शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

१३५ वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन पुलावर आणखी किती दिवस गाड्या चालविणार? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:14 IST

Nagpur News ब्रिटिश काळात बांधलेल्या या पुलाने निर्धारित १०० वर्षे टिकण्याच्या मुदतीपेक्षा ३५ वर्षे अधिकचे वय गाठले आहे. हळूहळू खिळखिळ्या हाेत चाललेल्या या पुलावर डागडुजी करून वाहतूक सुरू आहे; पण एखादा माेठा अपघात कधी हाेईल सांगता येत नाही.

ठळक मुद्देअजनी रेल्वे पुलाने गाठले १३५ वे वर्ष 

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : अजनी रेल्वे काॅलनी परिसरात प्रस्तावित आयएमएस प्रकल्पासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. मात्र, तेवढ्याच तत्परतेने अजनी रेल्वे पुलाबाबत विचार केला जात नाही. ब्रिटिश काळात बांधलेल्या या पुलाने निर्धारित १०० वर्षे टिकण्याच्या मुदतीपेक्षा ३५ वर्षे अधिकचे वय गाठले आहे. हळूहळू खिळखिळ्या हाेत चाललेल्या या पुलावर डागडुजी करून वाहतूक सुरू आहे; पण एखादा माेठा अपघात कधी हाेईल सांगता येत नाही. त्यामुळे जीर्ण झालेल्या पुलावर आणखी किती दिवस गाड्या चालविणार, असा सवाल केला जात आहे.

दक्षिण नागपूर व मध्य नागपूरला जाेडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. पुलाच्या निर्मितीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदाेलन करणारे माजी नगरसेवक तनवीर अहमद यांनी सांगितले की, १९८५ मध्ये अजनी पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर बांधकाम करणाऱ्या ब्रिटिश कंपनीने त्याची मुदत संपल्याचे व यानंतर आमची जबाबदारी राहणार नसल्याचे पत्र पाठविले हाेते. त्यावेळी रेल्वेच्या ब्रिज विभागाच्या पथकाने येथे येऊन पाहणी केली हाेती. या पथकाने आणखी २५ वर्षे पुलाला काही हाेणार नाही, असा दावा केला हाेता. २०१० मध्ये तिही मुदत संपलेली आहे. मात्र, पुलाच्या नव्याने निर्मितीसाठी काही करण्यात आले नाही. महापालिका, रेल्वे प्रशासन आणि रेल्वेमंत्र्यांनाही निवेदन सादर करण्यात आले; पण हालचाली झाल्या नसल्याचे अहमद यांनी सांगितले.

लाेखंडी गर्डरचा आधार 

१९६२-६३ च्या काळात चीन युद्धादरम्यान दारूगाेळा भरलेल्या वॅगनमध्ये पुलाखाली स्फाेट झाला हाेता. त्यावेळी पुलाला तडे गेले हाेते. त्यानंतर लाेखंडाच्या गर्डरच्या आधारे पुलाचे दाेन भाग जाेडण्यात आले.

फुटपाथ काेसळण्याचा धाेका 

पुलाच्या फुटपाथचा स्लॅब अनेक ठिकाणी जीर्ण झाला असून, त्याचे पत्रे खाली पडले आहेत. हे फुटपाथ काेसळण्याचा धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वेने बॅरिकेड लावून फुटपाथवरून रहदारी बंद केली आहे.

अनेक ठिकाणी तडे, वारंवार दुरुस्ती

पुलाच्या स्लॅबलाही अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे वारंवार डागडुजी करावी लागते. नुकतेच या पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनानुसार हा पूल १९२७ साली बांधला गेला हाेता. त्याच काळात रामझुल्याचेही बांधकाम झाले हाेते. मात्र, रामझुल्यावर एवढी वाहतूकही नाही आणि रेल्वेची अधिक रहदारीही नाही. अजनी पुलावरून प्रचंड वाहतुकीसह धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या कंपनाने तुटफूट हाेण्याचा धाेका आहे. असे असताना रामझुल्याचे नूतनीकरण झाले; पण अजनी पूल तसाच राहिला.

२०१३ मध्ये या पुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव मंजूर झाला हाेता व ३७२ काेटी रुपयांची तरतूदही करण्यात आली हाेती. मात्र, पुढे निवडणुकीनंतर पुलाचे काम पुन्हा थंडबस्त्यात गेले. यावेळी अजनी आयएमएस प्रकल्पांतर्गत नव्या पुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा