शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नागपूर करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २८ सप्टेंबर १९५३ रोजी विदर्भ प्रांत महाराष्ट्रात सामील करण्यात आला. त्याला नागपूर करार असे नाव देण्यात आले. तेव्हापासून विदर्भाला सावत्र वागणूक मिळत आहे. त्या करारातील एकाही कलमाची महाराष्ट्र सरकारने पूर्तता केली नाही. विदर्भाच्या जनतेशी करार करून त्यांच्याशी बेईमानी केली, असे स्पष्ट करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ...

ठळक मुद्दे विदर्भ राज्य आंदोलन समिती : विदर्भात ५० ठिकाणी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २८ सप्टेंबर १९५३ रोजी विदर्भ प्रांत महाराष्ट्रात सामील करण्यात आला. त्याला नागपूर करार असे नाव देण्यात आले. तेव्हापासून विदर्भाला सावत्र वागणूक मिळत आहे. त्या करारातील एकाही कलमाची महाराष्ट्र सरकारने पूर्तता केली नाही. विदर्भाच्या जनतेशी करार करून त्यांच्याशी बेईमानी केली, असे स्पष्ट करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भात ५० ठिकाणी या नागपूर कराराची होळी करून या दिवसाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केळकर समितीच्या अहवालाची होळी करून त्यांचाही निषेध करण्यात आला.नागपूर करारानुसार २३ टक्के विदर्भातील तरुणांना रोजगार देण्याचे मान्य केल्यावरही फक्त ८ टक्केच नोकºया दिल्या म्हणून विदर्भातील ४ लाख तरुणांचा रोजगार हिरावून येथील बेरोजगारांवर अन्याय केला. सिंचन व रस्त्यांचे एकूण १.५० लाख कोटी रुपये विदर्भाच्या हक्काचे पळविले म्हणून विदर्भात धरणे रखडली. गावागावातील व शेतकºयांच्या शेतापर्यंतचे रस्ते थांबले. या सर्व प्रकारामुळे विदर्भ पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत ५० वर्षे विकासामध्ये मागे पडला, असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या शहर समितीतर्फे दुपारी संविधान चौकात नागपूर करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी केली. यावेळी विदर्र्भाच्या घोषणाही देण्यात आल्या तसेच भाजपा सरकार विरुद्धही घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मुख्य निमंत्रक राम नेवले, शहर अध्यक्ष राजकुमार नागुलवार, अरुण केदार, विजया धोटे, मुकेश मासूरकर, विष्णू आष्टीकर, धनंजय धार्मिक, महेंद्र भांगे, रवी घाडगे पाटील, नरेंद्र दौडकर, नीरज खांदेवाले, डॉ. पुरुषोत्तम भोंडे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.मिशन विदर्भतर्फेसुद्धा संविधान चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आलीज्येष्ठ विदर्भवादी उमेश चौबे यांच्या अध्यक्षतेखाली माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, नितीन रोंघे, अनिल तिडके, विष्णू आष्टीकर, रवी गाडगे पाटील, तन्हा नागपुरी, अ‍ॅड. अविनाश काळे, दिलीप नरवडिया, सुनील खंडेलवाल, महेश मामीडवार, रामचंद्र देशमुख, नरेश निमजे, निखील भुते, अश्वजित पाटील, हिरासिंग ठाकूर, डॉ. शालिगाम चरडे, चंदू मोखारे, मनोज मालवी, अलीम खान, प्रभाकर बोरकर, सर्जेराव बाजीराव गलपट आदी प्रामुख्याने उपस्थित होते.येथेही झाले आंदोलननागपूरसह चंद्रपूर, राजुरा, गडचांदूर, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, कोरपना, सावली, नागभीड, वरोरा, भद्रावती, चिमूर, यवतमाळमध्ये यवतमाळ, वणी, उमरखेड, पुसद, वर्धा-समुद्रपूर, हिंगणघाट, सिंदी रेल्वे, पुलगाव, अमरवाती-परतवाडा, धारणी, चिखलदरा, दर्यापूर, वरुड, अंजनगाव, बुलडाणा-चिखली, मेहकर, मलकापूर, खामगाव, नागपूर- काटोल, नरखेड, उमरेड, भिवापूर, गडचिरोली-गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, वडसा, सिरोंचा, अहेरी, भंडारा-गोंदिया, अकोला, वाशिम आदींसह ५० ठिकाणी नागपूर कराराची होळी करण्यात आली.