आहे, असे मत संमेलनाध्यक्ष नितीन चौधरी यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या स्थापनेस ३० वर्षे पूर्ण झाली. संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने तीनदिवसीय राष्ट्रीय डिजिटल अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन नॅकडोर दिल्लीचे संस्थापक अशोक भारती यांनी केले. उद्घाटनाला मुख्य अतिथी म्हणून डॉ. लता प्रतिभा मधुकर व बिहारचे मुस्लिम नेते इरफान फातमी उपस्थित होते. उद्घाटक म्हणून बोलताना अशोक भारती म्हणाले, ५२ टक्के ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षणाची शिफारस का केली. त्यामुळे भागीदारीचा लोकशाही सिद्धान्त ओबीसीला नव्याने उभा करावा लागणार आहे. ओबीसी चळवळीने मंडलच्या बाहेर पडण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. लता प्रतिभा मधुकर यांनी ओबीसी आंदोलनात ओबीसी महिलांचे योगदान असताना केवळ पुरुषी नेतृत्वाला स्थान मिळते, यावर प्रकाश टाकला. या अधिवेशनात काही ठराव घेण्यात आले. या अधिवेशनात भूषण दडवे, गीता महाले, अजित भाकरे, अस्लम खातमी, झारखंडचे अध्यक्ष राजेशकुमार गुप्ता, उत्तर प्रदेशचे डॉ. अभिलाष सिंह मौर्य, मध्य प्रदेशचे जगदीश यादव, बिहारचे अनिरुद्ध गुप्ता यांच्यासह वर्धा येथून तुषार पेंढारकर, गडचिरोली अरुण मुनघाटे, अमरावती महेश देशमुख, नागपूर डॉ. अनिल ठाकरे, नारायणराव चिंचोणे, अ‍ॅड विनोद खोबरे, राम वाडीभस्मे, अ‍ॅड. छाया यादव, संजय भोगे, अरुण पाटमासे आदी सहभागी झाले होते.