शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

डॉ.वेदप्रकाश मिश्रांची दणक्यापूर्वीच शरणागती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 20:56 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुधवारी वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात अनपेक्षित घटनाक्रम घडला. या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका परत करत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले. या प्रकरणात २६ फेब्रुवारी रोजी अंतिम फैसला येणार आहे. त्याअगोदरच डॉ.मिश्रा यांनी हे पाऊल उचलत एकाप्रकारे शरणागतीच पत्करली असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात होती.

ठळक मुद्देपदविका केली वापस : विद्यापीठ म्हणते, पदविका परत घेण्याची तरतूदच नाही, आम्हीच कारवाई करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुधवारी वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात अनपेक्षित घटनाक्रम घडला. या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका परत करत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले. या प्रकरणात २६ फेब्रुवारी रोजी अंतिम फैसला येणार आहे. त्याअगोदरच डॉ.मिश्रा यांनी हे पाऊल उचलत एकाप्रकारे शरणागतीच पत्करली असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात होती. दुसरीकडे विद्यापीठाने मात्र डॉ.मिश्रा यांना अशाप्रकारे पदवी परत करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा केला आहे. नियमांत अशी तरतूद नसून विद्यापीठ पदविका काढून घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. डॉ.मिश्रा यांनी आपल्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये आर.व्ही.राव यांनी १९६९ साली लिहिलेल्या पुस्तकातील १० प्रकरणे शब्दश: ‘कॉपी’ केली होती हे सांगणाऱ्या चौकशी अहवालाला १९९२ साली तत्कालीन व्यवस्थापन परिषदेने मान्यदेखील केले.हे प्रकरण परत एकदा समोर आल्यानंतर विद्यापीठाने डॉ.मिश्रा यांना नोटीस बजावली होती. दुसरीकडे डॉ.मिश्रा यांनी दिवाणी न्यायालयात जुनी याचिका पुनर्जीवित करण्यासाठी अर्ज दाखल केला. याप्रकरणात कायदेशीर सल्ल्यानंतर डॉ.मिश्रा यांना १७ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र आता ही मुदत २६ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत त्यांना स्वत: उपस्थित राहावे लागणार आहे. जर ते उपस्थित झाले नाही, तर त्याच दिवशी निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर डॉ.मिश्रा यांनी बुधवारी कुलगुरूंना एका व्यक्तीच्या माध्यमातून पत्र पाठविले. ही पदविका आपण परत करत असल्याचे यात नमूद करण्यात आले. आपण पदविका प्रमाणपत्र विद्यापीठातून घेतले नसल्याचेदेखील त्यांनी यात नमूद केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठliteratureसाहित्य