शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २८ सप्टेंबर १९५३ रोजी विदर्भ प्रांत महाराष्ट्रात सामील करण्यात आला. त्याला नागपूर करार असे नाव देण्यात आले. तेव्हापासून विदर्भाला सावत्र वागणूक मिळत आहे. त्या करारातील एकाही कलमाची महाराष्ट्र सरकारने पूर्तता केली नाही. विदर्भाच्या जनतेशी करार करून त्यांच्याशी बेईमानी केली, असे स्पष्ट करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ...

ठळक मुद्दे विदर्भ राज्य आंदोलन समिती : विदर्भात ५० ठिकाणी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २८ सप्टेंबर १९५३ रोजी विदर्भ प्रांत महाराष्ट्रात सामील करण्यात आला. त्याला नागपूर करार असे नाव देण्यात आले. तेव्हापासून विदर्भाला सावत्र वागणूक मिळत आहे. त्या करारातील एकाही कलमाची महाराष्ट्र सरकारने पूर्तता केली नाही. विदर्भाच्या जनतेशी करार करून त्यांच्याशी बेईमानी केली, असे स्पष्ट करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भात ५० ठिकाणी या नागपूर कराराची होळी करून या दिवसाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केळकर समितीच्या अहवालाची होळी करून त्यांचाही निषेध करण्यात आला.नागपूर करारानुसार २३ टक्के विदर्भातील तरुणांना रोजगार देण्याचे मान्य केल्यावरही फक्त ८ टक्केच नोकºया दिल्या म्हणून विदर्भातील ४ लाख तरुणांचा रोजगार हिरावून येथील बेरोजगारांवर अन्याय केला. सिंचन व रस्त्यांचे एकूण १.५० लाख कोटी रुपये विदर्भाच्या हक्काचे पळविले म्हणून विदर्भात धरणे रखडली. गावागावातील व शेतकºयांच्या शेतापर्यंतचे रस्ते थांबले. या सर्व प्रकारामुळे विदर्भ पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत ५० वर्षे विकासामध्ये मागे पडला, असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या शहर समितीतर्फे दुपारी संविधान चौकात नागपूर करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी केली. यावेळी विदर्र्भाच्या घोषणाही देण्यात आल्या तसेच भाजपा सरकार विरुद्धही घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मुख्य निमंत्रक राम नेवले, शहर अध्यक्ष राजकुमार नागुलवार, अरुण केदार, विजया धोटे, मुकेश मासूरकर, विष्णू आष्टीकर, धनंजय धार्मिक, महेंद्र भांगे, रवी घाडगे पाटील, नरेंद्र दौडकर, नीरज खांदेवाले, डॉ. पुरुषोत्तम भोंडे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.मिशन विदर्भतर्फेसुद्धा संविधान चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आलीज्येष्ठ विदर्भवादी उमेश चौबे यांच्या अध्यक्षतेखाली माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, नितीन रोंघे, अनिल तिडके, विष्णू आष्टीकर, रवी गाडगे पाटील, तन्हा नागपुरी, अ‍ॅड. अविनाश काळे, दिलीप नरवडिया, सुनील खंडेलवाल, महेश मामीडवार, रामचंद्र देशमुख, नरेश निमजे, निखील भुते, अश्वजित पाटील, हिरासिंग ठाकूर, डॉ. शालिगाम चरडे, चंदू मोखारे, मनोज मालवी, अलीम खान, प्रभाकर बोरकर, सर्जेराव बाजीराव गलपट आदी प्रामुख्याने उपस्थित होते.येथेही झाले आंदोलननागपूरसह चंद्रपूर, राजुरा, गडचांदूर, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, कोरपना, सावली, नागभीड, वरोरा, भद्रावती, चिमूर, यवतमाळमध्ये यवतमाळ, वणी, उमरखेड, पुसद, वर्धा-समुद्रपूर, हिंगणघाट, सिंदी रेल्वे, पुलगाव, अमरवाती-परतवाडा, धारणी, चिखलदरा, दर्यापूर, वरुड, अंजनगाव, बुलडाणा-चिखली, मेहकर, मलकापूर, खामगाव, नागपूर- काटोल, नरखेड, उमरेड, भिवापूर, गडचिरोली-गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, वडसा, सिरोंचा, अहेरी, भंडारा-गोंदिया, अकोला, वाशिम आदींसह ५० ठिकाणी नागपूर कराराची होळी करण्यात आली.