शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

वसतिगृह झाले कोविड सेंटर, विद्यार्थी गेले भाड्याच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:07 IST

नागपूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी असलेली शासकीय वसतिगृहे एक वर्षापासून जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनाने कोविड ...

नागपूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी असलेली शासकीय वसतिगृहे एक वर्षापासून जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनाने कोविड केअर सेंटरसाठी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात भाड्याचे घर घेऊन राहत आहे. वसतिगृहात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा समावेश असून राहणे, खाणे, शिक्षणाचा खर्च झेपत नसल्याने समाजकल्याण विभागाच्या स्वाधार योजनेचा त्यांना लाभ द्यावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.

दहावीनंतर पुढील शिक्षण जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जर शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तर अशा विद्यार्थ्यांना शासनामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधार योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेंतर्गत वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य खर्च भागविण्यासाठी अनुदान दिले जाते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने समाजकल्याण विभागाचे वसतिगृह ताब्यात घेऊन कोविड केअर सेंटर सुरू केले. वसतिगृह बंद झाली तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरूच आहेत. विशेषत: विज्ञान शाखेचे विद्यार्थी, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, तांत्रिक शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल, प्रोजेक्टसाठी महाविद्यालयात, लॅबोरेटरी व ग्रंथालयात जावे लागते. वसतिगृह बंद असल्याने हे विद्यार्थी शहरात भाड्याने खोली घेऊन राहतात. खासगी मेसमध्ये त्यांना जेवणाची व्यवस्था करावी लागते. यात विद्यार्थ्यांचा मोठा आर्थिक खर्च होतो. तसेच विद्यार्थ्यांना शासनातर्फे दिला जाणारा निर्वाह भत्ता, स्टेशनरी खर्च, प्रोजेक्ट खर्च अद्यापही दिलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी आर्थिक अडचणीत आहेत.

वसतिगृहातील जे विद्यार्थी शहरात भाड्याने राहत आहेत, त्यांच्या भोजनाचा खर्च, शैक्षणिक साहित्य, प्रोजेक्ट खर्च, आदी पालकांना परवडणारा नाही. वसतिगृहच बंद असल्याने या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे.

आशिष फुलझेले, सदस्य, मानव अधिकार संरक्षण मंच

- ‘स्वाधार’चे हप्ते थकीत

सन २०१९-२० मध्ये स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यात १३०० विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या विद्यार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम डिसेंबर २०२० ला देण्यात आली. त्यानंतर दुसरा हप्ता अजूनही विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. विशेष म्हणजे ‘स्वाधार’चा दुसरा हप्ता देण्याचे आदेश झालेले आहे. तरीसुद्धा विद्यार्थ्यांना प्रशासन त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप मानव अधिकार संरक्षण मंचतर्फे करण्यात आला.