शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

मतदारांना गृहीत धरणे भोवले

By admin | Updated: May 18, 2014 01:05 IST

परंपरागत मतदारांना गृहीत धरून काँग्रेसने शेवटपर्यंत विजयाचे गणित मांडले. मतमोजणीच्या दिवसापर्यंतचा अतिआत्मविश्वास नडला आणि काँग्रेसचा येथेच घात झाला.

ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ

परंपरागत मतदारांना गृहीत धरून काँग्रेसने शेवटपर्यंत विजयाचे गणित मांडले. मतमोजणीच्या दिवसापर्यंतचा अतिआत्मविश्वास नडला आणि काँग्रेसचा येथेच घात झाला. आदिवासीबहुल मतदारसंघातही शिवसेनेने प्रचंड आघाडी घेतली. शिवसेनेची ही आघाडी काँग्रेससह सर्वांनाच आत्मचिंतन करायला लावणारी आहे. काँग्रेसने सुरुवातीपासूनच या निवडणुकीत आदिवासी मतदारांवर लक्ष केंद्रित केले होते. काँग्रेसचा हा परंपरागत मतदार उमेदवारही त्याच समाजाचा असल्याने काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील, असा दावा होता. या सोबतच भाजपविरोधी मतदारही काँग्रेसलाच मदत करतील, अशी अपेक्षा होती. या गणिताच्या आखाड्यातून काँग्रेस यवतमाळ-वाशिममध्ये निश्चितच विजयी होईल, असे शेवटपर्यंत सांगितले जात होते. मात्र मतमोजणीनंतर सर्वांचा फुगा फुटला. पुसद वगळता आदिवासीबहुल मतदारसंघातही काँग्रेसला आघाडी घेता आली नाही. राळेगाव हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आदिवासी समाजाची निर्णायक मते आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार वसंतराव पुरके या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मोघेसाहेबांसाठी त्यांनी जीवाचे रान केले. मात्र शिवसेनेने याच मतदारसंघात २७ हजार ५५ मतांची आघाडी घेतली. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला २८ हजार ३८८ मतांची आघाडी मिळाली. ही आघाडीही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह सारे दिग्गज यवतमाळ शहरात असतात. मात्र त्यांनाही आपला प्रभाव मतदारांवर टाकता आला नाही. दारव्हा या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गृह मतदारसंघातही शिवसेनेने आघाडी घेतली. शिवसेनेचे आमदार संजय राठोड प्रतिनिधित्व करीत असलेल्या या मतदारसंघानेही शिवसेनेलाच जवळ केले. वाशिम या भावना गवळींच्या गृह मतदारसंघात चांगलीच आघाडी घेतली. मात्र कारंजा विधानसभेत मोठ्या आघाडीची अपेक्षा असताना सेनेला तीन हजार ९६२ मतांचीच आघाडी मिळाली. पुसद या एकमेव मतदारसंघात काँग्रेसला २१ हजार २४१ मतांची आघाडी मिळाली. काँग्रेसचे सुरुवातीपासून पुसद आणि राळेगाव या दोन मतदारसंघातील आघाडीवरच विजयाचे गणित होते. पुसदनेही अपेक्षित आघाडी दिली नाही आणि राळेगाव तर आघाडीत सपसेल नापास झाला. भावना गवळींनी ९३ हजार ८१६ मताधिक्य घेतले. २००९ च्या निवडणुकीपेक्षाही त्यांच्या मताधिक्यात यावेळी वाढ झाली आहे. एवढ्या मोठ्या मताधिक्याची शिवसेनेला अपेक्षा नव्हती. गवळी यांना झालेल्या मतदानाच्या ४६.३२ टक्के मते मिळाली. तर काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना ३७ टक्के मते मिळविता आली. दोन उमेदवार वगळता सर्वांचीच अनामत जप्त झाली. ५० हजारांच्या आत तिसर्‍या क्रमांकावरील उमेदवाराला समाधान मानावे लागले. मनसे फॅक्टरही येथे कुचकामी ठरला. जय-पराजयाच्या कारणांचा शोध आता राजकीय विश्लेषक घेतील. मात्र काँग्रेसला मतदारांना गृहीत धरणेच अधिक भोवले आणि त्यातच शिवसेनेच्या विजयीची आघाडी वाढली.