शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पटोलेंनी भंडारा-गोंदियात किती प्रकल्प आणले? मुख्यमंत्र्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:04 IST

काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियात किती प्रकल्प आणले हे आधी सांगावे? असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नाकर्त्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. पटोलेंचा पक्ष बदलूपणा साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांना नागपुरात काहीच साध्य होणार नाही. भंडारा-गोंदियाचे हे पार्सल परत करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत केले.

ठळक मुद्देनाकर्त्या कारभाराचा घेतला समाचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियात किती प्रकल्प आणले हे आधी सांगावे? असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नाकर्त्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. पटोलेंचा पक्ष बदलूपणा साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांना नागपुरात काहीच साध्य होणार नाही. भंडारा-गोंदियाचे हे पार्सल परत करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत केले.केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी शहीद चौक येथे सोमवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाना पटोले हे एका पक्षाकडून निवडणूक लढतात, मग तीन वर्षांनी त्याच पक्षावर टीका करत दुसरीकडे प्रवेश करतात. त्यानंतर परत तोच क्रम सुरू असतो. इतके वेळा आमदार आणि खासदार राहूनदेखील त्यांनी विकास केला नाही. नितीन गडकरी यांनी नागपूरचा कायापालट केला. याअगोदर ज्या नेत्यांना नागपूरच्या जनतेने दिल्लीत पाठविले व मंत्रिपद मिळवून दिले. त्यांनी दिल्लीत केवळ पक्षश्रेष्ठींसमोर ‘मुजरा’च घालत जीहुजूरी केली व त्यातच धन्यता मानली. काँग्रेसमुळेच भ्रष्टाचाराची परंपरा सुरू झाली. मतांच्या राजकारणामुळे काँग्रेसचे नेते देशाला विसरले आहेत. म्हणूनच काँग्रेसने जाहीरनाम्यात जम्मू-काश्मिरातील सैन्य परत घेऊ, सैन्यांचे विशेष अधिकार काढून टाकू, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणारे कलम १२४ (अ) काढून टाकू, असा उल्लेख केला आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले. २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर कुठलीही ठोस कारवाई केली नाही. अगोदरच्या पंतप्रधानांनी कणाहीन असल्यासारखी भूमिका घेतली होती. यंदाची निवडणूक ही विकासासोबतच देशाच्या अस्मितेचीदेखील आहे, असे ते म्हणाले. यावेळी आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर अर्चना डेहनकर, प्रवीण दटके, नगरसेवक दयाशंकर तिवारी, बंडू राऊत, शिवसेनेचे मंगेश कडव, गजेंद्र पांडे प्रामुख्याने उपस्थित होते.दोन वर्षांत गोसेखुर्द पूर्ण होणारमी लहानपणापासून गोसेखुर्द प्रकल्पाचे नाव ऐकत होतो. मात्र २०१४ पर्यंत त्याचे संथगतीने काम सुरू होते. २०१४ साली या प्रकल्पामुळे ८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती. सध्या हे प्रमाण ५८ हजार हेक्टर इतके असून, पुढील वर्षी १ लाख हेक्टर सिंचनक्षेत्र यामुळे निर्माण होईल. पुढील दोन वर्षांत गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019