शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

कसे लागणार सुपरफास्ट निकाल ?

By admin | Updated: December 21, 2015 03:06 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे हिवाळी परीक्षांचे निकाल प्रचंड वेगात जाहीर होतील, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता.

नागपूर विद्यापीठ : केवळ १० परीक्षांचेच निकाल जाहीरयोगेश पांडे नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे हिवाळी परीक्षांचे निकाल प्रचंड वेगात जाहीर होतील, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र प्रशासनाच्या कल्पनेतील ही ‘बुलेट ट्रेन’ ढक्कलगाडीच निघाली आहे. डिसेंबर महिन्याचा चौथा आठवडा सुरू होऊनदेखील विद्यापीठाला केवळ दहाच परीक्षांचे निकाल लावण्यात यश आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील ८ परीक्षांमधील परीक्षार्थ्यांची एकूण संख्या केवळ २४ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशा स्थितीत विद्यापीठाचा दावा पूर्णत: ‘फेल’ झाला असल्याचेच दिसून आले आहे.नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सर्वात जास्त चिंता असते ती निकाल कधी लागतील याची. हिवाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्याला १९ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली. हिवाळी परीक्षांपासून विद्यापीठाने सर्व व्यावसायिक परीक्षांचे ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मूल्यांकनाचा वेग वाढेल व पहिल्या टप्प्याचे निकाल नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत जाहीर करण्यात येतील, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. परंतु आतापर्यंत मात्र केवळ १० परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले व परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी या दोघांशीही संपर्क होऊ शकला नाही. निकालांचा एकूण वेग पाहता हिवाळी परीक्षांचे सर्व निकाल लागण्यासाठी मार्च महिना उजाडणार की काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.८ परीक्षांतील विद्यार्थीसंख्या अवघी २४विद्यापीठाने आतापर्यंत जे १० निकाल लावले आहेत, त्यातील ८ परीक्षांतील विद्यार्थ्यांची संख्या अवघी २४ आहे. ४ परीक्षांमध्ये अवघा एक परीक्षार्थी आहे. ‘बीएफए’च्या प्रथम व अंतिम वर्षाचे निकालदेखील जाहीर झाले आहेत. यातील अर्ध्याहून अधिक निकाल ‘विथहेल्ड’मध्ये ठेवण्यात आले आहेत.४५ दिवस उलटले, आता काय ?निकाल लावण्यासाठी दिवसांचे बंधन नाही, असे प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना अनेकदा सांगण्यात येते. परंतु महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ७२ मधील तरतुदीनुसार परीक्षेच्या अखेरच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत आणि कोणत्याही परिस्थिती उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर व्हायला हवा, असे राज्य शासनाकडून विधिमंडळात मागील आठवड्यातच स्पष्ट करण्यात आले होते. अनेक परीक्षा संपून आता ४५ दिवस उलटून गेले आहे. त्यामुळे आता विद्यापीठाचे यावर काय पाऊल राहणार हादेखील कळीचा प्रश्न आहे.