शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कसे लागणार सुपरफास्ट निकाल ?

By admin | Updated: December 21, 2015 03:06 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे हिवाळी परीक्षांचे निकाल प्रचंड वेगात जाहीर होतील, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता.

नागपूर विद्यापीठ : केवळ १० परीक्षांचेच निकाल जाहीरयोगेश पांडे नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे हिवाळी परीक्षांचे निकाल प्रचंड वेगात जाहीर होतील, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र प्रशासनाच्या कल्पनेतील ही ‘बुलेट ट्रेन’ ढक्कलगाडीच निघाली आहे. डिसेंबर महिन्याचा चौथा आठवडा सुरू होऊनदेखील विद्यापीठाला केवळ दहाच परीक्षांचे निकाल लावण्यात यश आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील ८ परीक्षांमधील परीक्षार्थ्यांची एकूण संख्या केवळ २४ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशा स्थितीत विद्यापीठाचा दावा पूर्णत: ‘फेल’ झाला असल्याचेच दिसून आले आहे.नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सर्वात जास्त चिंता असते ती निकाल कधी लागतील याची. हिवाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्याला १९ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली. हिवाळी परीक्षांपासून विद्यापीठाने सर्व व्यावसायिक परीक्षांचे ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मूल्यांकनाचा वेग वाढेल व पहिल्या टप्प्याचे निकाल नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत जाहीर करण्यात येतील, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. परंतु आतापर्यंत मात्र केवळ १० परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले व परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी या दोघांशीही संपर्क होऊ शकला नाही. निकालांचा एकूण वेग पाहता हिवाळी परीक्षांचे सर्व निकाल लागण्यासाठी मार्च महिना उजाडणार की काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.८ परीक्षांतील विद्यार्थीसंख्या अवघी २४विद्यापीठाने आतापर्यंत जे १० निकाल लावले आहेत, त्यातील ८ परीक्षांतील विद्यार्थ्यांची संख्या अवघी २४ आहे. ४ परीक्षांमध्ये अवघा एक परीक्षार्थी आहे. ‘बीएफए’च्या प्रथम व अंतिम वर्षाचे निकालदेखील जाहीर झाले आहेत. यातील अर्ध्याहून अधिक निकाल ‘विथहेल्ड’मध्ये ठेवण्यात आले आहेत.४५ दिवस उलटले, आता काय ?निकाल लावण्यासाठी दिवसांचे बंधन नाही, असे प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना अनेकदा सांगण्यात येते. परंतु महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ७२ मधील तरतुदीनुसार परीक्षेच्या अखेरच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत आणि कोणत्याही परिस्थिती उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर व्हायला हवा, असे राज्य शासनाकडून विधिमंडळात मागील आठवड्यातच स्पष्ट करण्यात आले होते. अनेक परीक्षा संपून आता ४५ दिवस उलटून गेले आहे. त्यामुळे आता विद्यापीठाचे यावर काय पाऊल राहणार हादेखील कळीचा प्रश्न आहे.