शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

इतिहासकारांनी सोयीने अन्वयार्थ लावू नये

By admin | Updated: September 21, 2015 03:18 IST

इतिहासामधील विविध घटनांसंदर्भात विविध गृहितके सिद्ध करण्यासाठी इतिहासकारांकडून आवश्यक त्याच बाबी घेण्यात येतात.

उमेश बगाडे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचा समारोपनागपूर : इतिहासामधील विविध घटनांसंदर्भात विविध गृहितके सिद्ध करण्यासाठी इतिहासकारांकडून आवश्यक त्याच बाबी घेण्यात येतात. यामुळे चुकीचा इतिहास मांडल्या जातो. त्यामुळे इतिहासकारांनी आपापल्या सोयीने अन्वयार्थ लावू नये, असे मत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख डॉ. उमेश बगाडे यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्यावतीने दीक्षांत सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी डॉ. बगाडे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक लेखन पद्धती’ या विषयावर व्याख्यानमालेतील दुसरे व अंतिम पुष्प गुंफले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे व कुलसचिव डॉ.पूरण मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते. इतिहासकारांमध्ये अन्वयार्थाची बजबजपुरी आहे. परंतु संदर्भापासून कोणतेही तथ्य बाजूला काढता येणार नाही. तथ्याला नेहमी चौकटीतच ठेवणे आवश्यक आहे, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. त्यांनी इतिहास हा तात्त्विक चौकटीतच लिहिला. त्यावेळी प्रचलित असलेल्या इतिहास लेखनातील अनेक प्रथांना त्यांनी धक्का दिला व वास्तव मांडले, असे प्रतिपादन डॉ. बगाडे यांनी केले.इतिहासातील सत्य शोधताना मनात नेहमी शंका राहिल्या पाहिजेत. कारण शंकेमधूनच सत्य समोर येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्य शोधण्यासाठी चिकित्सा आवश्यक असते. इतिहास हा वस्तुनिष्ठता व व्यक्तीनिष्ठता यांच्यातून समोर यायला हवा. वस्तुनिष्ठता तर मानवतावादीच हवी असेदेखील ते म्हणाले. डॉ.आंबेडकर यांनी समाजशास्त्राचे लेखन करण्यासाठीदेखील सिद्धांतांची सामुग्री दिली आहे. त्यांनी परंपरागत चौकट तोडून इतिहास लेखन केले असले तरी त्यांची गृहितकांची पद्धती ही पूर्णत: शास्त्रीयच होती. तथ्य संदर्भापासून बाजूला काढता येणार नाही, या बाबासाहेबांच्या विचारांचे अनेक इतिहासकार आता पालन करत आहेत, अशी माहितीदेखील डॉ.उमेश बगाडे यांनी दिली. डॉ.आगलावे यांनी व्याख्यानमालेतील विषयाचे महत्त्व विषद केले. या व्याख्यानमालेला विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. (प्रतिनिधी)