शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

नागपूर करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २८ सप्टेंबर १९५३ रोजी विदर्भ प्रांत महाराष्ट्रात सामील करण्यात आला. त्याला नागपूर करार असे नाव देण्यात आले. तेव्हापासून विदर्भाला सावत्र वागणूक मिळत आहे. त्या करारातील एकाही कलमाची महाराष्ट्र सरकारने पूर्तता केली नाही. विदर्भाच्या जनतेशी करार करून त्यांच्याशी बेईमानी केली, असे स्पष्ट करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ...

ठळक मुद्दे विदर्भ राज्य आंदोलन समिती : विदर्भात ५० ठिकाणी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २८ सप्टेंबर १९५३ रोजी विदर्भ प्रांत महाराष्ट्रात सामील करण्यात आला. त्याला नागपूर करार असे नाव देण्यात आले. तेव्हापासून विदर्भाला सावत्र वागणूक मिळत आहे. त्या करारातील एकाही कलमाची महाराष्ट्र सरकारने पूर्तता केली नाही. विदर्भाच्या जनतेशी करार करून त्यांच्याशी बेईमानी केली, असे स्पष्ट करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भात ५० ठिकाणी या नागपूर कराराची होळी करून या दिवसाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केळकर समितीच्या अहवालाची होळी करून त्यांचाही निषेध करण्यात आला.नागपूर करारानुसार २३ टक्के विदर्भातील तरुणांना रोजगार देण्याचे मान्य केल्यावरही फक्त ८ टक्केच नोकºया दिल्या म्हणून विदर्भातील ४ लाख तरुणांचा रोजगार हिरावून येथील बेरोजगारांवर अन्याय केला. सिंचन व रस्त्यांचे एकूण १.५० लाख कोटी रुपये विदर्भाच्या हक्काचे पळविले म्हणून विदर्भात धरणे रखडली. गावागावातील व शेतकºयांच्या शेतापर्यंतचे रस्ते थांबले. या सर्व प्रकारामुळे विदर्भ पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत ५० वर्षे विकासामध्ये मागे पडला, असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या शहर समितीतर्फे दुपारी संविधान चौकात नागपूर करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी केली. यावेळी विदर्र्भाच्या घोषणाही देण्यात आल्या तसेच भाजपा सरकार विरुद्धही घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मुख्य निमंत्रक राम नेवले, शहर अध्यक्ष राजकुमार नागुलवार, अरुण केदार, विजया धोटे, मुकेश मासूरकर, विष्णू आष्टीकर, धनंजय धार्मिक, महेंद्र भांगे, रवी घाडगे पाटील, नरेंद्र दौडकर, नीरज खांदेवाले, डॉ. पुरुषोत्तम भोंडे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.मिशन विदर्भतर्फेसुद्धा संविधान चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आलीज्येष्ठ विदर्भवादी उमेश चौबे यांच्या अध्यक्षतेखाली माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, नितीन रोंघे, अनिल तिडके, विष्णू आष्टीकर, रवी गाडगे पाटील, तन्हा नागपुरी, अ‍ॅड. अविनाश काळे, दिलीप नरवडिया, सुनील खंडेलवाल, महेश मामीडवार, रामचंद्र देशमुख, नरेश निमजे, निखील भुते, अश्वजित पाटील, हिरासिंग ठाकूर, डॉ. शालिगाम चरडे, चंदू मोखारे, मनोज मालवी, अलीम खान, प्रभाकर बोरकर, सर्जेराव बाजीराव गलपट आदी प्रामुख्याने उपस्थित होते.येथेही झाले आंदोलननागपूरसह चंद्रपूर, राजुरा, गडचांदूर, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, कोरपना, सावली, नागभीड, वरोरा, भद्रावती, चिमूर, यवतमाळमध्ये यवतमाळ, वणी, उमरखेड, पुसद, वर्धा-समुद्रपूर, हिंगणघाट, सिंदी रेल्वे, पुलगाव, अमरवाती-परतवाडा, धारणी, चिखलदरा, दर्यापूर, वरुड, अंजनगाव, बुलडाणा-चिखली, मेहकर, मलकापूर, खामगाव, नागपूर- काटोल, नरखेड, उमरेड, भिवापूर, गडचिरोली-गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, वडसा, सिरोंचा, अहेरी, भंडारा-गोंदिया, अकोला, वाशिम आदींसह ५० ठिकाणी नागपूर कराराची होळी करण्यात आली.