शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

इतिहासकारांनी सोयीने अन्वयार्थ लावू नये

By admin | Updated: September 21, 2015 03:18 IST

इतिहासामधील विविध घटनांसंदर्भात विविध गृहितके सिद्ध करण्यासाठी इतिहासकारांकडून आवश्यक त्याच बाबी घेण्यात येतात.

उमेश बगाडे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचा समारोपनागपूर : इतिहासामधील विविध घटनांसंदर्भात विविध गृहितके सिद्ध करण्यासाठी इतिहासकारांकडून आवश्यक त्याच बाबी घेण्यात येतात. यामुळे चुकीचा इतिहास मांडल्या जातो. त्यामुळे इतिहासकारांनी आपापल्या सोयीने अन्वयार्थ लावू नये, असे मत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख डॉ. उमेश बगाडे यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्यावतीने दीक्षांत सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी डॉ. बगाडे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक लेखन पद्धती’ या विषयावर व्याख्यानमालेतील दुसरे व अंतिम पुष्प गुंफले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे व कुलसचिव डॉ.पूरण मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते. इतिहासकारांमध्ये अन्वयार्थाची बजबजपुरी आहे. परंतु संदर्भापासून कोणतेही तथ्य बाजूला काढता येणार नाही. तथ्याला नेहमी चौकटीतच ठेवणे आवश्यक आहे, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. त्यांनी इतिहास हा तात्त्विक चौकटीतच लिहिला. त्यावेळी प्रचलित असलेल्या इतिहास लेखनातील अनेक प्रथांना त्यांनी धक्का दिला व वास्तव मांडले, असे प्रतिपादन डॉ. बगाडे यांनी केले.इतिहासातील सत्य शोधताना मनात नेहमी शंका राहिल्या पाहिजेत. कारण शंकेमधूनच सत्य समोर येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्य शोधण्यासाठी चिकित्सा आवश्यक असते. इतिहास हा वस्तुनिष्ठता व व्यक्तीनिष्ठता यांच्यातून समोर यायला हवा. वस्तुनिष्ठता तर मानवतावादीच हवी असेदेखील ते म्हणाले. डॉ.आंबेडकर यांनी समाजशास्त्राचे लेखन करण्यासाठीदेखील सिद्धांतांची सामुग्री दिली आहे. त्यांनी परंपरागत चौकट तोडून इतिहास लेखन केले असले तरी त्यांची गृहितकांची पद्धती ही पूर्णत: शास्त्रीयच होती. तथ्य संदर्भापासून बाजूला काढता येणार नाही, या बाबासाहेबांच्या विचारांचे अनेक इतिहासकार आता पालन करत आहेत, अशी माहितीदेखील डॉ.उमेश बगाडे यांनी दिली. डॉ.आगलावे यांनी व्याख्यानमालेतील विषयाचे महत्त्व विषद केले. या व्याख्यानमालेला विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. (प्रतिनिधी)