शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

इतिहासाच्या संवर्धनाला हेरिटेजचा अडसर

By admin | Updated: May 9, 2014 02:29 IST

नागपूरच्या इतिहासात भोसले घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. राजे रघुजी महाराजांनी बारा बलुतेदारांना एकत्र करून नागपूर शहर बसविले, शहराला विकसित केले.

मंगेश व्यवहारे ■ नागपूरनागपूरच्या इतिहासात भोसले घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. राजे रघुजी महाराजांनी बारा बलुतेदारांना एकत्र करून नागपूर शहर बसविले, शहराला विकसित केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी राजधानी व महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर उपराजधानीचा दर्जा नागपूरला मिळाला. मात्र, नागपूरचे प्रशासन राजाचा सन्मान करू शकले नाही. आज राज्याच्या समाधीची दुरवस्था झाली आहे. या समाधीचे संरक्षण व्हावे म्हणून भोसले घराणे प्रयत्नरत आहे. मात्र हेरिटेजचा अडसर असल्याने, या समाधींचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकत नाही.भोसल्यांचा राजघाट दुर्लक्षित : हेरिटेज समित्याही अस्तित्वहीन पर्यटन क्षेत्र होईल यादृष्टीने प्रयत्न करावेया स्थळाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने याचे अस्तित्व जपले पाहिजे. लोकांना या स्थळाची माहिती व्हावी म्हणून या स्थळाचा विकास करणे गरजेचे आहे. हे स्थळ पर्यटन क्षेत्र होईल, यादृष्टीने मनपाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. दत्ता शिर्के, सचिव, युवा चेतना मंच मालक असूनही संरक्षणापासून वंचितराजघाट हे नागपूरचे ऐतिहासिक वैभव आहे. या घाटावर भोसले घराण्याचे सर्व राजा, राणी यांच्या समाधी आहेत. बांधकामही जुन्या पद्धतीचे असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. भोसले घराणे या जागेचा आजही टॅक्स भरतात; मात्र विकास करू शकत नाही. आज या घाटाला संरक्षण भिंत नाही. घाटाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. अवैध कामे येथे होतात. हेरिटेज कमिट्या निव्वळ नावापुरत्या असून, त्यांच्यामुळेच नागपूरचे ऐतिहासिक वैभव नष्ट होत आहे. राजे मुधोजी भोसले, भोसलेंचे १३ वे वंशज भोसले राजघराण्याचे स्वत:चे घाट आहे. त्याला राजघाट संबोधण्यात येते. या राजघाटावर भोसले घराण्यातील राणी काशीबाई सती गेल्या होत्या. त्यांचे समाधी मंदिर येथे उभारण्यात आले आहे. त्यामुळे हे राजघाट काशीबाई मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. नवसाला पावतात म्हणून अनेकांची श्रद्धा आहे. या राजघाटावर राजे रघुजी प्रथम, द्वितीय, तृतीय, त्यांच्या राण्या, भोसले घराण्याचे खासमखास असलेल्या लोकांची समाधी आहे. या समाध्यांचे बांधकाम अतिशय जुने आहे. त्यामुळे राजघाट परिसराची नोंद हेरिटेजमध्ये करण्यात आली आहे. राजघाट हा भोसल्यांच्या मालकीच्या जागेवर असला तरी, हेरिटेजमध्ये आल्याने त्यांचे रक्षण ते करू शकत नाही. नागपूर महापालिकेंतर्गत येणार्‍या जुन्या वास्तूंचे जतन व्हावे, यासाठी हेरिटेज कमिटी तयार करण्यात आली होती. मात्र हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून या स्थळांचा कुठलीही विकास करण्यात आला नाही. राजघाटातील सर्व समाधींचे बांधकाम पुरातन पद्धतीचे आहे. ते जीर्ण झाले आहे. काही समाध्या खचलेल्या आहे, तुटलेल्या आहे. भोसले घराण्याचे वंशज समाधीच्या दुरस्तीला तयार असले तरी, बांधकाम करायचे असेल तर हेरिटेज कमिटीची परवानगी आवश्यक आहे. मात्र शहरात हेरिटेज कमिटीच अस्तित्वात नसल्याने, ऐतिहासिक वारसा नष्ट होत आहे. मनपाच्या नगररचना विभागात हेरिटेज समितीच्या संदर्भात विचारणा केली असता, काही वर्षांपूर्वी ही समिती बरखास्त झाली असल्याचे सांगण्यात आले.