शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

१३५ वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन पुलावर आणखी किती दिवस गाड्या चालविणार? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:14 IST

Nagpur News ब्रिटिश काळात बांधलेल्या या पुलाने निर्धारित १०० वर्षे टिकण्याच्या मुदतीपेक्षा ३५ वर्षे अधिकचे वय गाठले आहे. हळूहळू खिळखिळ्या हाेत चाललेल्या या पुलावर डागडुजी करून वाहतूक सुरू आहे; पण एखादा माेठा अपघात कधी हाेईल सांगता येत नाही.

ठळक मुद्देअजनी रेल्वे पुलाने गाठले १३५ वे वर्ष 

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : अजनी रेल्वे काॅलनी परिसरात प्रस्तावित आयएमएस प्रकल्पासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. मात्र, तेवढ्याच तत्परतेने अजनी रेल्वे पुलाबाबत विचार केला जात नाही. ब्रिटिश काळात बांधलेल्या या पुलाने निर्धारित १०० वर्षे टिकण्याच्या मुदतीपेक्षा ३५ वर्षे अधिकचे वय गाठले आहे. हळूहळू खिळखिळ्या हाेत चाललेल्या या पुलावर डागडुजी करून वाहतूक सुरू आहे; पण एखादा माेठा अपघात कधी हाेईल सांगता येत नाही. त्यामुळे जीर्ण झालेल्या पुलावर आणखी किती दिवस गाड्या चालविणार, असा सवाल केला जात आहे.

दक्षिण नागपूर व मध्य नागपूरला जाेडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. पुलाच्या निर्मितीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदाेलन करणारे माजी नगरसेवक तनवीर अहमद यांनी सांगितले की, १९८५ मध्ये अजनी पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर बांधकाम करणाऱ्या ब्रिटिश कंपनीने त्याची मुदत संपल्याचे व यानंतर आमची जबाबदारी राहणार नसल्याचे पत्र पाठविले हाेते. त्यावेळी रेल्वेच्या ब्रिज विभागाच्या पथकाने येथे येऊन पाहणी केली हाेती. या पथकाने आणखी २५ वर्षे पुलाला काही हाेणार नाही, असा दावा केला हाेता. २०१० मध्ये तिही मुदत संपलेली आहे. मात्र, पुलाच्या नव्याने निर्मितीसाठी काही करण्यात आले नाही. महापालिका, रेल्वे प्रशासन आणि रेल्वेमंत्र्यांनाही निवेदन सादर करण्यात आले; पण हालचाली झाल्या नसल्याचे अहमद यांनी सांगितले.

लाेखंडी गर्डरचा आधार 

१९६२-६३ च्या काळात चीन युद्धादरम्यान दारूगाेळा भरलेल्या वॅगनमध्ये पुलाखाली स्फाेट झाला हाेता. त्यावेळी पुलाला तडे गेले हाेते. त्यानंतर लाेखंडाच्या गर्डरच्या आधारे पुलाचे दाेन भाग जाेडण्यात आले.

फुटपाथ काेसळण्याचा धाेका 

पुलाच्या फुटपाथचा स्लॅब अनेक ठिकाणी जीर्ण झाला असून, त्याचे पत्रे खाली पडले आहेत. हे फुटपाथ काेसळण्याचा धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वेने बॅरिकेड लावून फुटपाथवरून रहदारी बंद केली आहे.

अनेक ठिकाणी तडे, वारंवार दुरुस्ती

पुलाच्या स्लॅबलाही अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे वारंवार डागडुजी करावी लागते. नुकतेच या पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनानुसार हा पूल १९२७ साली बांधला गेला हाेता. त्याच काळात रामझुल्याचेही बांधकाम झाले हाेते. मात्र, रामझुल्यावर एवढी वाहतूकही नाही आणि रेल्वेची अधिक रहदारीही नाही. अजनी पुलावरून प्रचंड वाहतुकीसह धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या कंपनाने तुटफूट हाेण्याचा धाेका आहे. असे असताना रामझुल्याचे नूतनीकरण झाले; पण अजनी पूल तसाच राहिला.

२०१३ मध्ये या पुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव मंजूर झाला हाेता व ३७२ काेटी रुपयांची तरतूदही करण्यात आली हाेती. मात्र, पुढे निवडणुकीनंतर पुलाचे काम पुन्हा थंडबस्त्यात गेले. यावेळी अजनी आयएमएस प्रकल्पांतर्गत नव्या पुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा