शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जातीच्या प्रत्येक कुटुंबाला घर

By admin | Updated: February 7, 2016 03:03 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्य सरकारतर्फे साजरे केले जात आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या अडीच लाख कुटुंबांकडे स्वत:चे घर नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : जि.प. मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरणनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्य सरकारतर्फे साजरे केले जात आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या अडीच लाख कुटुंबांकडे स्वत:चे घर नाही. २०१९ पर्यंत या प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर दिले जाईल. त्यासाठी राज्य सरकारने निधीचे नियोजन केले आहे. घर निर्मितीसाठी विशेष सेल तयार करण्यात आला आहे. यासोबतच ग्राम विकास खात्यांतर्गत यंत्रणा उभी केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.नागपूर जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी अनावरण करण्यात आले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. जोगेंद्र कवाडे, महापौर प्रवीण दटके, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, आ. प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने दीक्षाभूमीच्या विकासासाठी १२ कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी ९ कोटी रुपये दिले आहेत. मात्र, एवढ्याने होणार नाही. आपण नुकतेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांसी चर्चा केली असून दीक्षाभूमीच्या विकासाचा १५० कोटी रुपयांचा आराखडा केंद्र सरकारला पाठविण्यात येईल. या आराखड्याला मंजुरी देण्याचे आश्वासनही केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे देश विकासाच्या दिशेने जात आहे. जगाताली सर्व संविधानात भारतीय संविधानाचा पहिला क्रमांक लागतो. शेवटच्या माणसाला न्याय देण्याची ताकद संविधानात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.मध्यप्रदेशने कृषी क्षेत्रात क्रांती केली आहे. मध्यप्रदेशचा पॅटर्न पाहिला असता त्यांनी मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची निर्मिती केल्याचे दिसून आले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ५ लाख शेततळे देण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच ठिंबक सिंचनाचा बृहत् आराखडा तयार केला जात आहे. ठिंबक सिंचनासाठी लागणारे कृषी साहित्य महागात पडते. त्यामुळे येत्या काळात या साहित्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून किंमती ५० टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी आ. सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, आशीष देशमुख, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, मल्लिकार्जून रेड्डी, नागो गाणार, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मिहानचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, संध्या गोतमारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा साकारणारे मूर्तीकार शंतनु इंगळे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर यांच्या कार्यकाळात पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असा आवर्जून उल्लेख पालकमंत्री बावनकुळे व जि.प. अध्यक्ष सावरकर यांनी केला. या सोहळ्यात हार तुऱ्याचा खर्च न केल्यामुळे वाचलेल्या २५ हजार रुपयांचा धनादेश जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.(प्रतिनिधी)नागपूर जिल्हा हागणदारीमुक्त करूराज्यातील पाच हजार गावे हागणदारी मुक्त करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. येत्या काळात नागपूर जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे ध्येय असून त्यासाठी शासकीय यंत्रणेने कामाला लागण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.महिला बचत गटांसाठी मॉलमहिला बचत गटांचे मॉल उभारण्याची योजना सरकारने आखली आहे. यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेने सर्वात पहिला प्रस्ताव पंडित बच्छराज व्यास चौकात असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेचा दिला आहे. त्याला मंजुरी देण्यात आली असून आणखी एक प्रस्ताव जिल्हा परिषदेने सादर करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. मिहानमध्ये लॉजिस्टीक पार्कला मंजुरी देण्यात आली असून १५०० कोटींची गुंतवणूक होत आहे. यातून युवकांना रोजगार मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.