शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
4
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
5
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
6
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
7
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
8
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
9
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
10
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
11
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
12
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
13
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
14
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
15
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
16
Viral News: एका उंदरामुळं इंडिगोच्या विमानाला साडेतीन तास उशीर, नेमकं काय घडलं?
17
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
18
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
19
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
20
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री

डॉ.वेदप्रकाश मिश्रांची दणक्यापूर्वीच शरणागती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 20:56 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुधवारी वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात अनपेक्षित घटनाक्रम घडला. या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका परत करत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले. या प्रकरणात २६ फेब्रुवारी रोजी अंतिम फैसला येणार आहे. त्याअगोदरच डॉ.मिश्रा यांनी हे पाऊल उचलत एकाप्रकारे शरणागतीच पत्करली असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात होती.

ठळक मुद्देपदविका केली वापस : विद्यापीठ म्हणते, पदविका परत घेण्याची तरतूदच नाही, आम्हीच कारवाई करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुधवारी वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात अनपेक्षित घटनाक्रम घडला. या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका परत करत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले. या प्रकरणात २६ फेब्रुवारी रोजी अंतिम फैसला येणार आहे. त्याअगोदरच डॉ.मिश्रा यांनी हे पाऊल उचलत एकाप्रकारे शरणागतीच पत्करली असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात होती. दुसरीकडे विद्यापीठाने मात्र डॉ.मिश्रा यांना अशाप्रकारे पदवी परत करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा केला आहे. नियमांत अशी तरतूद नसून विद्यापीठ पदविका काढून घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. डॉ.मिश्रा यांनी आपल्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये आर.व्ही.राव यांनी १९६९ साली लिहिलेल्या पुस्तकातील १० प्रकरणे शब्दश: ‘कॉपी’ केली होती हे सांगणाऱ्या चौकशी अहवालाला १९९२ साली तत्कालीन व्यवस्थापन परिषदेने मान्यदेखील केले.हे प्रकरण परत एकदा समोर आल्यानंतर विद्यापीठाने डॉ.मिश्रा यांना नोटीस बजावली होती. दुसरीकडे डॉ.मिश्रा यांनी दिवाणी न्यायालयात जुनी याचिका पुनर्जीवित करण्यासाठी अर्ज दाखल केला. याप्रकरणात कायदेशीर सल्ल्यानंतर डॉ.मिश्रा यांना १७ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र आता ही मुदत २६ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत त्यांना स्वत: उपस्थित राहावे लागणार आहे. जर ते उपस्थित झाले नाही, तर त्याच दिवशी निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर डॉ.मिश्रा यांनी बुधवारी कुलगुरूंना एका व्यक्तीच्या माध्यमातून पत्र पाठविले. ही पदविका आपण परत करत असल्याचे यात नमूद करण्यात आले. आपण पदविका प्रमाणपत्र विद्यापीठातून घेतले नसल्याचेदेखील त्यांनी यात नमूद केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठliteratureसाहित्य