शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

तासाभरात लागला एलएलबीचा निकाल

By admin | Updated: July 26, 2014 02:54 IST

महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ७२ अनुसार ४५ दिवसांत

हायकोर्टात विद्यापीठाची ग्वाही : विद्यार्थ्यांना दिलासानागपूर : महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ७२ अनुसार ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे आवश्यक असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एलएलबी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सेमिस्टरचा निकाल ८२ दिवस लोटूनही लावला नव्हता. विद्यार्थ्यांनी हायकोर्टात धाव घेतल्यामुळे विद्यापीठाने शुक्रवारी निकाल जाहीर करण्याची ग्वाही दिली. यानंतर तासाभरात निकालही जाहीर करण्यात आला. तासाभरात निकाल जाहीर करणे शक्य असताना विद्यार्थ्यांना वारंवार वेठीस का धरल्या जाते असा प्रश्न याप्रकरणामुळे उपस्थित झाला आहे.तीन वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सेमिस्टरची परीक्षा गेल्या ३ मे रोजी संपली. यानंतर नियमानुसार १७ जूनपर्यंत निकाल घोषित होणे अपेक्षित होते. परंतु, विद्यापीठाची आज सायंकाळपर्यंत निकाल घोषित करण्याची काहीच तयारी नव्हती. संबंधित याचिका सुनावणीसाठी आल्यानंतर विद्यापीठाने आज, सायंकाळी ५ वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्याचे वक्तव्य केले. त्यानुसार निकालही जाहीर करण्यात आला. नॅशनल लॉ स्कूलतर्फे एलएलएम अभ्यासक्रमाकरिता राष्ट्रीयस्तरावर प्रवेश परीक्षा घेण्यात येते. याशिवाय बार कौन्सिल आॅफ इंडियाने वकिली व्यवसाय सुरू करण्यापूर्वी एआयबीई (आॅल इंडिया बार एक्झॅम) पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. ही परीक्षा ९ सप्टेंबर रोजी होणार असून प्रवेश नोंदणीची अखेरची तारीख २७ जुलै होती. विद्यापीठाने पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या दहाव्या सेमिस्टरचा निकाल जाहीर केला, पण तीन वर्षीय अभ्यासक्रमाच्या सहाव्या सेमिस्टरचा निकाल रखडला होता. परिणामी विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांना बसण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यामुळे विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून सहाव्या सेमिस्टरचा निकाल लवकर जाहीर करण्याची व एआयबीई पात्रता परीक्षा प्रवेश नोंदणीची अखरेची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष याचिका सुनावणीसाठी आल्यानंतर सायंकाळी ५ वाजतापर्यंत निकाल जाहीर करण्याचे वक्तव्य विद्यापीठातर्फे करण्यात आले. तसेच, बार कौन्सिलतर्फे अ‍ॅड. कैलाश नरवाडे यांनी एआयबीई पात्रता परीक्षेच्या प्रवेश नोंदणीची अखेरची तारीख १३ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली. दोन्ही विनंत्या पूर्ण झाल्यामुळे न्यायालयाने याचिका निकाली काढली.