शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

डॉ.वेदप्रकाश मिश्रांची दणक्यापूर्वीच शरणागती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 20:56 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुधवारी वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात अनपेक्षित घटनाक्रम घडला. या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका परत करत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले. या प्रकरणात २६ फेब्रुवारी रोजी अंतिम फैसला येणार आहे. त्याअगोदरच डॉ.मिश्रा यांनी हे पाऊल उचलत एकाप्रकारे शरणागतीच पत्करली असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात होती.

ठळक मुद्देपदविका केली वापस : विद्यापीठ म्हणते, पदविका परत घेण्याची तरतूदच नाही, आम्हीच कारवाई करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुधवारी वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात अनपेक्षित घटनाक्रम घडला. या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका परत करत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले. या प्रकरणात २६ फेब्रुवारी रोजी अंतिम फैसला येणार आहे. त्याअगोदरच डॉ.मिश्रा यांनी हे पाऊल उचलत एकाप्रकारे शरणागतीच पत्करली असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात होती. दुसरीकडे विद्यापीठाने मात्र डॉ.मिश्रा यांना अशाप्रकारे पदवी परत करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा केला आहे. नियमांत अशी तरतूद नसून विद्यापीठ पदविका काढून घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. डॉ.मिश्रा यांनी आपल्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये आर.व्ही.राव यांनी १९६९ साली लिहिलेल्या पुस्तकातील १० प्रकरणे शब्दश: ‘कॉपी’ केली होती हे सांगणाऱ्या चौकशी अहवालाला १९९२ साली तत्कालीन व्यवस्थापन परिषदेने मान्यदेखील केले.हे प्रकरण परत एकदा समोर आल्यानंतर विद्यापीठाने डॉ.मिश्रा यांना नोटीस बजावली होती. दुसरीकडे डॉ.मिश्रा यांनी दिवाणी न्यायालयात जुनी याचिका पुनर्जीवित करण्यासाठी अर्ज दाखल केला. याप्रकरणात कायदेशीर सल्ल्यानंतर डॉ.मिश्रा यांना १७ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र आता ही मुदत २६ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत त्यांना स्वत: उपस्थित राहावे लागणार आहे. जर ते उपस्थित झाले नाही, तर त्याच दिवशी निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर डॉ.मिश्रा यांनी बुधवारी कुलगुरूंना एका व्यक्तीच्या माध्यमातून पत्र पाठविले. ही पदविका आपण परत करत असल्याचे यात नमूद करण्यात आले. आपण पदविका प्रमाणपत्र विद्यापीठातून घेतले नसल्याचेदेखील त्यांनी यात नमूद केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठliteratureसाहित्य