शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

तर कसे मिळेल सुरक्षा कवच ?

By admin | Updated: March 1, 2016 02:38 IST

उपराजधानीचा होत असलेला विकास विचारात घेता, शहरात मोठी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तिचा सामना करण्यासाठी ...

आपत्ती निवारण योजना : अग्निशमन विभागापुढे आव्हान: यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा अभावनागपूर : उपराजधानीचा होत असलेला विकास विचारात घेता, शहरात मोठी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तिचा सामना करण्यासाठी महापालिकेने शहरासाठी आपत्ती निवारण योजना तयार के ली आहे. परंतु अग्निशमन विभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे आपत्ती निवारण योजना राबविण्याचे आव्हान या विभागापुढे उभे ठाकले आहे. या योजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात सुधारणा करून त्याची अंमलबजावणी के ली जाणार आहे. यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेत प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. आपत्ती निवारण यंत्रणा सक्षम करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील.१९६५ च्या लोकसंख्येच्या आधारावर शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची पद निर्माण करण्यात आली होती. त्यानुसार पाच केंद्रे व १९३ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली होती. गेल्या चार दशकात शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. दोन लाख लोकसंख्येमागे एक अग्निशमन केंद्र असायला हवे, त्यानुसार शहरात १५ केंद्रांची व ८२२ कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु आजही ५ केंद्रांना मंजुरी असून ३ मंजुरीविना सुरू आहेत. विभागात २६५ कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून १४६ पदे रिक्त आहेत. आजच्या लोकसंख्येचा विचार करता ८२२ कर्मचाऱ्यांची विभागाला गरज आहे म्हणजेच विभागात ५५७ कर्मचारी कमी आहेत.२४ मीटरहून अधिक उंचीवरील इमारतीतील आग आटोक्यात आणणारी अत्याधुनिक यंत्रणा विभागाकडे नाही. टर्न टेबल लॅन्डर (टीटीएल)खरेदीचा प्रस्ताव मार्गी लागण्याची शक्यता आहे. परंतु यातूनही समस्या सुटणार नाही. हायड्रोलिकसारख्या यंत्रसामग्रीचे आयुष्य संपल्याने विभागाला अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)