शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी किती लोकांच्या मृत्यूची वाट पाहणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:09 IST

काटोल : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. योग्य उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांचा घरीच जीव जातोय. अशात ...

काटोल : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. योग्य उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांचा घरीच जीव जातोय. अशात काटोल येथील श्री सती अनसूया माता देवस्थान येथे विलगीकरण केंद्र सुरू करण्यास स्थानिक प्रशासनाने हात आखडता घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे काटोलचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार तालुक्यात कोरोनाचे संक्रमण अधिक वाढल्यानंतर या केंद्राला मान्यता देतील का, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिक विचारत आहेत.

काटोल तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता श्री अनसूया माता देवस्थानच्या वतीने मंदिराच्या एका सभागृहात बाधित रुग्णांसाठी ८५ बेडची व्यवस्था केली. येथे विलगीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्तावही त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिला, मात्र याला अद्यापही मंजुरी मिळाली नाही.

ग्रामीण भागात गृहविलगीकरण केवळ नावापुरते आहे. तालुक्यात असे अनेक बाधित रुग्ण आहेत की ज्यांचा संसार केवळ एक किंवा दोन खोल्यात चालतो. काही बाधित रुग्ण तर झोपडपट्टीत राहतात. मग असे रुग्ण त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि गावातील नागरिकांच्या सतत संपर्कात येत असल्याने संक्रमण वाढेल की कमी होईल, असा प्रश्न आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधीपुढे योग्य नियोजनाच्या थापा मारणाऱ्या अधिकाऱ्यांना कसा पडत नाही? जोवर ज्यांच्या घरी स्वतंत्र विलगीकरणाची व्यवस्था नाही, अशा रुग्णांना तातडीने संस्थात्मक विलगीकरणात दाखल केले जाणार नाही, तोवर तालुक्यातील कोरोनाची साखळी खंडित होणार नाही, हे येथील अधिकाऱ्यांनी आधी समजून घेतले पाहिजे. अन्यथा काटोल तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्या अशीच वाढत गेल्यास यावर नियंत्रण मिळविणे कठीण होईल.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत तालुक्यात रुग्णसंख्या अधिक होती. त्यावेळी शहरात व ग्रामीण भागात विलगीकरण केंद्र उभारण्यात आले होते. यात पारडसिंगा देवस्थानच्या इमारतीचासुद्धा समावेश होता. यावेळी कोरोनाने थैमान घातले आहे. तालुक्यात विलगीकरण केंद्राची संख्या कमी असल्याने ९० टक्के रुग्ण घरीच आहेत. ते गावात कोरोना स्प्रेडरची भूमिका वठवीत आहेत, हे येथील अधिकाऱ्यांना दिसत नाही का?

गृहविलगीकरण केवळ नावापुरतेच

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे प्रमुख कारण गृहविलगीकरण आहे. ज्यांच्या घरी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नाही, त्यांच्यापासून अख्खे कुटुंब बाधीत होत आहे.

--

संस्थांच्या माध्यमातून ८५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज भासल्यास या सेंटरवर ऑक्सिजन पुरविणे व डॉक्टरची व्यवस्था करण्याचा मानस आहे. परंतु विलगीकरण केंद्र म्हणून परवानगी दिल्या जात नसल्याने आम्ही हतबल आहोत.

चरणसिंग ठाकूर

अध्यक्ष, श्री सती अनसूया देवस्थान, पारडसिंगा