शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

दोन वर्षांत पाठ्यपुस्तकांमधील इतिहास बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 02:53 IST

आपल्या देशात पत्रकार चुकीची माहिती देत असल्याची अनेकदा टीका होते. परंतु यात त्यांची चूक नाही. मुळात पाठ्य पुस्तकांमध्येच चुकीचा व भ्रम निर्माण करणारा इतिहास शिकविण्यात येत आहे.

सुब्रमण्यम् स्वामी : महर्षी नारद जयंतीनिमित्त पत्रकार पुरस्कारांचे वितरणनागपूर : आपल्या देशात पत्रकार चुकीची माहिती देत असल्याची अनेकदा टीका होते. परंतु यात त्यांची चूक नाही. मुळात पाठ्य पुस्तकांमध्येच चुकीचा व भ्रम निर्माण करणारा इतिहास शिकविण्यात येत आहे. हा इतिहास बदलविण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न राहणार असून येत्या दोन वर्षांत इतिहासाची पाठ्यपुस्तके बदलण्यात येतील, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुब्रमण्यम् स्वामी यांनी केले. महर्षी नारद जयंतीनिमित्त विश्व संवाद केंद्राच्या विदर्भ प्रांतातर्फे पत्रकार पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख जे.नंदकुमार, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित व विश्व संवाद केंद्राचे प्रमुख सुधीर पाठक उपस्थित होते. आपल्या देशात अगदी आर्य काळापासूनचा चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे. देशात अनेक शूरवीर होऊन गेले. हिंदूंनी गेल्या हजारो वर्षांपासून स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष केला असताना मुघलांच्या इतिहासाचे धडेच्या धडे आहेत. हे अयोग्य असून यात बदल होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आपल्या देशात पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करण्याची आवश्यकता आहे. मुळात नोकरीसाठी पत्रकारितेची पदवी ही अट ठेवायलाच हवी आणि कायद्याबाबत त्यांना प्रशिक्षण द्यायला हवे असे डॉ.स्वामी म्हणाले. देवर्षी नारद हे पहिले पत्रकार होते. परंतु चित्रपट आणि मालिकांमधून त्यांची प्रतिमा विनोदात्मक पद्धतीची करण्यात आली. काही लोकांनी जाणुनबुजून असे केले असा आरोप जे.नंदकुमार यांनी लावला. यावेळी बबन वाळके आणि जयेश जग्गड यांना पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवाय विश्व संवाद केंद्राचे सहप्रमुख प्रसाद बर्वे यांनी लिहिलेल्या ‘देवर्षी नारद : जीवन आणि कार्य’ या पुस्तकाचेदेखील प्रकाशन करण्यात आले. सुधीर पाठक यांनी प्रास्ताविक केले. नीलय चौथाईवाले यांनी संचालन केले तर प्रसाद बर्वे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)