शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

श्रीसूर्या खटला कुठपर्यंत पोहचला ? हायकोर्टाची  विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 21:48 IST

Sreesurya caseएमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित असलेल्या श्रीसूर्या समूह गुंतवणूकदार फसवणूक खटल्याची सद्यस्थिती काय आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला केली व यावर दोन आठवड्यात माहिती सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देसरकारला माहिती मागितली

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित असलेल्या श्रीसूर्या समूह गुंतवणूकदार फसवणूक खटल्याची सद्यस्थिती काय आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला केली व यावर दोन आठवड्यात माहिती सादर करण्याचा आदेश दिला.

याप्रकरणात श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी व त्याची पत्नी पल्लवी जोशी यांच्यासह एकूण २४ आरोपींचा समावेश आहे. समीर जोशीने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर मंगळवारी न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर सरकारला हा आदेश देण्यात आला. समीर जोशीला १५ ऑक्टोबर २०१३ रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून तो कारागृहात आहे. १४ सप्टेंबर २०१३ रोजी सोमलवाडा येथील अमित मोरे यांनी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात जोशी व इतर आरोपींविरुद्ध पहिली तक्रार नोंदवली होती. त्यानंतर विविध पोलीस ठाण्यांत एफआयआर दाखल झाले. आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास केला. सत्र न्यायालयाने आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ३४, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनामधील) हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम (एमपीआयडी)मधील कलम ३ व भारतीय रिझर्व्ह बँक कायद्यातील कलम ५८-बी (४ए) व ५ (ए) अंतर्गत दोषारोप निश्चित केले आहेत.

पाच हजारावर गुंतवणूकदारांना लुबाडले

मास्टरमाईन्ड समीर जोशीने विविध आकर्षक योजनांच्या माध्यमातून पाच हजारावर गुंतवणूकदारांना २०० कोटींवर रुपयांनी लुबाडले. तो गुंतवणूकदारांना वार्षिक २५ ते ४० टक्के व्याजाचे आमिष दाखवित होता. भोळ्याभाबड्या गुंतवणूकदारांना या मायाजाळात फसविण्यासाठी त्याने अनेक शहरांत एजन्ट नियुक्त केले होते. काही काळानंतर जोशीने दिलेल्या आश्वासनानुसार गुंतवणुकदारांना परतावा व ठेवी मिळणे बंद झाल्यामुळे या मायाजाळाचा पर्दाफाश झाला. गुंतवणूकदार भानावर आले व त्यांनी ठेवी वाचविण्यासाठी धावाधाव केली. त्यातून जोशी अ‍ॅण्ड कंपनीवर कारवाई सुरू झाली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयInvestmentगुंतवणूकfraudधोकेबाजी