शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

हॉलक्रोच्या ‘शॉर्टकट’मुळे मेट्रो रिजन प्लॅनचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: December 15, 2015 04:46 IST

हॉलक्रो कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या नेतृत्वातील सल्लागार कंपन्यांच्या चमूने ‘शॉर्टकट’ घेतल्याने नागपूर मेट्रो रिजन

नासुप्र या घोटाळ्याची चौकशी करणार : वेळ पडली तर आराखडा रद्द करून नव्याने बनवू - वर्धनेसोपान पांढरीपांडे ल्ल नागपूरहॉलक्रो कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या नेतृत्वातील सल्लागार कंपन्यांच्या चमूने ‘शॉर्टकट’ घेतल्याने नागपूर मेट्रो रिजन आराखड्याचा बट्ट्याबोळ झाला आहे.मेट्रो रिजन प्लॅनचा करारलोकमतने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्राप्त केलेल्या कागदपत्रांवरून ही बाब उघड झाली आहे. मेट्रो रिजनचा आराखडा तयार करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने हॉलक्रोच्या नेतृत्वातील तीन सल्लागार कंपन्यांच्या चमूशी हा करार दि. ११ मे २०११ रोजी केला होता. या ३३ पानी करारावर नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार व हॉलक्रोच्या वतीने राजीव विजय यांच्या सह्या आहेत. चमूतील इतर तीन कंपन्या एचसीपी डिझाईन अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट अहमदाबाद (नगर रचना), क्रिसील रिस्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्स (जोखीम अंकेक्षण व योजना) व नाईट फ्रँक इंडिया प्रा. लि. या आहेत.करारातील अटीहॉलक्रोच्या नेतृत्वातील या चमूला, रहिवाशी वस्त्या, लोकसंख्या, आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, पर्यावरण, हवामान, प्रदूषण इत्यादी १९ निकषांचा अभ्यास करून तीन आराखडे सादर करायचे होते. २०१२ ते २०६० असा कालखंड निश्चित केला होता. नागपूर मेट्रो रिजनच्या ७२१ गावांसाठी कन्सेप्ट प्लॅन, जमीन उपयोगासाठी आराखडा आणि नगर रचना योजना सादर करायचे होते. या करारापोटी हॉलक्रोला एकूण ११ कोटी ९५ लाख रुपयांचे मानधन मिळणार होते. त्यानुसार हॉलक्रोने जानेवारी २०१५ मध्ये मेट्रो रिजनचे आराखडे नासुप्रला सादर केले. त्यावर नंतर जनसुनावणी झाली.मेट्रो रिजन आराखड्यावर ६७०० आक्षेपजनसुनावणी दरम्यान ७२१ गावांमधील ६७०० नागरिकांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. सर्वात महत्त्वाचा आक्षेप म्हणजे बहुतक सर्व गावांमधील कृषी व गावठाणाच्या जमिनीवर तसेच राहत्या घरांवर पोस्ट आॅफिस, शाळा/ कॉलेज, क्रीडांगण, पोलीस स्टेशनचे आरक्षण दाखवण्यात आले आहे. यामुळे या गावांमधील १० लाख नागरिकांपुढे संकट उभे झाले आहे. कारण आरक्षण असल्यामुळे आता हे नागरिक आपले घर, शेती २०३२ पर्यंत विकू शकणार नाहीत व त्यांना फक्त शेतीच करता येईल.हॉलक्रो चमूने फक्त डेटा दिलामेट्रो रिजन आराखड्याचा अभ्यास केला असता हॉलक्रोच्या चमूने केवळ वेगवेगळ्या विभागांमधून प्राप्त झालेली माहिती (डेटा) सादर केल्याचे दिसले. कराराप्रमाणे ७२१ गावांमधील रस्त्यांचे जाळे व नगर रचनेचा आराखडा या चमूला सादर करायचा होता. पण असा कुठलाही अभ्यास न करता हॉलक्रो चमूने आराखडे सादर केले आहेत. त्यामुळे गावातील प्रत्यक्ष परिस्थिती व आराखड्यात वेगळीच माहिती / आरक्षण आराखड्यात दिसते आहे. अनेक गावात कृषी व गावठाणांची जमीन उपलब्ध नसतानाही आरक्षण दाखवले आहे. अतिशय गंभीर बाब म्हणजे करारानुसार हॉलक्रो चमूला २०१२ ते २०६० असा ४८ वर्षांचा आरखडा द्यायचा होता. पण अतिशय आश्चर्यकारकरीत्या चमूने २०१२ ते २०३२ असा २० वर्षांचाच आराखडा दिला आहे. हॉलक्रो चमूच्या या शॉर्टकटमुळे मेट्रो रिजन आराखड्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. मेट्रो रिजनमधील ७२१ गावांपैकी जवळपास प्रत्येक गावात अशाच प्रकारे विसंगतीपूर्ण आराखडा सादर झाला आहे. त्यामुळे मेट्रो रिजनचा संपूर्ण आराखडा रद्द करून नवा आराखडा तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.