शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाच्या संवर्धनाला हेरिटेजचा अडसर

By admin | Updated: May 9, 2014 02:29 IST

नागपूरच्या इतिहासात भोसले घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. राजे रघुजी महाराजांनी बारा बलुतेदारांना एकत्र करून नागपूर शहर बसविले, शहराला विकसित केले.

मंगेश व्यवहारे ■ नागपूरनागपूरच्या इतिहासात भोसले घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. राजे रघुजी महाराजांनी बारा बलुतेदारांना एकत्र करून नागपूर शहर बसविले, शहराला विकसित केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी राजधानी व महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर उपराजधानीचा दर्जा नागपूरला मिळाला. मात्र, नागपूरचे प्रशासन राजाचा सन्मान करू शकले नाही. आज राज्याच्या समाधीची दुरवस्था झाली आहे. या समाधीचे संरक्षण व्हावे म्हणून भोसले घराणे प्रयत्नरत आहे. मात्र हेरिटेजचा अडसर असल्याने, या समाधींचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकत नाही.भोसल्यांचा राजघाट दुर्लक्षित : हेरिटेज समित्याही अस्तित्वहीन पर्यटन क्षेत्र होईल यादृष्टीने प्रयत्न करावेया स्थळाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने याचे अस्तित्व जपले पाहिजे. लोकांना या स्थळाची माहिती व्हावी म्हणून या स्थळाचा विकास करणे गरजेचे आहे. हे स्थळ पर्यटन क्षेत्र होईल, यादृष्टीने मनपाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. दत्ता शिर्के, सचिव, युवा चेतना मंच मालक असूनही संरक्षणापासून वंचितराजघाट हे नागपूरचे ऐतिहासिक वैभव आहे. या घाटावर भोसले घराण्याचे सर्व राजा, राणी यांच्या समाधी आहेत. बांधकामही जुन्या पद्धतीचे असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. भोसले घराणे या जागेचा आजही टॅक्स भरतात; मात्र विकास करू शकत नाही. आज या घाटाला संरक्षण भिंत नाही. घाटाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. अवैध कामे येथे होतात. हेरिटेज कमिट्या निव्वळ नावापुरत्या असून, त्यांच्यामुळेच नागपूरचे ऐतिहासिक वैभव नष्ट होत आहे. राजे मुधोजी भोसले, भोसलेंचे १३ वे वंशज भोसले राजघराण्याचे स्वत:चे घाट आहे. त्याला राजघाट संबोधण्यात येते. या राजघाटावर भोसले घराण्यातील राणी काशीबाई सती गेल्या होत्या. त्यांचे समाधी मंदिर येथे उभारण्यात आले आहे. त्यामुळे हे राजघाट काशीबाई मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. नवसाला पावतात म्हणून अनेकांची श्रद्धा आहे. या राजघाटावर राजे रघुजी प्रथम, द्वितीय, तृतीय, त्यांच्या राण्या, भोसले घराण्याचे खासमखास असलेल्या लोकांची समाधी आहे. या समाध्यांचे बांधकाम अतिशय जुने आहे. त्यामुळे राजघाट परिसराची नोंद हेरिटेजमध्ये करण्यात आली आहे. राजघाट हा भोसल्यांच्या मालकीच्या जागेवर असला तरी, हेरिटेजमध्ये आल्याने त्यांचे रक्षण ते करू शकत नाही. नागपूर महापालिकेंतर्गत येणार्‍या जुन्या वास्तूंचे जतन व्हावे, यासाठी हेरिटेज कमिटी तयार करण्यात आली होती. मात्र हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून या स्थळांचा कुठलीही विकास करण्यात आला नाही. राजघाटातील सर्व समाधींचे बांधकाम पुरातन पद्धतीचे आहे. ते जीर्ण झाले आहे. काही समाध्या खचलेल्या आहे, तुटलेल्या आहे. भोसले घराण्याचे वंशज समाधीच्या दुरस्तीला तयार असले तरी, बांधकाम करायचे असेल तर हेरिटेज कमिटीची परवानगी आवश्यक आहे. मात्र शहरात हेरिटेज कमिटीच अस्तित्वात नसल्याने, ऐतिहासिक वारसा नष्ट होत आहे. मनपाच्या नगररचना विभागात हेरिटेज समितीच्या संदर्भात विचारणा केली असता, काही वर्षांपूर्वी ही समिती बरखास्त झाली असल्याचे सांगण्यात आले.