शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
4
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
5
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
6
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
7
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
8
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
9
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
10
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
12
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
13
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
14
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
15
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
16
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
17
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
18
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
19
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
20
Scam Alert: वाहन चालकांनो, ‘RTO’ कधीच ‘एपीके’ पाठवत नाही; लायसन्स व्हेरिफिकेशनच्या आडून लूट
Daily Top 2Weekly Top 5

पटोलेंनी भंडारा-गोंदियात किती प्रकल्प आणले? मुख्यमंत्र्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:04 IST

काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियात किती प्रकल्प आणले हे आधी सांगावे? असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नाकर्त्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. पटोलेंचा पक्ष बदलूपणा साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांना नागपुरात काहीच साध्य होणार नाही. भंडारा-गोंदियाचे हे पार्सल परत करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत केले.

ठळक मुद्देनाकर्त्या कारभाराचा घेतला समाचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियात किती प्रकल्प आणले हे आधी सांगावे? असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नाकर्त्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. पटोलेंचा पक्ष बदलूपणा साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांना नागपुरात काहीच साध्य होणार नाही. भंडारा-गोंदियाचे हे पार्सल परत करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत केले.केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी शहीद चौक येथे सोमवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाना पटोले हे एका पक्षाकडून निवडणूक लढतात, मग तीन वर्षांनी त्याच पक्षावर टीका करत दुसरीकडे प्रवेश करतात. त्यानंतर परत तोच क्रम सुरू असतो. इतके वेळा आमदार आणि खासदार राहूनदेखील त्यांनी विकास केला नाही. नितीन गडकरी यांनी नागपूरचा कायापालट केला. याअगोदर ज्या नेत्यांना नागपूरच्या जनतेने दिल्लीत पाठविले व मंत्रिपद मिळवून दिले. त्यांनी दिल्लीत केवळ पक्षश्रेष्ठींसमोर ‘मुजरा’च घालत जीहुजूरी केली व त्यातच धन्यता मानली. काँग्रेसमुळेच भ्रष्टाचाराची परंपरा सुरू झाली. मतांच्या राजकारणामुळे काँग्रेसचे नेते देशाला विसरले आहेत. म्हणूनच काँग्रेसने जाहीरनाम्यात जम्मू-काश्मिरातील सैन्य परत घेऊ, सैन्यांचे विशेष अधिकार काढून टाकू, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणारे कलम १२४ (अ) काढून टाकू, असा उल्लेख केला आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले. २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर कुठलीही ठोस कारवाई केली नाही. अगोदरच्या पंतप्रधानांनी कणाहीन असल्यासारखी भूमिका घेतली होती. यंदाची निवडणूक ही विकासासोबतच देशाच्या अस्मितेचीदेखील आहे, असे ते म्हणाले. यावेळी आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर अर्चना डेहनकर, प्रवीण दटके, नगरसेवक दयाशंकर तिवारी, बंडू राऊत, शिवसेनेचे मंगेश कडव, गजेंद्र पांडे प्रामुख्याने उपस्थित होते.दोन वर्षांत गोसेखुर्द पूर्ण होणारमी लहानपणापासून गोसेखुर्द प्रकल्पाचे नाव ऐकत होतो. मात्र २०१४ पर्यंत त्याचे संथगतीने काम सुरू होते. २०१४ साली या प्रकल्पामुळे ८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती. सध्या हे प्रमाण ५८ हजार हेक्टर इतके असून, पुढील वर्षी १ लाख हेक्टर सिंचनक्षेत्र यामुळे निर्माण होईल. पुढील दोन वर्षांत गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019