शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशन अभ्यासक्रमात आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:07 IST

निशांत वानखेडे नागपूर : देशाचा स्वातंत्र्य लढा आणि राजकीय वाटचालीचा विचार केल्यास १९२० साली नागपूर येथे झालेले काँग्रेसचे अधिवेशन ...

निशांत वानखेडे

नागपूर : देशाचा स्वातंत्र्य लढा आणि राजकीय वाटचालीचा विचार केल्यास १९२० साली नागपूर येथे झालेले काँग्रेसचे अधिवेशन अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरले. देशाच्या पटलावर महात्मा गांधी यांचे नेतृत्व असाे किंवा स्वातंत्र्य लढ्यात निर्णायक ठरलेली असहकार चळवळ, ही नागपूर अधिवेशनाचीच फलश्रुती ठरली. भारताच्या इतिहासातील हा महत्त्वाचा टप्पाच हाेता. त्यामुळे भावी पिढीला हा इतिहास माहीत असणे अगत्याचेच आहे. हेच महत्त्व लक्षात घेत बीए आणि एमएच्या इतिहास अभ्यासक्रमात या ऐतिहासिक अधिवेशनाचा समावेश करण्यात आला.

राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डाॅ. श्याम काेरेट्टी यांनी लाेकमतशी बाेलताना याबाबतचे अनेक संदर्भ सादर केले. तसे नागपूर अधिवेशनाचा इतिहास बहुतेक लेखकांच्या पुस्तकामध्ये वाचायला मिळताे. २००३ साली नागपूरच्या त्रिशताब्दीनिमित्त काढलेल्या ग्रंथात या सुवर्णक्षणांचा उल्लेख करण्यात आला. मात्र अभ्यासक्रमाच्या दृष्टीनेही या अधिवेशनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशातील जवळपास सर्व विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना नागपूर अधिवेशन अभ्यासणे तेवढेच महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढ्यातील उदय सर्वमान्य हाेण्यास नागपूर अधिवेशन कारणीभूत ठरले. याशिवाय देशभरात पेटलेली असहकार चळवळ ही नागपूर अधिवेशनाचीच देण. त्यामुळे हे दाेन्ही संदर्भ अभ्यासण्यासाठी नागपूर अधिवेशन डाेळ्यासमाेरून घालणे विद्यार्थ्यांसाठी तेवढेच महत्त्वाचे आहे.

डाॅ. काेरेट्टी यांच्या मते, नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच स्वातंत्र्य आंदाेलनाच्या इतिहासात नागपूर अधिवेशनाचा उल्लेख अभ्यासक्रमात हाेता. युजीसीच्या सूचनेनुसार देशातील अभ्यासक्रमातही ते अंतर्भूत हाेते. तसा ताे राज्यातील अभ्यासक्रमातही आला. विशेष धडा नसला तरी गांधी उदय व असहकार चळवळ अभ्यासताना त्याचा समावेश हाेताे. मात्र नागपूर विद्यापीठात ताे अधिक व्यापक रूपात समाविष्ट करण्यात आला. कला शाखेत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात अधिवेशन समाविष्ट झाले. डाॅ. काेरेट्टी म्हणाले, राष्ट्रीय स्तराचा इतिहास अभ्यासताना स्थानिक घडामाेडीलाही महत्त्व असते. त्यानुसार एमएच्या द्वितीय वर्षात नागपूर अधिवेशनाच्या इतिहासाला स्वतंत्र स्थान मिळाले. आधी वार्षिक पॅटर्न हाेता, ताे आता सेमिस्टरनुसार झाला. त्यानुसार एमएच्या चाैथ्या म्हणजे अंतिम सेमिस्टरला स्वातंत्र्य लढ्यातील विदर्भाच्या इतिहासात नागपूर अधिवेशन स्वतंत्रपणे व सविस्तर घेतले गेले.

गांधी उदय, असहकार चळवळ या महत्त्वाच्या मुद्यासह स्वदेशीचा आग्रह, काैमी एकता, अस्पृश्यता निवारणाचा प्रस्ताव, स्वातंत्र्य लढ्यात महिलांचा सहभाग असे अनेक कांगाेरे नागपूर अधिवेशनाला आहेत, जे आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना महत्त्वाचे आहेत. अधिवेशनात पारित झालेले २३ प्रस्ताव स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे बिंदू ठरले. त्यामुळे ऐतिहासिक संदर्भ असलेले हे अधिवेशन अभ्यासक्रमात येणार नाही तर नवल.

- डाॅ. श्याम काेरेट्टी, इतिहास विभागप्रमुख, राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठ